शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

बावनथडी प्रकल्प क्षेत्रातील जमीन व्यवहारातील निर्बंध हटविले

By admin | Updated: May 30, 2014 23:27 IST

जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाअंतर्गत असलेले बुडीत व लाभक्षेत्रातील शेतजमीन हस्तांतरण, खरेदी विक्रीवरल निर्बंध जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी एका अधिसूचनेद्वारे हटविल्यामुळे तुमसर, भंडारा

भंडारा : जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाअंतर्गत असलेले बुडीत व लाभक्षेत्रातील शेतजमीन हस्तांतरण, खरेदी विक्रीवरल निर्बंध जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी एका अधिसूचनेद्वारे हटविल्यामुळे तुमसर, भंडारा व मोहाडी तालुक्यातील ७७ गावातील कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. तुमसर तालुक्यातील कमकासूर, सुसुरडोह व सितेकसा या तीन गावांचे पुनर्वसन सुद्धा योग्यठिकाणी करण्यात आले आहे. तुमसर तालुक्यातील बावनथडी पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधीत व लाभक्षेत्रातील प्रकल्प विस्थापितांसाठी पुनर्वसन अधिनियम १९७६ चे कलम ११ (१) नुसार १0 ऑक्टोबर १९७९ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. यासंदर्भात ५ मार्च १९८३ रोजी सुधारीत अधिसूचा प्रसिद्ध करून तुमसर तालुक्यातील कमकासूर, सुसुरडोह व सितेकसा या तीन गावासह भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील ७७ गावातील २५ हजार २१९ हेक्टर ३३ आर जमिनीच्या हस्तांतरण व्यवहारावर बंदी टाकण्यात आली होती. शिक्षण, आरोग्य, विवाह वा अन्य कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी ८ एकर वरील शेतकरी खातेदाराला शेतजमिनीची वाटणी किंवा हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येवून जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी शेतकर्‍यांची ही अडचण विचारात घेऊन प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेमुळे मागील ३५ वर्षापूर्वी पासून रखडलेल्या शेतजमिनीचे व्यवहार सुरळीत होत असल्याबद्दल संबंधित गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे १७ हजार ५३७ हेक्टर क्षेत्र प्रकल्पाच्या सिंचनाखाली येत आहे.बावनथडी प्रकल्पाच्या बुडीत व लाभक्षेत्रातील गावांचे पुनर्वसन जमीन पुनर्वसीत गावठाणे बसवून पूर्णपणे करण्यात आले आहे. त्याठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण देखील झाले आहे. आता या लाभक्षेत्रात पर्यायी जमिनीची आवश्यकता नसल्यामुळे प्रकल्पाच्या बाधीत क्षेत्राबाहेरील व लाभक्षेत्रातील जमिनीचे हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविण्याची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे जमीन हस्तांतरण, रुपांतरण व सुधारणा आदीबाबत अशा प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागणार नाहीत. तसेच याकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या जमिनी मुक्त करण्यात आल्यामुळे अधिकार अभिलेखातील नोंदी कमी करण्यासंबंधी जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित तहसीलदार व यंत्रणेला  निर्देश दिले आहेत. असे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी कळविले आहे.  (शहर प्रतिनिधी)