शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

२२ प्रतिज्ञा म्हणजेच बौद्धांची आचारसंहिताच

By admin | Updated: May 22, 2014 00:53 IST

हजारो वर्षाच्या अस्पृश्यतेच्या दाहकतेतून मुक्तता करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिसूर्याने

लाखनी : हजारो वर्षाच्या अस्पृश्यतेच्या दाहकतेतून मुक्तता करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर या क्रांतिसूर्याने दलित, पीडित, अस्पृश्य समाजाला मुक्तपणे व स्वतंत्रतेने जीवन जगण्यासाठी भारतात रूजलेला बौद्ध धम्म दिल्याने २२ प्रतिज्ञातून बौद्धांनी आचरण केल्यास संपूर्ण जीवनच बदलून जाईल. कारण १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्माचा स्वीकार करून लाखो बांधवांना दिशा देऊन २१ प्रतिज्ञाचे आचरण करण्यास सांगितले. त्यामुळे २२ प्रतिज्ञाच बौद्धाची आचारसंहिता आहे, असे प्रतिपादन सोहळ्याचे अध्यक्ष प्रा.युवराज खोब्रागडे यांनी केले.

पंचशिल बौद्ध मंडळ कवडसी / खैरी येथील तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व बुद्ध विहाराचे अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रा.खोब्रागडे म्हणाले, बौद्ध धर्म म्हणजे हिरे, माणिक, मोत्यांची खाण आहे. ही मी तुमच्यासाठी शोधली आहे. त्यातील जवाहरांचा मुक्त वापर करा, याची आठवण करून देताना १९५६ नंतर बौद्ध धम्माविषयी आजची परिस्थिती यावर मार्गदर्शन केले. जागतीक पातळीवर बौद्ध धम्माची उपयुक्तता यावर प्रकाश टाकला.

उद्घाटक दि भंडारा डिस्ट्रीक्ट सेंट्रल को ऑप भंडाराचे संचालक विनायक बुरडे हे होते. प्रमुख अतिथी माजी पंचायत समिती सभापती दिलवर रामटेके, प्रल्हाद साखरे, हरिदास बडोले, रामकृष्ण मेश्राम, गुणीराम बोरकर, गुलाब लांजेवार, चिंधू मेश्राम, राजेंद्र खोब्रागडे, दिलीप शहारे, प्रमोद भुते, भगवान शेंडे, तुळशिराम लाडे, भाष्कर बडोले, विश्‍वनाथ बडोले, हरिश्‍चंद्र लाडे, आर.सी. फुल्लके, एन.व्ही. साखरे, भन्ते आनंद व भन्ते कश्यप आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष भाऊराव महादेव बडोले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा दान केला. तसेच मिरामंगल बडोले यांनी तथागत गौतम बुद्ध यांचा पूर्णाकृती पुतळा दान दिला.

याप्रसंगी भंतेजी व प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष भाऊराव बडोले यांनी केले तर संचालन हरिश्‍चंद्र लाडे यांनी केले आभार प्रदर्शन आर.सी. फुल्लुके यांनी केले. या कार्यक्रमानंतर कवडसी व खैरी येथील जनतेला सामुहिक भोजनाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता झाली. (तालुका प्रतिनिधी)