शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

२५५ शेतकरी विधवांची फरफट सुरुच

By admin | Updated: December 5, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराधानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांना घडाईपेक्षा मडाईच जास्त करावी लागत आहे. परिणामी, धानाची शेती बेभरवशाची झाली आहे. सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यापैकी २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर जिल्हा प्रशासनाने अपात्रतेचा ठपका ठेवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. विधवांचे कुंकू हरपले तरीही शासनाकडून बळीराजाची फरफट सुरूच आहे़सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु झाले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत भंडारा जिल्ह्यात ४०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली़ त्यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १४१ आत्महत्यांची प्रकरणे पात्र ठरविले़ २५५ शेतकऱ्यांना मदतीपासून अपात्र ठरविण्यात आले़ यातील आठ प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत़ पात्र १४१ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी ३८ लाखांची मदत करण्यात आली़ मागील १३ वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, शासनाने २५५ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर अपात्रतेचा ठपका ठेवला आहे़ परिणामी, मृत्यूनंतर त्यांच्या कुटूंबियांना मिळणाऱ्या सोई-सवलती प्राप्त होण्यास मोठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शेतकरी हिताच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे त्यांच्याच जिवावर उठायचे असा हा खेळ आहे़ यावर्षी धानाचे उत्पादन जोमात असताना किडीचा प्रादूर्भाव, वातावरणात बदल यामुळे धानाचा उतारा कमी झाला़ एकरी १५ क्विंटल धान्य व्हायला पाहिजे. परंतु यावर्षी एकरी दोन क्विंटलपेक्षा कमी धान झाले. अ दर्जाच्या धानाला १,४६० रुपये, ब दर्जाच्या धानाला १,४१० रुपये, प्रति क्विंटल दर शासन देत आहे. समर्थन मुल्य १,४१० रुपयांप्रमाणे दोन क्विंटलचे २,८२० रुपये होतात. धान लागवडीसाठी एकरी १७ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो. खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरात काहीएक उरत नाही. उलट मेहनतीचा खर्च व्यर्थ ठरतो. एकंदरीत घडाईपेक्षा मडाईतच शेतकरी होरपळला आहे.एकंदरित शासनाकडून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची होरपळ सुुरु आहे. नुकसानीपोटी केवळ पॅकेजची घोषणा केली जाते. हातात काहीही उरत नाही, हे वास्तव आहे. जगाच्या पोशिंद्याला मानाने जगता यावे, यासाठी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, धानाला पाच हजार रुपये हमीभाव, शेतकऱ्यांना रोजगार हमीचे मजूर उपलब्ध करुन देणे, रासायनिक खते व किटकनाशके सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणे, आदी सोयी करणे गरजेचे आहे. परंतु, दुर्दैवाने यापैकी काहीच होत नाही. अधिवेशनाच्या तोंडावर केवळ राजकारण सुरु आहे. उपाययोजना मात्र थंडबस्त्यात आहेत.यावर्षी ४६ पैकी २० प्रकरणे अपात्रयावर्षी भंडारा जिल्ह्यात एकूण ४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ यापैकी जिल्हा प्रशासनाने केवळ १८ शेतकऱ्याची आत्महत्या पात्र, तर २० शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अपात्र आहेत, असा अहवाल देण्यात आला़ आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणे तालुका स्तरावर प्रलंबित आहेत़ यातील सर्वाधिक ११ आत्महत्या लाखनी तालुक्यात आहेत़ प्रत्येकी ०३ आत्महत्या मोहाडी व तुमसर तालुक्यात, पवनी ०७, साकोली ०८, लाखांदूर तालुक्यात १०, भंडारा तालुक्यात ०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत़