शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जादूगाराने केली कमाल, राजाचा मुकुट झाला गहाळ; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 13:18 IST

शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.

आपल्या सगळ्यांना वाईट सवय असते. आपण एकतर भूतकाळात जगतो नाहीतर भविष्यकाळाच्या काळजीत! परंतु, या दोन्ही काळातल्या गोष्टी आपल्या हातात नसतात. एक घडून गेलेली असते, दुसरी घडणार असते. त्या गोष्टींवर आपले नियंत्रण नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर `आज'च्या दिवसाचा मनमुराद आनंद घेणे. एका जादूगारानेही तसेच केले आणि भविष्यातले संकट कसे घालवले, त्याची ही गोष्ट!

एका जादूगाराचा लौकिक ऐकून एका देशीचा राजा त्या जादूगाराला बोलावून घेतो. जादूगार विचार करतो, राजाने स्वत:हून बोलावून घेतले आहे, म्हणजे राजा खुश झाला, तर मोठे इनाम आपल्याला देईल. म्हणून आपल्या आजवरच्या कारकिर्दीतली कोणती सगळ्यात प्रभावी जादू करून दाखवू? या विचारात त्याचे दोन दिवस गेले. 

राजाने बोलावणे पाठवले, तो दिवस उगवला. राजाचा दरबार भरला होता. जादू बघायला सगळेच उत्सुक होते. अगदी राजाही! जादुगाराने अत्यंत कुशलतेने जादू दाखवायला सुरुवात केली. उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या आणि सर्वात शेवटची जादू त्याने केली. त्या जादूनुसार भर दरबारात राजाचा मुकुट जादूगाराने गायब केला. ते पाहून सगळे मोठमोठ्याने हसू लागले. राजाला ते अपमानास्पद वाटले. जादूगाराला हे प्रकरण अंगाशी आले. राजाने त्याला इनाम तर दूरच, पण फाशीची शिक्षा सुनावली. दोन दिवसांनी त्याला फाशी देण्यात येणार होती. 

जादूगाराने, त्याच्या बायकोने राजाकडे गयावया केली. पण उपयोग झाला नाही. जादूगार मरणाला सामोरा जाण्यासाठी सिद्ध झाला. फाशीच्या दिवशी राजा स्वत: घोड्यावर स्वार होऊन हजर झाला. जादूगार म्हणाला, `राजा, तुमचा अपमान करण्याचा माझा मानस नव्हता. तरीदेखील मी शिक्षा भोगायला तयार आहे. परंतु माझी कला पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात होती. ती जर पूर्ण झाली असती, तर तुम्ही विराजमान झालेल्या घोड्याला पंख फुटून तुम्हालाही त्याच्यावर स्वार होऊन उडता आले असते. परंतु त्याला वर्ष लागले असते. जाऊदे, तुम्ही मला शिक्षा द्याच!'

राजाने विचार केला, एका कलाकाराला एवढी मोठी शिक्षा देणे योग्य नाही. शिवाय तो म्हणाला तसे उद्या घडले, तर इतर राजांमध्ये माझा लौकिक वाढेल. म्हणून त्याने जादूगाराला अभय दिले. जादूगार आनंदाने परत आला. त्याची बायको म्हणाली, `राजाला कशाला असा शब्द देऊन आलात? उद्या तुम्हाला जादू नाही दाखवता आली तर काय कराल?'

जादूगार म्हणाला, उद्याचे उद्या पाहू. त्या निमित्ताने मला ३६५ दिवस जगण्याची संधी मिळाली. उद्याची खात्री कोणाला आहे? मृत्यू आपल्या हातात नाही, आपण आनंदाने जगण्यावर भर देऊ.'

जादूगार म्हणाला तसेच घडले. राजाला तापाचे किरकोळ कारण झाले आणि राजाचा मृत्यू झाला. आपल्या मालकाच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या घोड्याचाही मृत्यू झाला. राजा गेला आणि घोडाही गेला. पण जादूगार बचावला. जादूगाराने तेव्हाच हातपाय गाळले असते, हार मानली असती, तर तो राजाच्या आधीच मेला असता. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहायचे आणि आजचा दिवस मजेत घालवायचा, हेच ध्येय ठेवायचे.