शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भंडारा जिल्ह्यात धानाचे ५२ कोटी ७४ लाखांचे चुकारे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल भंडारा जिल्ह्यात दोन लाख ९० हजार क्विंटल धान विक्री

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाशी दोन हात करीत पिकविलेला धान आधारभूत केंद्रावर विकला, मात्र आता महिना झाला तरी धान विक्रीचा एक छदामही शेतकऱ्यांच्या हाती पडला नाही. भंडारा जिल्ह्यातील आठ हजार ७६ शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धानाची विक्री केली असून त्याची किमत ५२ कोटी ७४ लाख ६१ हजार ३४३ रुपये आहे. आपल्या खात्यात धान विक्रीचे पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर १ नोव्हेंबर पासून धान खरेदीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आधारभूत केंद्रावर आपला धान आणून विकला. मात्र अद्यापही जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांला धान विक्रीचे पैसे मिळाले नाहीत. आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांनी दिवाळीनंतर घरी आलेला धान विकला. परंतु आता त्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. भंडारा तालुक्यातील २९१ शेतकऱ्यांना नऊ हजार ५६४ क्विंटल धान विकला असून त्याची रक्कम एक कोटी ७३ लाख ५८ हजार ६०० रुपये आहे. मोहाडी तालुक्यातील एक हजार ८४ शेतकऱ्यांनी ३५ हजार ८९१ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत सहा कोटी ५१ लाख ४२ हजार ८२८ रुपये, तुमसर तालुक्यातील एक हजार ५९० शेतकऱ्यांनी ५४ हजार ९४७ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत नऊ कोटी ९७ लाख ३० हजार ७५ रुपये, लाखनी तालुक्यातील एक हजार ७६१ शेतकऱ्यांनी ६२ हजार ४७२ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत ११ कोटी ३३ लाख ८७ हजार २२४ रुपये, साकोली तालुक्यातील एक हजार ४५९ शेतकऱ्यांनी विकलेल्या ५२ हजार ८६९ क्विंटल धानाचे नऊ कोटी ५९ लाख ५७ हजार ५९८ रुपये, लाखांदूर तालुक्यातील एक हजार १५६ शेतकऱ्यांनी ४६ हजार २४५ क्विंटल धान विकला असून त्याची किंमत आठ कोटी ३९ लाख ३७ हजार २१६ रुपये आहे. पवनी तालुक्यातील ७३५ शेतकऱ्यांनी २८ हजार २६१ क्विंटल धान आधारभूत केंद्रावर विकला असून पाच कोटी १९ लाख ४७ हजार ८४१ रुपये किंमत होते. २ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे.गत महिनाभरापासून शेतकरी आधारभूत खरेदी केंद्रावर धान विकत आहेत. मात्र अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले असून नवीन अधिकारी रूजू झाले. परंतु त्यानंतरही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. शेतकरी पैशाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.६६ केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाची खरेदीजिल्ह्यातील ६६ आधारभूत धान खरेदी केंद्रावर केवळ सर्वसाधारण धानाचीच शेतकरी विक्री करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील एकाही केंद्रावर अ ग्रेडचे धान विक्रीस आले नाही. अ ग्रेडच्या धानाला खुल्या बाजारात आधारभूत किमतीपेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवित असल्याचे दिसत आहे. त्यातही वेळेवर पैसा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी