शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

विष्णू गायकवाड गेवराई : गत तीन-चार दिवसांपासून ऊन तापत असून नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला ...

विष्णू गायकवाड

गेवराई : गत तीन-चार दिवसांपासून ऊन तापत असून नागरिकांनी त्वचारोगाबरोबरच आरोग्य सांभाळावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा सामावेश आहे.

उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्या-पिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत सर्वत्र जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. त्यमध्ये शरीराचे तापमान उच्चपातळीवर जाते योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता ही अधिक असते. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू, पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले.

अशी घ्यावी काळजी

हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स टोपी बूट व चप्पलचा वापर करावा. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तीने डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

अशक्तपणा स्थूलपणा डोकेदुखी सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाहेर कामकाज करत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.

गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करू नये

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंडपेय याचा वापर टाळावा.

दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.

गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्चप्रथिने असलेले अन्न टाळावे.

ऊन कडक तापत असल्यामुळे अशा उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे अशक्तपणा डोकेदुखी ताप येणे चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. संजय कदम, तालुका आरोग्य अधिकारी, गेवराई

उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम असल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डॉ. धनंजय माने, वैद्यकीय अधिकारी, निपाणी जवळका