शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

देव, ऋषिमुनी, साधू 'मृत' हरणाचे, वाघाचे कातडे का वापरत, त्यामागे होते विशेष कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 12:09 IST

प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात. 

देवी देवतांकडे कधीही पहा, त्या प्रसन्न दिसतात. त्यांना पाहून आपल्यालाही प्रसन्न वाटते. म्हणून आपण देवदर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो. देवाचे नखशिखांत रूप न्याहाळतो. ते न्याहळत असताना देवाचे वस्त्र आपले लक्ष वेधून घेते. 

सरस्वतीचे शुभ्र वस्त्र, राम-सीतेची वल्कले, विष्णूंचे पितांबर, दत्तात्रेयांचे मृगाजिन, महादेवाचे व्याघ्राजिन, जगदंबेची खणाची साडी, गणरायाचे सोवळे, पांडुरंगाचे-बालाजीचे शुभ्र धोतर आपल्या लक्षात राहते. बाकीचे वस्त्रप्रकार आपणही वापरतो. पैकी मृगाजिन, व्याघ्राजिन हे वस्त्रप्रकार मात्र दत्त, महादेव वगळता साधू-संत, ऋषीमुनी वापरत असल्याचे आपण पाहिले आहे. यामागे कारण काय ते जाणून घेऊ. 

व्याघ्राजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-व्याघ्रजिन म्हणजे वाघाच्या कातड्याचे वस्त्र. व्याघ्राजिनावर बसण्याने मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धी यासारखे विकार होत नाहीत. झालेलेही नष्ट होतात. तसेच व्याघ्राजिनाजवळ सर्प, विंचू, किडेकाटे विषारी जीवजंतु येत नाहीत. त्यामुळे त्यांचे भय रानावनात निर्जन प्रदेशातही व्याघ्राजिनावर बसून ध्यानधारणा करणाऱ्यांना राहत नाही. प्राणी मेल्यानंतरसुद्धा त्यांचे गुणधर्म त्याच्या शारीरिक घटकात म्हणजे कातडे, अस्थि, केस यामध्येही राहिलेले असतात.

मृगाजिन म्हणजे काय आणि त्याचे गुणधर्म कोणते-मृगाजिनावर बसल्यानेही मूळव्याध, भगेंद्र, अंडवृद्धि यासारखे रोग नष्ट होतात. मृग हा निसर्गत: शाकाहारी सत्ववृत्तीचा प्राणी आहे. म्हणूनच तपोवनातील तपस्वी आपल्या आश्रमात मृग पाळून त्यांचा सहवास स्वीकारत असत. हरणाजिनावर बसणाराचा कामविकार शमन पावतो. इतकेच काय, पण त्यावर सतत बसल्यास नपुंसकता येते. म्हणून, तपस्वी, वानप्रस्थी, संन्यासी त्यांचा सतत उपयोग करत असत. परंतु ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी तसे नपुंसक होऊ नये, म्हणून त्यांनी मृगाजिनावर दर्भासन घ्यावे, असे श्रीकृष्णांनी सांगितले आहे. त्यायोगे कामशमन होते परंतु नपुंसकता येत नाही.

म्हणून देव, ऋषि मुनी मृगाजिन, व्याघ्राजिन परिधान करत किंवा त्याचे आसन बनवून त्यावर आसनस्थ होत तपश्चर्या करत असत.