शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Haritalika Teej 2024: हरितालिकेच्या पूजेत सखी-पार्वतीला वाहिली जाणारी पत्री कोणती? तिचा उपयोग जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:00 IST

Haritalika Teej 2024: निसर्गाशी नाते जुळावे आणि वनौषधींची माहिती मिळावी म्हणून पत्री आणून ती वाहिली जाते, त्याबद्दल जाणून घेऊ. 

श्रावण महिना आणि त्यानंतर येणाऱ्या सणांच्या दिवशी पूजेसाठी अनेक वनस्पती वापरल्या जातात. विशेषतः गौरी गणपतीला आणि त्याआधी हरतालिकेच्या पूजेला पत्री वापरली जाते. सध्या बाजारात पैसे दिले की पत्री आयती विकत मिळते. पूर्वी रानात जाऊन पूजेसाठी लागणारी पत्री गोळा केली जाई. त्यामुळे आपसूकच सगळ्या झाडांशी परिचय होत असे. कोणती वनौषधी कुठे वापरली जाते, याची माहिती मिळे. आता ही माहिती फक्त गुगलवर वाचायला मिळते. म्हणून हरितालिकेला वाहिली जाणारी पत्री आधी नीट बघून घ्या, जाणून घ्या, तिचा वापर कसा आणि कुठे केला जातो ते पहा आणि मग वाहा!

 पत्री म्हणून गोळा केलेल्या वनस्पती आता दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. मुंबईच्या बाजारात या वनस्पती विक्रीसाठी येतात मात्र तुलनेने हे प्रमाण कमी आहे. शिवाय त्यासाठी पैसे मोजावे लागतात ते वेगळे. पैसे मोजूनही त्या वनस्पती मिळतील की नाही? याचीही शाश्वती नसते. कारण अशा वनस्पती ओरबडल्याने त्या औषधालाही राहतील की नाही? याची शंका वनस्पती तज्ज्ञ मांडतात. त्यामुळे जैवविविधता आपणच टिकवली आणि वाढवली पाहिजे हा संदेश त्यातून लक्षात घेतला पाहिजे. 

चला जाणून घेऊया पत्री आणि तिचा वापर : 

  • तुळस - तुळशीमध्ये दाहक विरोधी आणि कफ पाडणारे गुणधर्म आहेत. ज्यामुळे ते श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते.
  • धोत्रा - कानाचे दुखणे, सूज या समस्यांमध्ये धोतऱ्याच्या फळाचा उपयोग होतो. धोतऱ्याच्या फळात अँटी इन्फ्लेमेट्री आणि अँटीसेप्टिकचे गुण असतात.
  • आघाडा - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर. दात दुखत, हलत असतील तर आघाड्याच्या काड्यांचा व पानांचा रस दातांना चोळतात.
  • डोरली -  दाढ किडल्यास, ज्वरावर, मुत्राघातावर, खोकल्यावर, दम्यामध्ये, श्वासनलिकेची सूज, फुप्फुसाची सूज, श्वसनाचे विकार सर्दी, पडसे, खोकला, दमा, स्वरभंग, जीर्णज्वर अशा विकारांवर काटे रिंगणी फार उपयोगी ठरते.
  • शमी - औषधी म्हणून दमा, कोड व मनोविकारामध्ये सालीची पूड, काढा गुणकारी असल्याचे ऐकण्यात आहे.
  • माका - माका मुख्य क्रिया यकृतावर होत असते. यकृताची विनिमयक्रिया सुधारते, पित्तस्राव नीट होतो, आमाशयांतील आणि पक्वाशयांतील पचनक्रिया सुधारते.  
  • गोकर्णी - वनस्पती शीतल, मूत्रल व कृमिनाशक असते. डोळ्यांचे विकार व डोकेदुखी यांवर वेदनाशामक म्हणून मूळ उपयुक्त असते.

औषधी गुणधर्मयुक्त वनस्पती आपला पारंपरिक ठेवा आहेत. त्या अतिरिक्त प्रमाणात तोडल्याने हळूहळू लुप्त होऊन जातील आणि आपलेच नुकसान होईल. वनस्पती स्थानिक जैव साखळीचा महत्त्वाचा दुवा आहेत. अनेक प्रकारचे मातीमध्ये असलेले सूक्ष्म जंतू, वनस्पतीवर अवलंबून असलेले कीटक, धान्य पिकावर वाढणाऱ्या किडी नियंत्रित करणारे मित्र किटक, फुलपाखरे, पक्षी यांनी मिळून अन्न साखळी व जैव साखळी यांचा समतोल निसर्ग साधतो. त्यामुळे या वनस्पती जपल्या पाहिजेत. संवर्धन केले पाहिजे.

- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक, मुंबई महापालिका

टॅग्स :Hartalika Vratहरतालिका व्रतGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३Ganesh Mahotsavगणेशोत्सव