शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
3
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
4
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
5
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
6
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
7
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
8
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
9
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
10
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
11
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
12
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
13
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
14
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
15
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
16
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
17
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
18
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
19
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

२५५ शेतकरी विधवांची फरफट सुरुच

By admin | Updated: December 5, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी, धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरूच आहे़सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत भंडारा जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ त्यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १४१ आत्महत्यांची प्रकरणे पात्र ठरविले़ २५५ शेतकऱ्यांना मदतीपासून अपात्र ठरविण्यात आले़ यातील आठ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत़ पात्र १४१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी ३८ लाखांची मदत करण्यात आली़ मागील १३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, शासनाने २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अपात्रतेचा ठपका ठेवला आहे़ परिणामी, मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना मिळणाऱ्या सोई-सवलती प्राप्त होण्यास मोठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शेतकरी हिताच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याच जिवावर उठायचे असा हा खेळ आहे़ यावर्षी धानाचे उत्पादन जोमात असताना किडीचा प्रादूर्भाव, वातावरणात बदल यामुळे धानाचा उतारा कमी झाला़ एकरी १५ क्विंटल धान्य व्हायला पाहिजे. परंतु यावर्षी एकरी दोन क्विंटलपेक्षा कमी धान झाले. अ दर्जाच्या धानाला १,४६० रुपये, ब दर्जाच्या धानाला १,४१० रुपये, प्रति क्विंटल दर शासन देत आहे. समर्थन मुल्य १,४१० रुपयांप्रमाणे दोन क्विंटलचे २,८२० रुपये होतात. धान लागवडीसाठी एकरी १७ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात काहीएक उरत नाही. उलट मेहनतीचा खर्च व्यर्थ ठरतो. एकंदरीत घडाईपेक्षा मडाईतच शेतकरी होरपळला आहे.एकंदरित शासनाकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची होरपळ सुुरु आहे. नुकसानीपोटी केवळ पॅकेजची घोषणा केली जाते. हातात काहीही उरत नाही, हे वास्तव आहे. जगाच्या पोशिंद्याला मानाने जगता यावे, यासाठी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धानाला पाच हजार रुपये हमीभाव, शेतकऱ्यांना रोजगार हमीचे मजूर उपलब्ध करुन देणे, रासायनिक खते व किटकनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, आदी सोयी करणे गरजेचे आहे. परंतु, दुर्दैवाने यापैकी काहीच होत नाही. अधिवेशनाच्या तोंडावर केवळ राजकारण सुरु आहे. उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहेत.यावर्षी ४६ पैकी २० प्रकरणे अपात्रयावर्षी भंडारा जिल्ह्यात एकूण ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १८ शेतकऱ्याची आत्महत्या पात्र, तर २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अपात्र आहेत, असा अहवाल देण्यात आला़ आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणे तालुका स्तरावर प्रलंबित आहेत़ यातील सर्वाधिक ११ आत्महत्या लाखनी तालुक्यात आहेत़ प्रत्येकी ०३ आत्महत्या मोहाडी व तुमसर तालुक्यात, पवनी ०७, साकोली ०८, लाखांदूर तालुक्यात १०, भंडारा तालुक्यात ०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़