शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

कागदपत्रांअभावी माघारी परतले उमेदवार

By admin | Updated: June 25, 2014 23:36 IST

भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार वंचित झाले आहेत. आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याची पूर्वसूचना या उमेदवारांना देण्यात आली नाही.

पोलीस भरती : प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरजचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार वंचित झाले आहेत. आवश्यक दस्तऐवज उपलब्ध करण्याची पूर्वसूचना या उमेदवारांना देण्यात आली नाही. यामुळे या उमेदवारांना अतिरिक्त भुर्दंड सोसत माघारी परतावे लागले आहे.सध्या भंडारा जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यात भरती प्रक्रिया वादात सापडल्यानंतर उमेदवारांना शिथिलता देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेच्या मैदानात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत प्रथम सहभाग घेतलेल्या उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. महिला उमेदवारांना त्रास सहन करावा लागला आहे. पोलीस भरती प्रक्रिया राबविताना आॅनलाईन अर्ज मागविण्यात आली आहे. या अर्जात उमेदवारांनी शैक्षणिक तथा शारीरिक माहिती सादर केली आहे. दरम्यान १२वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराचे मूळ दस्तऐवज अन्य शिक्षण संस्थेत असल्याने हे दस्तऐवज उपलब्ध करु शकले नाही. पोलीस कार्यालयातून भरती प्रक्रियेत भ्रमणध्वनीवरुन सांगण्यात आले. प्रथमत: पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेणारे उमेदवार मुळ दस्तऐवजाचे झेराक्स प्रत सोबतीला घेऊन मैदानात हजर झाले. महिला उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन माहिती देताना मूळ दस्तऐवजाची जुळवाजुळव सांगण्यात आली नाही. भ्रमणध्वनीवरुन साधी सूचना देण्याचे सौजन्य पोलीस विभागामार्फत दाखविण्यात आली नाही. महिला उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली आहे. दस्तऐवजांची तपासणी करण्यात आली. यात मूळ दस्तऐवज उपलब्ध नसलेल्या महिला उमेदवारांना परत पाठविण्यात आले आहे.पोलीस विभाग मार्फत मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात आला नाही असे दिसून आले आहे. उमेदवारांना भ्रमणध्वनीवरुन भरती प्रक्रियेत सहभाग घेण्याची सूचना देताना या बाबी सांगितल्या पाहिजेत. यामुळे कुणी भरती प्रक्रियेत सहभाग न घेता माघारी परतणार नाही. दरम्यान गेल्या वर्षात नागपुरात घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मुळ दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रतच्या आधारावर महिला उमेदवारांना सहभाग देण्यात आले होते. याशिवाय तीन दिवसात संबंधित दस्तऐवज उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले होते.या प्रक्रियेमुळे उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. परंतु भंडारा जिल्ह्यात मात्र उमेदवारांची अडचण तथा सहभाग घेणाऱ्या प्रक्रियेत शिथिलता देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. मूळ दस्तऐवज उपलब्ध नसल्याने महिला उमेदवारांना माघारी पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)