शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

रोजगारासाठी कंपन्या मागताहेत गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

चुल्हाड (सिहोरा) : कोरोना काळात गावाकडे अडकलेल्यांना गावातच रोजगार उपलब्ध करण्यात अपयश आल्यानंतर मजुरांचे लोंढे शहरात रोजगारासाठी धाव घेत ...

चुल्हाड (सिहोरा) : कोरोना काळात गावाकडे अडकलेल्यांना गावातच रोजगार उपलब्ध करण्यात अपयश आल्यानंतर मजुरांचे लोंढे शहरात रोजगारासाठी धाव घेत आहेत. या मजुरांना कंपन्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागत असल्याने अडचणीत वाढ झाली आहे. सिहोरा परिसरातील तरुणांनी या प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोना काळात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने मजूर गावाकडे परतले. गावात या मजुरांनी रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना गावात बारमाही रोजगार मिळाला नाही. यामुळे जवळ असणारा पैसा संपला. यानंतर आर्थिक अडचणीचा सामना करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आता बंद असणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु या कंपन्यात कामगारांचा तुटवडा असल्याने गावातून कामगारांची मागणीही वाढली आहे.

कंपन्यांत रोजगार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला असता नवीन संकटाने त्यांना ग्रासले आहे. कंपनीत प्रवेश घेताना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येत आहे. यामुळे सिहोरा परिसरातील तरुण या प्रमाणपत्रसाठी ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. या प्रमाणपत्र प्राप्तीकरिता काही दिवसांचा कालावधी लागत आहे.

बॉक्स

तत्काळ प्रमाणपत्र देण्याची गरज

ग्रामीण भागात रोहयोच्या कामांना मंजुरी देण्यात आली नाही. हाताला कामे नसल्याने मजूर व कामगार रोजगारासाठी शहराकडे धाव घेत असून, कंपन्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र मागत आहेत. जलद गतीने प्रमाणपत्र देण्यासाठी पोलीस ठाण्यात सोय करण्याची गरज आहे, अशी मागणी बपेरा येथील भाजपा युवा नेते किशोर राहगडाले आणि भाजयुमोचे तालुका उपाध्यक्ष विनोद पटले यांनी केली आहे.