शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

शेतकऱ्यांनी शेती पंपाचे बिल का भरावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

आष्टी : शेती पंपाच्या वीज बिलातून जिल्ह्यासह गावाला विद्युत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश असताना व ३४ टक्के रकमेचा विनयोग ...

आष्टी : शेती पंपाच्या वीज बिलातून जिल्ह्यासह गावाला विद्युत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश असताना व ३४ टक्के रकमेचा विनयोग कसा केला जाणार हे न सांगताच वसुली सुरू आहे. तर दुसरीकडे ग्रामीण जनतेला वीज सुविधा देण्यास वारंवार टाळाटाळ केली जाते, दुर्लक्ष केले जाते. शेतपंपाचे वीज बिलाचे शेतकरी देणे लागत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरूच नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख यांनी केले आहे.

अजिमोद्दीन म्हणाले, महावितरण कंपनीने शेतीपंप वीजबिल सक्तीने वसुली सुरू केली त्यात सवलत म्हणून ३ हजार रूपये प्रमाणे रोहित्रावरील ८० टक्के शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली चालू आहे. बिल न भरल्यास रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरून ३ हजार रूपये वसूल केले जातात . ३ हजार रूपये भरणा केल्यावर वीज पुरवठा सुरळीत केला जातो. शेतकऱ्यांनी स्वतः सर्वांचे पैसे गोळा करून वायरमनकडे जमा करावे लागतात. पैसे भरणा केल्याची पावती शेतकऱ्यांना दिली जाते.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पावतीप्रमाणे भरलेल्या ३ हजार रूपयांपैकी ६६ टक्के रक्कम म्हणजेच १४८५.६६ रूपयांपैकी ३३ टक्के म्हणजे ७४२.८३ रूपये वीज बिलातून आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. तर आणखी ३३ टक्के रक्कम ७४२. ८३ रूपये आपल्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाणार असल्याने कंपनीने शेतकऱ्यांना ३ हजार रूपये भरणा पावतीवर स्पष्ट केले आहे. उरलेली ३४ टक्के रक्कम म्हणजेच १५३४. ३४ रूपये महावितरण कशासाठी वापरणार हे सांगितले नाही. म्हणजेच शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या वीज बिलातून गावचा ,जिल्ह्याचा व महावितरणचा विकास होऊ शकतो, परंतु शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत त्रास सहन करावा लागत आहे.

कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत

एकही वीज वितरण कंपनीचा कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाही. सबस्टेशन ऑपरेटर व वायरमन स्वतः तालुक्याला राहतात. गावातीलच खाजगी सहायक ठेवले आहेत. काही खाजगी सहायक गावातीलच असल्याने कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरूच नये. शेती पंपाचे वीज बिल शेतकरी देणे लागत नाही, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

-------

वायरमन साधी फ्यूज टाकून देत नाही, रोहित्र खराब झाल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन दुरूस्ती केली जाते. पोल, तारा, रोहित्र, ऑईल, डिस्क हे वायरमनचे व ऑपरेटरचे खाजगी सहायक यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना सर्वच लुटत आहेत. महावितरणने हा नवीन फंडा शेतकरी लुटण्यासाठी काढला आहे. राज्य सरकार वीज वितरण कंपनीच्या पाठीशी आहे. विरोधक नावाला आहेत. कोणीच भाष्य करत नसल्याची खंत शेतकरी नेते अजिमोद्दीन शेख यांनी व्यक्त केली.