शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:06 IST

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात.

सद्यस्थिती पाहता हे भयावह चित्र आणखी कुठवर पाहायचे, याचा अदमास लागत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, नातेसंबंधांनी दुरावलेल्या, एका छताखाली असून मनाने विभक्त झालेल्या व्यक्ती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित राहतील का, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा कवि ग्रेस यांची सुप्रसिद्ध कविता ओठावर येते, 'भय इथले संपत नाही...!'

कवि ग्रेस यांच्या कविता थोड्या अनवट वळणाच्या, गूढ अर्थाच्या आणि सर्वसामान्यांना बोजड वाटतील अशा! पण सर्वांना आकलन व्हावे, असा रचनाकाराचा आग्रह नसतोच मुळी! कविमन मूळातच संवेदनशील. व्याकरणाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून न घेणारे, भावभावनांची मुक्त शाब्दिक उधळण करणारे, तरी मनामनाला भिडणारे! ग्रेस यांच्या कविताही अशाच 'ग्रेसफुल' होत्या. पैकी सर्वांना आवडणारी ही कविता. त्याचे भावगीतात रुपांतर केले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि त्या शब्दात प्राण फुंकले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी!

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. पण तेही दुरावले, तर जगण्याचे भय वाटू लागते आणि ते भय आणखी किती काळ टिकून राहील याची शाश्वती नसते. एकवेळ दिवस निघून जातो, परंतु संध्याकाळ हुरहूर लावणारी असते. तिलाच 'कातरवेळ' असेही म्हणतात. त्या संधीप्रकाशात आठवते, जीवनगाणे...

अवतीभोवती निसर्गसौंदर्य आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मन शांत असायला हवे ना? निसर्ग मानवाला घडवतो, समृद्ध करतो, या मातीतून जन्माला आलो या मातीतच आपला शेवट आहे, याची शिकवण देतो. परंतु ते शिकण्यासाठी कोणी सोबती, सखा, सवंगडी हवा! कारण, हा प्रवास एकट्याने करणे शक्य नाही...

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहे असे म्हणतात. पण कवीमनाला विचारले, तर `जगण्याचे बळ देणारे शब्द' ही एवढीच मानवाची खरी भूक आहे, असे ते सांगेल. कौतुकाच्या, धीराच्या, प्रेमाच्या, सहानुभूतीच्या शब्दांसाठीच मनुष्य आयुष्यभर झुरत असतो. ते वेळच्या वेळी मिळणेही गरजेचे आहे. शब्द जगायला प्रेरणा देतात. ध्येय देतात. संकटाशी लढण्याचे बळ देतात. म्हणून तर अशोकवनात सर्व असूरांमध्ये राहूनही सीतेचे मनोबल खचले नाही. राम येतील, हे आश्वासक शब्द तिला जगण्याची उभारी देत होते.

या जगाात दु:खाची कमतरता नाही. आपले दु:खं सांगायला जावे, तर समोरच्याकडे आपल्याहून अधिक दु:खाचा डोंगर असतो. कोणाजवळ मन मोकळे करावे, ही मोठी व्यथा असते. शांतपणे आपले दु:खं ऐकून घेणारी, आपल्याला `लढ म्हणणारी', केवळ नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून आपले दु:ख समजून घेणारी व्यक्ती दुरावते, तेव्हा भयाचा काळोख अधिक गडद होत जातो.

पण हे चित्र आता आणखी नको. भय आता संपावे आणि नवचैतन्याची पहाट यावी, हीच प्रार्थना!