शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांना शरण आलेल्या गणिकेचे काय झाले? वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 12:36 IST

परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्या संस्कारांचा पाया भक्कम असेल, तर तो कोणीच हलवू शकणार नाही. यासाठी तुमची तत्त्व अढळ हवी. तरच तुमच्या सहवासाने दुसऱ्याचा उत्कर्ष होऊ शकतो. 

भगवान बुद्ध यांनी आपल्या शिष्यपरिवाराला एक नियम आखून दिला होता. तो म्हणजे एका गावी जास्तीत जास्त तीन दिवस मुक्काम करण्याचा! तोही राजेशाही थाटात नाही, तर एखाद्या साध्या झोपडीवजा घरात! घर मिळाले नाही, तर झाडाच्या सावलीत आश्रयाला राहायचे आणि चौथ्या दिवशी एका गावातला मुक्काम हालवून पुढच्या गावी जायचे. 

सन्यस्त जीवन जगताना ऐहिक सुखाची ओढ लागू नये, सवय लागू नये, यासाठी तो नियम होता. त्या नियमानुसार लोककार्यार्थ फिरस्तीवर गेलेल्या एका शिष्याला त्या गावातल्या गणिकेने तिच्या घरी तीन दिवस मुक्काम करण्याची विनंती केली. शिष्याने नम्रपणे तिला सांगितले, 'तसे करण्याआधी मला भगवान बुद्धांची आज्ञा मिळवायला हवी.' गणिका म्हणाली, 'ते तुम्हाला माझ्याकडे मुक्काम करण्यास नकार देतील का?'शिष्य म्हणाला, 'नाही, त्यांचा विरोध नसेल, पण तसे विचारणे माझे कर्तव्य आहे.' 

शिष्याने आपल्या सहकाऱ्याच्या हाती निरोप पाठवून भगवान बुद्धांचे उत्तर विचारले. आपला सहाध्यायी एका गणिकेच्या घरी थांबणार, तेही तीन दिवस, या विचाराने बाकी शिष्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. भगवान बुद्ध शांत होते. त्यांनी होकार कळवळा. शिष्यांमध्ये आणखीनच बैचेनी वाढली. काही जणांनी त्या शिष्यावर पाळत ठेवायलाही सुरुवात केली. 

भगवान बुद्ध यांची परवानगी मिळाल्यावर शिष्य त्या गणिकेबरोबर राहू लागला. तो तिथे तीन दिवस राहणार होता. पहिल्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र गाण्याचे आवाज येऊ लागले. शिष्य आश्चर्य चकित झाले. त्यांनी भगवान बुद्धांना हकीकत सांगितली. भगवन शांत होते. 

दुसऱ्या दिवशी त्या घरातून दोघांच्या एकत्र नाचण्याचे आवाज येत होते. शिष्यांनी पुन्हा भगवान बुद्धांना वार्ता दिली. आश्रमात सगळेच जण अस्वस्थ होते. तिसऱ्या दिवशी त्या घरातून त्या दोघांच्या एकत्र नाचण्या गाण्याचे आवाज येऊ लागले. तेव्हा शिष्यांची खात्री पटली, गणिकेकडे गेलेला शिष्य आता काही सन्यस्त जीवनात परत येत नाही. 

तरीदेखील सर्वांना उत्सुकता होती चौथ्या दिवसाची. त्या दिवशी नियमानुसार शिष्य गणिकेकडचा मुक्काम हलवून आश्रमात परत आला. परंतु आश्चर्याची बाब अशी, की त्याच्या बरोबर एक साध्वी होती. ही तीच सुंदर गणिका होती, जी साध्वी वेशात भगवान बुद्धांना शरण आली होती.

भगवान बुद्धांनी तिचे स्वागत केले आणि तिचा भूतकाळ विसरून तिला नवीन आयुष्याची वाट दाखवली. त्याचवेळेस तिच्यात परिवर्तन घडवणाऱ्या शिष्याचे अभिनंदन करत म्हटले, 'तू खऱ्या अर्थाने सन्यस्त जीवन जगायला शिकला आहेस. खरा योगी तोच असतो, जो इतरांच्या सहवासात येऊन बिघडत नाही, तर बिघडलेल्या लोकांना आपल्या सहवासाने सुधारतो.' 

म्हणून परिस्थितीला दोष देऊ नका. तुमच्या संस्कारांचा पाया भक्कम असेल, तर तो कोणीच हलवू शकणार नाही. यासाठी तुमची तत्त्व अढळ हवी. तरच तुमच्या सहवासाने दुसऱ्याचा उत्कर्ष होऊ शकतो.