शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:18 IST

शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.

आपल्या सगळ्यांना वाईट सवय असते. आपण एकतर भूतकाळात जगतो नाहीतर भविष्यकाळाच्या काळजीत! परंतु, या दोन्ही काळातल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. एक घडून गेलेली असते, दुसरी घडणार असते. त्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर `आज'च्या दिवसाचा मनमुराद आनंद घेणे. एका जादूगारानेही तसेच केले आणि भविष्यातले संकट कसे घालवले, त्याची ही गोष्ट!

एका जादूगाराचा लौकिक ऐकून एका देशीचा राजा त्या जादूगाराला बोलावून घेतो. जादूगार विचार करतो, राजाने स्वत:हून बोलावून घेतले आहे, म्हणजे राजा खुश झाला, तर मोठे इनाम आपल्याला देईल. म्हणून आपल्या आजवरच्या कारकिर्दीतली कोणती सगळ्यात प्रभावी जादू करून दाखवू? या विचारात त्याचे दोन दिवस गेले. 

राजाने बोलावणे पाठवले, तो दिवस उगवला. राजाचा दरबार भरला होता. जादू बघायला सगळेच उत्सुक होते. अगदी राजाही! जादुगाराने अत्यंत कुशलतेने जादू दाखवायला सुरुवात केली. उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आणि सर्वात शेवटची जादू त्याने केली. त्या जादूनुसार भर दरबारात राजाचा मुकुट जादूगाराने गायब केला. ते पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. राजाला ते अपमानास्पद वाटले. जादूगाराला हे प्रकरण अंगाशी आले. राजाने त्याला इनाम तर दूरच, पण फाशीची शिक्षा सुनावली. दोन दिवसांनी त्याला फाशी देण्यात येणार होती. 

जादूगाराने, त्याच्या बायकोने राजाकडे गयावया केली. पण उपयोग झाला नाही. जादूगार मरणाला सामोरा जाण्यासाठी सिद्ध झाला. फाशीच्या दिवशी राजा स्वत: घोड्यावर स्वार होऊन हजर झाला. जादूगार म्हणाला, `राजा, तुमचा अपमान करण्याचा माझा मानस नव्हता. तरीदेखील मी शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु माझी कला पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात होती. ती जर पूर्ण झाली असती, तर तुम्ही विराजमान झालेल्या घोड्याला पंख फुटून तुम्हालाही त्याच्यावर स्वार होऊन उडता आले असते. परंतु त्याला वर्ष लागले असते. जाऊदे, तुम्ही मला शिक्षा द्याच!'

राजाने विचार केला, एका कलाकाराला एवढी मोठी शिक्षा देणे योग्य नाही. शिवाय तो म्हणाला तसे उद्या घडले, तर इतर राजांमध्ये माझा लौकिक वाढेल. म्हणून त्याने जादूगाराला अभय दिले. जादूगार आनंदाने परत आला. त्याची बायको म्हणाली, `राजाला कशाला असा शब्द देऊन आलात? उद्या तुम्हाला जादू नाही दाखवता आली तर काय कराल?'

जादूगार म्हणाला, उद्याचे उद्या पाहू. त्या निमित्ताने मला ३६५ दिवस जगण्याची संधी मिळाली. उद्याची खात्री कोणाला आहे? मृत्यू आपल्या हातात नाही, आपण आनंदाने जगण्यावर भर देऊ.'

जादूगार म्हणाला तसेच घडले. राजाला तापाचे किरकोळ कारण झाले आणि राजाचा मृत्यू झाला. आपल्या मालकाच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या घोड्याचाही मृत्यू झाला. राजा गेला आणि घोडाही गेला. पण जादूगार बचावला. जादूगाराने तेव्हाच हातपाय गाळले असते, हार मानली असती, तर तो राजाच्या आधीच मेला असता. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.