शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

कागदपत्रांअभावी माघारी परतले उमेदवार

By admin | Updated: June 25, 2014 23:36 IST

भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार वंचित झाले आहेत. आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याची पूर्वसूचना या उमेदवारांना देण्यात आली नाही.

पोलीस भरती : प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरजचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार वंचित झाले आहेत. आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याची पूर्वसूचना या उमेदवारांना देण्यात आली नाही. यामुळे या उमेदवारांना अतिरिक्त भुर्दंड सोसत माघारी परतावे लागले आहे.सध्या भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भरती प्रक्रिया वादात सापडल्यानंतर उमेदवारांना शिथिलता देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या मैदानात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत प्रथम सहभाग घेतलेल्या उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. महिला उमेदवारांना त्रास सहन करावा लागला आहे. पोलीस भरती प्रक्रिया राबविताना आॅनलाईन अर्ज मागविण्यात आली आहे. या अर्जात उमेदवारांनी शैक्षणिक तथा शारीरिक माहिती सादर केली आहे. दरम्यान १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराचे मूळ दस्तऐवज अन्य शिक्षण संस्थेत असल्याने हे दस्तऐवज उपलब्ध करु शकले नाही. पोलीस कार्यालयातून भरती प्रक्रियेत भ्रमणध्वनीवरुन सांगण्यात आले. प्रथमत: पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेणारे उमेदवार मुळ दस्तऐवजाचे झेराक्स प्रत सोबतीला घेऊन मैदानात हजर झाले. महिला उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देताना मूळ दस्तऐवजाची जुळवाजुळव सांगण्यात आली नाही. भ्रमणध्वनीवरुन साधी सूचना देण्याचे सौजन्य पोलीस विभागामार्फत दाखविण्यात आली नाही. महिला उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. यात मूळ दस्तऐवज उपलब्ध नसलेल्या महिला उमेदवारांना परत पाठविण्यात आले आहे.पोलीस विभाग मार्फत मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला नाही असे दिसून आले आहे. उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याची सूचना देताना या बाबी सांगितल्या पाहिजेत. यामुळे कुणी भरती प्रक्रियेत सहभाग न घेता माघारी परतणार नाही. दरम्यान गेल्या वर्षात नागपुरात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मुळ दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रतच्या आधारावर महिला उमेदवारांना सहभाग देण्यात आले होते. याशिवाय तीन दिवसात संबंधित दस्तऐवज उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले होते.या प्रक्रियेमुळे उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु भंडारा जिल्ह्यात मात्र उमेदवारांची अडचण तथा सहभाग घेणाऱ्या प्रक्रियेत शिथिलता देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. मूळ दस्तऐवज उपलब्ध नसल्याने महिला उमेदवारांना माघारी पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)