शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नहर विकासाचा ६० कोटींचा अनुशेष कायम

By admin | Updated: November 17, 2014 22:46 IST

सिहोरा परिसरात नहर विकासाचा ६० कोटींचा अनुशेष आहे. कालवे आणि नहराची अवस्था वाईट झाली आहे. निधी अभावी हा अनुशेष सातत्याने वाढतो आहे. वाढत्या अनुशेषाने यंत्रणा

चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात नहर विकासाचा ६० कोटींचा अनुशेष आहे. कालवे आणि नहराची अवस्था वाईट झाली आहे. निधी अभावी हा अनुशेष सातत्याने वाढतो आहे. वाढत्या अनुशेषाने यंत्रणा आणि शेतकरी चांगलीच चक्रावली आहेत. यामुळे पाण्याअभावी शेतकरी त्रस्त झाले आहेत.मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत असलेल्या सिहोरा परिसरात ४७ गावांचा समावेश आहे. या परिसरात वैनगंगा आणि बावनथडी नद्यांचे खोरे आहे. या शिवाय शेतकऱ्यांना तारणारा विस्तीर्ण चांदपूर जलाशय आहे. या जलाशयाच्या सोबतीला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाची जोड देण्यात आली आहे. शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम करण्यासाठी नियोजन बध्द कृती आराखडा राबविण्यात आलेला आहे. या सुविधामुळे परिसरात पाणीच पाणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु शेतीला पाणी मिळत नाही. अशी बोंब शेतकऱ्यांत आहे. यात सत्यता आहे. दोष यंत्रणेचा नाही. निधी अभावी नियोजनाचे लचके तोडण्यात येत आहेत. विस्तीर्ण जलाशयाचे शेती ओलीता खाली आणण्याचे सलग्नीत क्षेत्र ७०२१ हेक्टर आर आहे. एकुण समादेश क्षेत्र १४३८ हेक्टर आर शेतीचे क्षेत्र आहे. पंरतु या समादेश क्षेत्रापर्यंत जलाशयाच्या पाण्याने आज पर्यंत मजल मारली नाही. परिसरातील गावात सिंचित क्षेत्र वाढविण्यासाठी बावनथडी नदीवर ११० कोटी खर्चून सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्प अंतर्गत लाभान्वित गावांची संख्या ३९ आहे. उर्वरित गावांचे शेतकरी लाभान्वित करण्यासाठी तसे प्रयत्न झाले नाही. या प्रकल्पाची सिंचन क्षमता ११०१० हेक्टर आर शेती आहे.या प्रकल्पाचे उपसा करण्यात आलेले पाणी चांदपुर जलाशयात साठवणुक करण्यात येत आहे. पावसाळ्यात पाण्याचा उपसा प्रकल्प करित असल्याने शेतकऱ्यांना अल्प दरात पाणी वाटप करण्यात येत आहे. जलाशय आणि प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांना संजीवनी आहे. या जलाशय अंतर्गत डावा आणि उजवा कालवा सिमेंट अस्तारीकरण झालेली आहे. पंरतु शेत शिवारात असणारा नहराची अवस्था वाईट झाली आहे. हे नहरे झुडपी झाडे तथा केरकचऱ्यांनी तुंबली आहेत. नहरे सिमेंट अस्तरीकरण करण्यात आली नाही. यामुळे पाणी वाटपात अडचण येत आहे. ऐलवर असणाऱ्या शेत शिवारात पाणी पोहचत नाही. या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी आणि खरिप हंगामात पाणी वाटप करतांना संपुर्ण क्षेत्र ओलीताखाली आणण्यासाठी पाठपुरावा केला जात नाही. रब्बी हंगामात रोटेशन पध्दतीचे तुणतुणे लोकप्रतिनिधी आणि यंत्रणा हलवित आहे. या पलीकडे कुणी विचारात करित नाही. रोटेशन पध्दत बंद करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. रोटेशन पध्दतीत डावा आणि उजवा कालवा अशी विभागणी करण्यात येत आहे. यामुळे ही पध्दत बंद करुन सबका साथ, सबका विकास असा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला पाहिजे.संपूर्ण शेती ओलीताखाली आणण्यासाठी जलाशयाचे खोलीकरण तथा नहराचे सिमेंट अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. अशी प्रतिक्रया शेतकरीचे आहेत. या विकास कार्यासाठी ६० कोटीचा अनुशेष असल्याची माहिती आहे. सध्या याला तथा त्याला निधी द्या असा सुर लोकप्रतिनिधी देत आहे. निधी देणारे तथा उपलब्ध करणारे तेच आहेत. यावरुन कुणाला आवाज देत आहेत. हेच शेतकरी आणि सामान्य जनतेला कळेनाशे झाले आहे. परिसरात यंदा पाणी वाटप करताना नहराना भगदाड पडली आहेत. पाण्याचा दुरुपयोग झालेला आहे. यामुळे नहरे चकाचक करण्याची मागणी शेतकरी करित आहेत. (वार्ताहर)