शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: हरियाणात मुसळधार पाऊस, पाहा व्हिडीओ
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

भगवान बुद्धांना शरण आलेल्या गणिकेचे काय झाले? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 12:36 IST

परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्या संस्कारांचा पाया भक्कम असेल, तर तो कोणीच हलवू शकणार नाही. यासाठी तुमची तत्त्व अढळ हवी. तरच तुमच्या सहवासाने दुसऱ्याचा उत्कर्ष होऊ शकतो. 

भगवान बुद्ध यांनी आपल्या शिष्यपरिवाराला एक नियम आखून दिला होता. तो म्हणजे एका गावी जास्तीत जास्त तीन दिवस मुक्काम करण्याचा! तोही राजेशाही थाटात नाही, तर एखाद्या साध्या झोपडीवजा घरात! घर मिळाले नाही, तर झाडाच्या सावलीत आश्रयाला राहायचे आणि चौथ्या दिवशी एका गावातला मुक्काम हालवून पुढच्या गावी जायचे. 

सन्यस्त जीवन जगताना ऐहिक सुखाची ओढ लागू नये, सवय लागू नये, यासाठी तो नियम होता. त्या नियमानुसार लोककार्यार्थ फिरस्तीवर गेलेल्या एका शिष्याला त्या गावातल्या गणिकेने तिच्या घरी तीन दिवस मुक्काम करण्याची विनंती केली. शिष्याने नम्रपणे तिला सांगितले, 'तसे करण्याआधी मला भगवान बुद्धांची आज्ञा मिळवायला हवी.' गणिका म्हणाली, 'ते तुम्हाला माझ्याकडे मुक्काम करण्यास नकार देतील का?'शिष्य म्हणाला, 'नाही, त्यांचा विरोध नसेल, पण तसे विचारणे माझे कर्तव्य आहे.' 

शिष्याने आपल्या सहकाऱ्याच्या हाती निरोप पाठवून भगवान बुद्धांचे उत्तर विचारले. आपला सहाध्यायी एका गणिकेच्या घरी थांबणार, तेही तीन दिवस, या विचाराने बाकी शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. भगवान बुद्ध शांत होते. त्यांनी होकार कळवळा. शिष्यांमध्ये आणखीनच बैचेनी वाढली. काही जणांनी त्या शिष्यावर पाळत ठेवायलाही सुरुवात केली. 

भगवान बुद्ध यांची परवानगी मिळाल्यावर शिष्य त्या गणिकेबरोबर राहू लागला. तो तिथे तीन दिवस राहणार होता. पहिल्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र गाण्याचे आवाज येऊ लागले. शिष्य आश्चर्य चकित झाले. त्यांनी भगवान बुद्धांना हकीकत सांगितली. भगवन शांत होते. 

दुसऱ्या दिवशी त्या घरातून दोघांच्या एकत्र नाचण्याचे आवाज येत होते. शिष्यांनी पुन्हा भगवान बुद्धांना वार्ता दिली. आश्रमात सगळेच जण अस्वस्थ होते. तिसऱ्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र नाचण्या गाण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा शिष्यांची खात्री पटली, गणिकेकडे गेलेला शिष्य आता काही सन्यस्त जीवनात परत येत नाही. 

तरीदेखील सर्वांना उत्सुकता होती चौथ्या दिवसाची. त्या दिवशी नियमानुसार शिष्य गणिकेकडचा मुक्काम हलवून आश्रमात परत आला. परंतु आश्चर्याची बाब अशी, की त्याच्या बरोबर एक साध्वी होती. ही तीच सुंदर गणिका होती, जी साध्वी वेशात भगवान बुद्धांना शरण आली होती.

भगवान बुद्धांनी तिचे स्वागत केले आणि तिचा भूतकाळ विसरून तिला नवीन आयुष्याची वाट दाखवली. त्याचवेळेस तिच्यात परिवर्तन घडवणाऱ्या शिष्याचे अभिनंदन करत म्हटले, 'तू खऱ्या अर्थाने सन्यस्त जीवन जगायला शिकला आहेस. खरा योगी तोच असतो, जो इतरांच्या सहवासात येऊन बिघडत नाही, तर बिघडलेल्या लोकांना आपल्या सहवासाने सुधारतो.' 

म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्या संस्कारांचा पाया भक्कम असेल, तर तो कोणीच हलवू शकणार नाही. यासाठी तुमची तत्त्व अढळ हवी. तरच तुमच्या सहवासाने दुसऱ्याचा उत्कर्ष होऊ शकतो.