शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

जिल्हास्तरीय रेशीम शेती प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद. - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये ...

बीड :आत्मा कृषी विभाग बीड व वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग वाढीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळआंबा येथील कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांकरिता एक दिवसीय प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे यांनी शेतकऱ्यांना पोकरा प्रकल्पांतर्गत शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी करिता कृषी प्रक्रिया उद्योग स्थापने संदर्भात मार्गदर्शन केले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पोकरा प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी अर्ज दाखल करण्याचे आव्हान केले.

कृषी विद्यापीठाचे डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी तुतीच्या विविध जाती व रेशीम कीटक संगोपनाचा उत्पादन खर्च कमी करून दर्जा टिकविण्यासाठी या उद्योगासंबंधीचे विविध देश व पारंपरिक राज्यातील कौशल्य आत्मासात करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. डॉ. लटपटे म्हणाले, ‘रेशीम उद्योगात अळ्यांच्या कात टाकण्याच्या अवस्था व तुती लागवडीतील यांत्रिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी त्यामधील तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाची माहिती नसल्याने उद्योगात अपयशी होणारांची संख्याही जास्त आहे. चॉकीमुळे कोष मिळण्याची शाश्वती वाढते. इतर पारंपरिक देशात खासकरून चीनमध्ये चॉकीच्या साहाय्याने कोष उत्पादन घेण्यावर भर असल्याने त्यांच्या यशाचा आलेख आपल्यापेक्षा सरस दिसतो याबाबत माहिती दिली.

रेशीम प्रक्रिया उद्योजक सचिन थोरात यांनी विपणन आणि प्रगतिशील शेतकरी संपत परळकर, सुदाम पवार यांनी स्वनुभव कथन केले.

जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही एस पवार यांनी मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्‍यासाठी शेतीपूरक व्‍यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्‍थर्य प्राप्‍त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्‍यातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असून, कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया जाण्‍याची भीती नाही. प्रत्‍येक शेतकऱ्याने दीड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे ६ ते ७ पीके घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले. प्रकल्प विशेषज्ञ कृषी अतिष चाटे यांनी प्रकल्पांतर्गत रेशीम उद्योग उभारणीसाठी तांत्रिक बाबी व योजना समजावून सांगितल्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रकल्प सहायक अतिष चाटे, पी. डी. मुंडे, स्वप्निल कदम, गजानन तारळकर, जयशिव जगधने, राजकुमार मुंदडा, प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर, शेतीशाळा प्रशिक्षक केशव चाटे, पांडुरंग भंडारे, लेखा सहायक सुशील धावरे, रवी शिरसाट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली.