शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

'भय इथले संपत नाही...' कवी ग्रेस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुप्रसिद्ध कवितेला उजाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 10:06 IST

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात.

सद्यस्थिती पाहता हे भयावह चित्र आणखी कुठवर पाहायचे, याचा अदमास लागत नाही. काळाच्या पडद्याआड गेलेल्या, नातेसंबंधांनी दुरावलेल्या, एका छताखाली असून मनाने विभक्त झालेल्या व्यक्ती केवळ आठवणींपुरत्या मर्यादित राहतील का, अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा कवि ग्रेस यांची सुप्रसिद्ध कविता ओठावर येते, 'भय इथले संपत नाही...!'

कवि ग्रेस यांच्या कविता थोड्या अनवट वळणाच्या, गूढ अर्थाच्या आणि सर्वसामान्यांना बोजड वाटतील अशा! पण सर्वांना आकलन व्हावे, असा रचनाकाराचा आग्रह नसतोच मुळी! कविमन मूळातच संवेदनशील. व्याकरणाच्या चौकटीत स्वत:ला अडकवून न घेणारे, भावभावनांची मुक्त शाब्दिक उधळण करणारे, तरी मनामनाला भिडणारे! ग्रेस यांच्या कविताही अशाच 'ग्रेसफुल' होत्या. पैकी सर्वांना आवडणारी ही कविता. त्याचे भावगीतात रुपांतर केले, पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि त्या शब्दात प्राण फुंकले स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी!

भयाच्या क्षणी आठवण येते, परमेश्वराची, आप्तजनांची, जिवलगांची! कारण आनंदाच्या क्षणी न बोलवता सगळे येतात, पण दु:खात, एकाकी क्षणात फक्त आपलेच सोबती असतात. पण तेही दुरावले, तर जगण्याचे भय वाटू लागते आणि ते भय आणखी किती काळ टिकून राहील याची शाश्वती नसते. एकवेळ दिवस निघून जातो, परंतु संध्याकाळ हुरहूर लावणारी असते. तिलाच 'कातरवेळ' असेही म्हणतात. त्या संधीप्रकाशात आठवते, जीवनगाणे...

अवतीभोवती निसर्गसौंदर्य आहे, परंतु त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी मन शांत असायला हवे ना? निसर्ग मानवाला घडवतो, समृद्ध करतो, या मातीतून जन्माला आलो या मातीतच आपला शेवट आहे, याची शिकवण देतो. परंतु ते शिकण्यासाठी कोणी सोबती, सखा, सवंगडी हवा! कारण, हा प्रवास एकट्याने करणे शक्य नाही...

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहे असे म्हणतात. पण कवीमनाला विचारले, तर `जगण्याचे बळ देणारे शब्द' ही एवढीच मानवाची खरी भूक आहे, असे ते सांगेल. कौतुकाच्या, धीराच्या, प्रेमाच्या, सहानुभूतीच्या शब्दांसाठीच मनुष्य आयुष्यभर झुरत असतो. ते वेळच्या वेळी मिळणेही गरजेचे आहे. शब्द जगायला प्रेरणा देतात. ध्येय देतात. संकटाशी लढण्याचे बळ देतात. म्हणून तर अशोकवनात सर्व असूरांमध्ये राहूनही सीतेचे मनोबल खचले नाही. राम येतील, हे आश्वासक शब्द तिला जगण्याची उभारी देत होते.

या जगाात दु:खाची कमतरता नाही. आपले दु:खं सांगायला जावे, तर समोरच्याकडे आपल्याहून अधिक दु:खाचा डोंगर असतो. कोणाजवळ मन मोकळे करावे, ही मोठी व्यथा असते. शांतपणे आपले दु:खं ऐकून घेणारी, आपल्याला `लढ म्हणणारी', केवळ नजरेतून, शब्दातून, स्पर्शातून आपले दु:ख समजून घेणारी व्यक्ती दुरावते, तेव्हा भयाचा काळोख अधिक गडद होत जातो.

पण हे चित्र आता आणखी नको. भय आता संपावे आणि नवचैतन्याची पहाट यावी, हीच प्रार्थना!