शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

व्यसनमुक्ती केंद्रातील रुग्ण बेशुद्ध अन् कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:47 IST

रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

बीड : व्यसन सोडविण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात राहिलेली ५० वर्षीय व्यक्ती अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जिल्हा रुग्णालयात या रुग्णाला दाखल केल्यानंतर येथील तज्ज्ञांनी तपासले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला बीडमधून औरंगाबादला रेफर करण्यात आले. हा सर्व प्रकार मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता उघड झाला. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जामखेड येथील एक ५० वर्षीय इसम १८ ऑक्टोबर रोजी नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाला. त्याच्यासोबत दाखल करताना एक नातेवाईकही होते. दारू, तंबाखू, गांजाचे व्यसन असल्याचे त्यांच्या प्रवेश पत्रावर लिहिलेले आहे. तसेच येरवडा येथे उपचार घेऊन आल्याचाही उल्लेख आहे; परंतु मंगळवारी सकाळी हा रुग्ण अचानक बेशुद्ध पडला. त्याला केंद्रातीलच दोन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दाखल केले. फिजिशियनने तपासून मानसोपचार तज्ज्ञांना बोलावले. डॉ. मोहंमद मुजाहेद यांनी तपासल्यानंतर रुग्ण गंभीर असल्याचे दिसले. त्यामुळे त्याला तत्काळ औरंगाबादला रेफर केले. रेफर करेपर्यंतही हा रुग्ण शुद्धीवर आला नव्हता. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु सोबत कोणी नसल्याने तो झाला नाही, तर केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी बोलणे टाळले. रुग्ण बेशुद्ध होण्याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट असून चुकीचा आणि जास्त प्रमाणात गोळ्या खाल्ल्याने असे होऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञाची उपस्थिती बंधनकारकव्यसनमुक्ती केंद्राला आरोग्य संचालकांची परवानगी लागते. मेंटल हेल्थ ॲक्ट २०१७ नुसार शासन मान्यता आवश्यक असते. या ठिकाणी मानसोपचार तज्ज्ञ कायमस्वरूपी हजर असणे अवश्यक आहे. नार्को टेस्ट विभागाकडून याची तपासणी होणे अपेक्षित असते; परंतु बीडमध्ये असे काहीच नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच चक्कर येणे, बेशुद्ध पडण्यासारख्या घटना घडतात. याची तपासणी होणे आवश्यक आहे.

काय म्हणतात, व्यसनमुक्ती केंद्रचालकयाबाबत नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. यावर एकाने मी काहीच बोलू शकत नाही, आपण डॉ. राजकुमार गवळे यांना बोला, असा सल्ला दिला. यावर डॉ. गवळे यांना बोलल्यानंतर त्यांनी शेरकर यांना बोला, असे सांगितले. त्यानंतर शेरकर यांना संपर्क केला. यावर ते म्हणाले, आठवड्यातून एक वेळा मानसोपचार तज्ज्ञ येतात. त्यांनी दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषधी दिली जातात. मीसुद्धा बाहेर आहे. काय घडले हे मला पहावे लागेल, असे सांगितले.

नेमका रूग्ण कोण? सर्व गोंधळचनवजीवन व्यसनमुक्ती केंद्रात संबंधित रूग्ण दाखल झाला, तेव्हा त्याचे नाव वेगळेच आहे. त्याला औषधी लिहून दिलेल्या चिठ्ठीवर आणि प्रवेशासह हमीपत्रावर वेगळेच नाव असल्याचे समोर आले आहे. नातेवाईक कोण आणि रूग्ण कोण? याचाच गोंधळ उडाल्याचे या कागदपत्रांवरून दिसले. यावरून येथील कारभार ढिसाळ आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.

अधिक उपचारासाठी औरंगाबादला पाठवले अपघात विभागातून कॉल येताच मी गेलाे. रूग्ण बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला उपचार करणे आपल्याकडे शक्य नव्हते. प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्याला औरंगाबादला रेफर केले.- डॉ.मोहमंद मुजाहेद, मानसोपचार तज्ज्ञ, बीड

टॅग्स :Beedबीड