शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शेतकऱ्यांनी शेती पंपाचे बिल का भरावे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:33 IST

आष्टी : शेती पंपाच्या वीज बिलातून जिल्ह्यासह गावाला विद्युत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश असताना व ३४ टक्के रकमेचा विनयोग ...

आष्टी : शेती पंपाच्या वीज बिलातून जिल्ह्यासह गावाला विद्युत सुविधांबाबत स्पष्ट निर्देश असताना व ३४ टक्के रकमेचा विनयोग कसा केला जाणार हे न सांगताच वसुली सुरू आहे. तर दुसरीकडे ग्रामीण जनतेला वीज सुविधा देण्यास वारंवार टाळाटाळ केली जाते, दुर्लक्ष केले जाते. शेतपंपाचे वीज बिलाचे शेतकरी देणे लागत नाही,त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरूच नये असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिमोद्दीन शेख यांनी केले आहे.

अजिमोद्दीन म्हणाले, महावितरण कंपनीने शेतीपंप वीजबिल सक्तीने वसुली सुरू केली त्यात सवलत म्हणून ३ हजार रूपये प्रमाणे रोहित्रावरील ८० टक्के शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली चालू आहे. बिल न भरल्यास रोहित्र बंद करून शेतकऱ्यांना वेठीस धरून ३ हजार रूपये वसूल केले जातात . ३ हजार रूपये भरणा केल्यावर वीज पुरवठा सुरळीत केला जातो. शेतकऱ्यांनी स्वतः सर्वांचे पैसे गोळा करून वायरमनकडे जमा करावे लागतात. पैसे भरणा केल्याची पावती शेतकऱ्यांना दिली जाते.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पावतीप्रमाणे भरलेल्या ३ हजार रूपयांपैकी ६६ टक्के रक्कम म्हणजेच १४८५.६६ रूपयांपैकी ३३ टक्के म्हणजे ७४२.८३ रूपये वीज बिलातून आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. तर आणखी ३३ टक्के रक्कम ७४२. ८३ रूपये आपल्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधांसाठी वापरली जाणार असल्याने कंपनीने शेतकऱ्यांना ३ हजार रूपये भरणा पावतीवर स्पष्ट केले आहे. उरलेली ३४ टक्के रक्कम म्हणजेच १५३४. ३४ रूपये महावितरण कशासाठी वापरणार हे सांगितले नाही. म्हणजेच शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या वीज बिलातून गावचा ,जिल्ह्याचा व महावितरणचा विकास होऊ शकतो, परंतु शेतकऱ्यांना विजेच्या बाबतीत त्रास सहन करावा लागत आहे.

कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत

एकही वीज वितरण कंपनीचा कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाही. सबस्टेशन ऑपरेटर व वायरमन स्वतः तालुक्याला राहतात. गावातीलच खाजगी सहायक ठेवले आहेत. काही खाजगी सहायक गावातीलच असल्याने कोणी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज बिल भरूच नये. शेती पंपाचे वीज बिल शेतकरी देणे लागत नाही, असे आवाहन शेख यांनी केले आहे.

-------

वायरमन साधी फ्यूज टाकून देत नाही, रोहित्र खराब झाल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन दुरूस्ती केली जाते. पोल, तारा, रोहित्र, ऑईल, डिस्क हे वायरमनचे व ऑपरेटरचे खाजगी सहायक यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना सर्वच लुटत आहेत. महावितरणने हा नवीन फंडा शेतकरी लुटण्यासाठी काढला आहे. राज्य सरकार वीज वितरण कंपनीच्या पाठीशी आहे. विरोधक नावाला आहेत. कोणीच भाष्य करत नसल्याची खंत शेतकरी नेते अजिमोद्दीन शेख यांनी व्यक्त केली.