शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्तरीय रेशीम शेती प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये ...

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग वाढीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांनी शेतकऱ्यांना पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी करिता कृषी प्रक्रिया उद्योग स्थापने संदर्भात मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी अर्ज दाखल करण्याचे आव्हान केले.

कृषी विद्यापीठाचे डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी तुतीच्या विविध जाती व रेशीम कीटक संगोपनाचा उत्पादन खर्च कमी करून दर्जा टिकविण्यासाठी या उद्योगासंबंधीचे विविध देश व पारंपरिक राज्यातील कौशल्य आत्मासात करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. डॉ. लटपटे म्हणाले, ‘रेशीम उद्योगात अळ्यांच्या कात टाकण्याच्या अवस्था व तुती लागवडीतील यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यामधील तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची माहिती नसल्याने उद्योगात अपयशी होणारांची संख्याही जास्त आहे. चॉकीमुळे कोष मिळण्याची शाश्वती वाढते. इतर पारंपरिक देशात खासकरून चीनमध्ये चॉकीच्या साहाय्याने कोष उत्पादन घेण्यावर भर असल्याने त्यांच्या यशाचा आलेख आपल्यापेक्षा सरस दिसतो याबाबत माहिती दिली.

रेशीम प्रक्रिया उद्योजक सचिन थोरात यांनी विपणन आणि प्रगतिशील शेतकरी संपत परळकर, सुदाम पवार यांनी स्वनुभव कथन केले.

जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही एस पवार यांनी मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्‍यासाठी शेतीपूरक व्‍यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्‍थर्य प्राप्‍त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्‍यातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असून, कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया जाण्‍याची भीती नाही. प्रत्‍येक शेतकऱ्याने दीड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे ६ ते ७ पीके घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. प्रकल्प विशेषज्ञ कृषी अतिष चाटे यांनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी तांत्रिक बाबी व योजना समजावून सांगितल्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकल्प सहायक अतिष चाटे, पी. डी. मुंडे, स्वप्निल कदम, गजानन तारळकर, जयशिव जगधने, राजकुमार मुंदडा, प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, शेतीशाळा प्रशिक्षक केशव चाटे, पांडुरंग भंडारे, लेखा सहायक सुशील धावरे, रवी शिरसाट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली.