शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:06 IST

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात.

सद्यस्थिती पाहता हे भयावह चित्र आणखी कुठवर पाहायचे, याचा अदमास लागत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, नातेसंबंधांनी दुरावलेल्या, एका छताखाली असून मनाने विभक्त झालेल्या व्यक्ती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित राहतील का, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा कवि ग्रेस यांची सुप्रसिद्ध कविता ओठावर येते, 'भय इथले संपत नाही...!'

कवि ग्रेस यांच्या कविता थोड्या अनवट वळणाच्या, गूढ अर्थाच्या आणि सर्वसामान्यांना बोजड वाटतील अशा! पण सर्वांना आकलन व्हावे, असा रचनाकाराचा आग्रह नसतोच मुळी! कविमन मूळातच संवेदनशील. व्याकरणाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून न घेणारे, भावभावनांची मुक्त शाब्दिक उधळण करणारे, तरी मनामनाला भिडणारे! ग्रेस यांच्या कविताही अशाच 'ग्रेसफुल' होत्या. पैकी सर्वांना आवडणारी ही कविता. त्याचे भावगीतात रुपांतर केले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि त्या शब्दात प्राण फुंकले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी!

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. पण तेही दुरावले, तर जगण्याचे भय वाटू लागते आणि ते भय आणखी किती काळ टिकून राहील याची शाश्वती नसते. एकवेळ दिवस निघून जातो, परंतु संध्याकाळ हुरहूर लावणारी असते. तिलाच 'कातरवेळ' असेही म्हणतात. त्या संधीप्रकाशात आठवते, जीवनगाणे...

अवतीभोवती निसर्गसौंदर्य आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मन शांत असायला हवे ना? निसर्ग मानवाला घडवतो, समृद्ध करतो, या मातीतून जन्माला आलो या मातीतच आपला शेवट आहे, याची शिकवण देतो. परंतु ते शिकण्यासाठी कोणी सोबती, सखा, सवंगडी हवा! कारण, हा प्रवास एकट्याने करणे शक्य नाही...

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहे असे म्हणतात. पण कवीमनाला विचारले, तर `जगण्याचे बळ देणारे शब्द' ही एवढीच मानवाची खरी भूक आहे, असे ते सांगेल. कौतुकाच्या, धीराच्या, प्रेमाच्या, सहानुभूतीच्या शब्दांसाठीच मनुष्य आयुष्यभर झुरत असतो. ते वेळच्या वेळी मिळणेही गरजेचे आहे. शब्द जगायला प्रेरणा देतात. ध्येय देतात. संकटाशी लढण्याचे बळ देतात. म्हणून तर अशोकवनात सर्व असूरांमध्ये राहूनही सीतेचे मनोबल खचले नाही. राम येतील, हे आश्वासक शब्द तिला जगण्याची उभारी देत होते.

या जगाात दु:खाची कमतरता नाही. आपले दु:खं सांगायला जावे, तर समोरच्याकडे आपल्याहून अधिक दु:खाचा डोंगर असतो. कोणाजवळ मन मोकळे करावे, ही मोठी व्यथा असते. शांतपणे आपले दु:खं ऐकून घेणारी, आपल्याला `लढ म्हणणारी', केवळ नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून आपले दु:ख समजून घेणारी व्यक्ती दुरावते, तेव्हा भयाचा काळोख अधिक गडद होत जातो.

पण हे चित्र आता आणखी नको. भय आता संपावे आणि नवचैतन्याची पहाट यावी, हीच प्रार्थना!