शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
5
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
6
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
7
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
8
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
9
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
10
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
11
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
12
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
13
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
14
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
15
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
16
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
17
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
18
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
19
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
20
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...

'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:06 IST

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात.

सद्यस्थिती पाहता हे भयावह चित्र आणखी कुठवर पाहायचे, याचा अदमास लागत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, नातेसंबंधांनी दुरावलेल्या, एका छताखाली असून मनाने विभक्त झालेल्या व्यक्ती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित राहतील का, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा कवि ग्रेस यांची सुप्रसिद्ध कविता ओठावर येते, 'भय इथले संपत नाही...!'

कवि ग्रेस यांच्या कविता थोड्या अनवट वळणाच्या, गूढ अर्थाच्या आणि सर्वसामान्यांना बोजड वाटतील अशा! पण सर्वांना आकलन व्हावे, असा रचनाकाराचा आग्रह नसतोच मुळी! कविमन मूळातच संवेदनशील. व्याकरणाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून न घेणारे, भावभावनांची मुक्त शाब्दिक उधळण करणारे, तरी मनामनाला भिडणारे! ग्रेस यांच्या कविताही अशाच 'ग्रेसफुल' होत्या. पैकी सर्वांना आवडणारी ही कविता. त्याचे भावगीतात रुपांतर केले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि त्या शब्दात प्राण फुंकले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी!

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. पण तेही दुरावले, तर जगण्याचे भय वाटू लागते आणि ते भय आणखी किती काळ टिकून राहील याची शाश्वती नसते. एकवेळ दिवस निघून जातो, परंतु संध्याकाळ हुरहूर लावणारी असते. तिलाच 'कातरवेळ' असेही म्हणतात. त्या संधीप्रकाशात आठवते, जीवनगाणे...

अवतीभोवती निसर्गसौंदर्य आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मन शांत असायला हवे ना? निसर्ग मानवाला घडवतो, समृद्ध करतो, या मातीतून जन्माला आलो या मातीतच आपला शेवट आहे, याची शिकवण देतो. परंतु ते शिकण्यासाठी कोणी सोबती, सखा, सवंगडी हवा! कारण, हा प्रवास एकट्याने करणे शक्य नाही...

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहे असे म्हणतात. पण कवीमनाला विचारले, तर `जगण्याचे बळ देणारे शब्द' ही एवढीच मानवाची खरी भूक आहे, असे ते सांगेल. कौतुकाच्या, धीराच्या, प्रेमाच्या, सहानुभूतीच्या शब्दांसाठीच मनुष्य आयुष्यभर झुरत असतो. ते वेळच्या वेळी मिळणेही गरजेचे आहे. शब्द जगायला प्रेरणा देतात. ध्येय देतात. संकटाशी लढण्याचे बळ देतात. म्हणून तर अशोकवनात सर्व असूरांमध्ये राहूनही सीतेचे मनोबल खचले नाही. राम येतील, हे आश्वासक शब्द तिला जगण्याची उभारी देत होते.

या जगाात दु:खाची कमतरता नाही. आपले दु:खं सांगायला जावे, तर समोरच्याकडे आपल्याहून अधिक दु:खाचा डोंगर असतो. कोणाजवळ मन मोकळे करावे, ही मोठी व्यथा असते. शांतपणे आपले दु:खं ऐकून घेणारी, आपल्याला `लढ म्हणणारी', केवळ नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून आपले दु:ख समजून घेणारी व्यक्ती दुरावते, तेव्हा भयाचा काळोख अधिक गडद होत जातो.

पण हे चित्र आता आणखी नको. भय आता संपावे आणि नवचैतन्याची पहाट यावी, हीच प्रार्थना!