शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

भंडारा : १९४२ चे चलेजाव आंदोलन

By admin | Updated: August 9, 2015 00:57 IST

स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव ...

भंडारा : स्वातंत्र्याच्या आंदोलनात भंडारा जिल्ह्यातील अनेक वीरपुत्रांना हौतात्म्य आले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनादरम्यान तुमसर व भंडारा येथे गोळीबार झाला. त्यामध्ये तुमसरचे सहा जणांना वीरमरण आले. त्यात १३० जखमी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व माकडे गुरुजी, नत्थू चौधरी, कर्मवीर बापू पाठक, दामले गुरुजी, बुधराम देशमुख, नारायण कारेमोरे, नारबाजी पाटील, भिवाजी लांजेवार, सदाशिव किटे, कृष्णाबाई वैद्य, सुमित्राबाई ठाकूर, बाळाजी पहलवान, महादेव लेंडे, किसन भस्मे, पांडुरंग कुंभलकर, वासुदेव कोंडेवार, वा.गो. कुळकर्णी, प्रभाकर पेंढारकर, आनंदराव चकोले, हरिश्चंद्र भोले, सीताराम कारेमोरे यांनी केले होते.सन १९४२ च्या स्वतंत्रता आंदोलनात भटू रामाजी लोंदासे, श्रीहरी काशिनाथ फाये (करडी), पांडुरंग परसराम सोनवाने, भुवाजी बालाजी भानोरे, राजाराम पैकुजी धुर्वे (भंडारा) हे शहीद झाले. उपस्थित लोकांनी शोकमग्न वातावरणात अंत्ययात्रा काढून डोंगरला नाला येथे येवून अग्नी देताना ‘भारत माता की जय’ च्या जल्लोषात घोषणा दिल्या. तो नागपंचमीचा दिवस होता. त्यावेळी पोलिसांनी अनेक घरांची झडती घेतली. दरम्यान भो.म. लांजेवार यांच्या निवासस्थानी बुलेटीन व पत्र मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. दामले गुरुजी, नारायण कारेमोरे, सदाशिव किटे, वासुदेव कोंडेवार, नारबाजी पाटील, वा.गो. कुळकर्णी यांना ताब्यात घेऊन भंडारा व जबलपूर येथील तुरुंगात पाठविण्यात आले.मोहाडी येथे नियमित प्रभातफेरी व ध्वज वंदन कार्यात पुनाजी वनवे, नामदेव भुरे, देवनाथ निमजे, किसन गोपाल डागा, सुरजरतन डागा, तेजराम गुरुनाथ श्रीपाद अग्रेसर होते. लक्ष्मणराव घोटकर हे सेनेत दाखल झाले होते. आंदोलनादरम्यान ते जापान येथे कैदी असताना ‘आझाद हिंद फौज’मध्ये भरती झाले. तुमसर, येरली, आंधळगाव, सिहोरा, मोहाडी, देव्हाडी, मोहगाव, वडेगाव, सुकळी, मुंढरी आदी गावातून २०० लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर दंड आकारण्यात आला. भंडारा येथील कारागृह अपूर्ण पडल्याने आंदोलनकर्त्यांना जबलपूर, रायपूर येथील कारागृहात पाठविण्यात आले. देव्हाडी येथे ‘चले जाव’ आंदोलनादरम्यान आठवडी बाजारात आयोजित सभेत रामचंद्र फाये व पन्नालाल यांनी मार्गदर्शन केले. रेल्वे स्थानक जाळण्याचे निश्चित केल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.भंडारा येथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ शहीद मैदान येथे आयोजित सभेत बाबा जोशी यांच्या भाषणामुळे देशभावना जागृत झाली. आंदोलनकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार व गोळीबार केला. त्यामध्ये महादेव गणबा गजापुरे, गोपाल गणपत चुटके व झिटोबा गोसावी हे शहीद झाले. काही जखमी झाले. मन्रो हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ध्वज हातात घेऊन निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी नगर परिषदेची कचरा गाडी आणून पार्थिव उचलले. तेव्हा शेंदुर्णीकर यांनी पोलिसांशी वाद घालून मृतदेह ताब्यात घेऊन सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले. बाबा जोशी, प्रभावती जकातदार, मुनीश्वर शास्त्री यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विद्यार्थ्यांमध्ये हर्देनिया बंधू, नंदलाल पशिने, भैय्या जोशी, भैय्या बोहटे, वसंत पवार, बाळ टेंभेकर, सूरजलाल साव, नंदकिशोर मिश्रा, गोकुळप्रसाद मिश्रा व तिवारी बंधू यांनी भाग घेतला. या घटनेत २० लोकांना ताब्यात घेण्यात आले. अड्याळ, पवनी या परिसरात नारायण बालाजी देशकर यांच्या अध्यक्षतेखाली कमेटी स्थापन करण्यात आली.