शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

बाबासाहेब आंबेडकरांना भारतीयांनी संकुचित केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:07 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले.

ठळक मुद्देएकनाथ कठाळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयतेचे चटके भोगले. त्या काळात जाती व्यवस्थेने त्यांचा प्रचंड छळ केला. पण डॉ. बाबासाहेबांना व त्यांच्या विचारांना विशिष्ट्य जातीचे लोकनेते म्हणून शिक्का मारल्या गेले. त्यांना जाणीवपूर्वक संकुचित केले, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठ टिचर असोसीएशनचे माजी सचिव डॉ. एकनाथ कठाळे यांनी व्यक्त केले.कला व वाणिज्य महाविद्यालय पेट्रोलपंप येथील सूजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासकेंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे शैक्षणिक विचार या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जी. डी. टेंभरे, डॉ. डी. व्ही. नाईक, प्रा. अकोश चवरे, डॉ. अजयकुमार मोहबंशी, डॉ. जगजीवन कोटांगले आदी उपस्थित होते.यावेळी कठाळे यांनी, चातुर्वण्य व्यवस्थेने त्यांच्या विद्वतेला न्याय दिला नाही. चातुर्वण्य व्यवस्था कालही होती आणि आजही आहे. फक्त माणसे बदलली. चातुर्वण्य व्यवस्थेचे स्वरुप तेच आहे. बाबासाहेबांच्या विचाराला जातीयतेच्या तराजूत न तोलता विवेकबुध्दीच्या तराजूत तोलले पाहिजे. त्यांनी जो धम्म स्विकार केला त्यातच त्यांच्या उच्च वैज्ञानिक विवेकांची प्रचिती येते. धम्म म्हणजे माणसाला माणसासारखे जगालय शिकविणारा उच्च वैज्ञानिक विचार होय. खरे तर भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुध्द या दोन्ही महामानवाचे विचार कृतीतून उतरविले तर आपला देश खºया अर्थाने शक्तीशाली होईल. त्यामुळे देशाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अवस्था समाधानकारक बदलली नाही, असे प्रतिपादन केले.याप्रसंगी प्रमुख वक्ते प्रा. अकोश चवरे यांनी, मुलभूत मानवी मूल्याची पूर्ती शिक्षणातूनच होईल. आत्मविश्वास क्रांती व परिवर्तन हे शिक्षणातूनच होते एकूण ज्ञान हा व्यक्तिमत्वाचा पाया आहे. म्हणून बाबासाहेब म्हणायचे मानसापेक्षा, पत्नीपेक्षा विद्येवर प्रेम करा. कारण विद्या हे आपले पहिले दैवत आहे. सामाजिक व आर्थिक दुखण्याचे ते औषध आहे. म्हणून समाजाला नैतिक मूल्यधिष्ठीत शिक्षण दिले जावे. त्याशिवाय मानवाचा विकास असंभव आहे.डॉ. डी. व्ही. नाईक यांनी, डॉ. आंबेडकरांनी दलित पददलितांना जो सन्मान मिळवून दिला व देशालाही राज्यघटना देवून जे महान कार्य केले त्याला दुसरे तोड नाही. डॉ. जी. डी. टेंभरे यांनी, अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक विचारावर प्रकाश टाकताना म्हणाले की, डॉ. आंबेडकराचे शैक्षणिक विचार व शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना मौलिक प्रेरणादायी आहेत. याची जाणीव विद्यार्थ्यांनी मनोमनी ठेवून अध्ययनाची वाटचाल करावी.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले यांनी केले. संचालन डॉ. रत्नपाल डोहणे यांनी केले. आभार डॉ. सी. पी. साखरवाडे यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रा. देवराम डोरले, डॉ. आर. टी. पटले, डॉ. आर. एन. मानकर, प्रा. वीजय गणविर, डॉ. सुनिता रविदास, डॉ. साधना वाघाडे तसेच सर्व प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.