शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

१२२ गावांमध्ये ४१९ घरांची पडझड

By admin | Updated: July 24, 2014 23:42 IST

मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे.

भंडारा : मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यामधील १२२ गावांमध्ये ४१९ घरांची अंशत पडझड झाली आहे. अनेक गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे नदीकाठावरील गावांना फटका बसला आहे. यात ३२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका तुमसर तालुक्यातील सिंदपुरी या गावाला बसला असून आजही तिथे घरे पाण्यात आहेत.जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे दि. २३ जुलै रोजी अनेक मार्ग बंद पडलेले आहेत. यात लाखांदूर तालुक्यातील लाखांदूर ते वडसा मार्गे चप्राड, लाखांदूर, बारव्हा ते तई, दांडेगाव ते मासळ, बोथली ते मासळ हे मार्ग सकाळी ८ वाजेपासून बंद झाले आहेत. मार्ग बंद असल्यामुळे दुसरे पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरु केली आहे. भंडारा तालुक्यातील गणेशपूर ते कोरंभी, भिलेवाडा ते सुरेवाडा, करचखेडा ते सिरसघाट, सिंगोरी ते चांदोरी, पहेला ते गोलेवाडी, अर्जुनी ते जामगाव हे मार्ग बंद झालेले आहेत. पवनी तालुक्यातील कोदुर्ली ते भोजापूर मार्ग सकाळी ११ वाजता बंद झाले आहे. मोहाडी तालुक्यातील मोहाडी ते तुमसर मार्ग बंद झाले होते. साकोली तालुक्यातील पळसगाव ते सुकळी मार्ग, विर्सीफाटा ते विर्सी मार्ग दुपारी १२ वाजता बंद झाले. तुमसर तालुक्यातील वाहणी ते परसवाडा, सिलेगाव ते परसवाडा, वाहनी ते सिलेगाव हे मार्ग बंद आहेत. मोहाडी तालुक्यातील टांगा ते विहिरगाव, रोहा ते रोहणा, मोहाडी ते मांडेसर, दहेगाव ते रोहणा बेटाळा, मोहाडी ते कुशारी, आंधळगाव ते वडेगाव हे मार्ग नाल्यावर पाणी आल्यामुळे बंद करण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त माहितुीनुसार, दि. २१ ते २३ जुलै दरम्यानच्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. भंडारा तालुक्यात ८ गावांमध्ये १३ घरे अंशत: पडलेली आहेत. यामुळे १ लक्ष २४ हजार २०० रुपयांचे नुकसान झाले आहे. २ घरे पूर्णत: पडल्याने ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील ८ गावामध्ये ११ घरे अंशत: पडले यात १ लक्ष २७ हजार ८५० रुपयाचे नुकसान झाले. १ घरांचे पूर्णत: पडल्याने ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. पवनी तालुक्यात ७ गावामध्ये ११ घरे अंशत: पडली. यात ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन घरे पूर्णपणे पडल्याने ७० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील कारधा गावातील २ कुटुंबातील ९ व्यक्तींना सुरक्षित हलविण्यात आले. गणेशपूर नाल्यावर पुराचे पाण्याची थोप आल्याने २ कुटुंबातील ८ व्यक्तींना सुरक्षित जागेवर हलविण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)