शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

ना दिशादर्शक, ना धोकादायक फलक; सा.बां.चे दुर्लक्ष, अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

वरिष्ठ अधिकारी यांनी यांकडे लक्ष देऊन होणारे अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक व धोकादायक वळणावर फलक बसवावेत, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन ...

वरिष्ठ अधिकारी यांनी यांकडे लक्ष देऊन होणारे अपघात रोखण्यासाठी दिशादर्शक व धोकादायक वळणावर फलक बसवावेत, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे आष्टी तालुका अध्यक्ष दीपक गरूड यांनी केली आहे.

बीड-धामणगाव-नगर हा राज्य महामार्ग तर बीड आष्टी नगर हा राष्ट्रीय महामार्ग आहे. दोनही रोडने मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असून, कायम वर्दळ असते. वास्तविक पाहता या दोनही रोडने संबंधित विभागाने दिशादर्शक, धोकादायक, अवघड वळण, संरक्षण भिंत, पुढे गाव आहे, असे फलक लावणे गरजेचे असताना या दोन्ही रोडवर कुठेच फलक लावलेले नसल्याने दररोज कुठे ना कुठे अपघात होऊन अनेक जणांना जखमी तर काही लोकांना जीव गमवावा लागला आहे. एवढे होऊनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष का आहे? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन हा प्रश्न सोडवून जागोजागी हे फलक लावून त्यावर तसा नामोल्लेख करावा, अशी मागणी केली जात आहे.

धोकादायक ठिकाणे

वाघळुज, धानोरा, म्हसोबावाडी, बीडसांगवी, कडा या ठिकाणी कायम अपघात

आजवर घडले आहेत. वाघळुज धानोरा, म्हसोबावाडी, बीडसांगवी या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणावर अनेक अपघात घडले आहेत. एवढेच काय तर धानोरा येथील वळणावर दहा जणांचा बळी गेला होता. तरीदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुलाचे लोखंडी पाइप गायब

या दोन्ही रस्त्यांवर असलेल्या मोठे, लहान पूल आहेत. याच पुलांना संरक्षण म्हणून लोखंडी पाइप लावले होते; पण अनेक वर्षांपासून पुलाचे लोखंडी पाइप गायब झाले असूनदेखील संबंधित विभागाने याची पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही.

आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. पी. जोरवेकर यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतला नसल्याने त्यांची बाजू घेता आली नाही.

070721\20210629_101021_14.jpg