येथील ऐतिहासिक माणिकशाह बाबाच्या जागेवरील झालेले अतिक्रमण तात्काळ काढून हद्द व खुणा निश्चित करून घ्याव्यात, या मागणीसाठी लोकतांत्रिक जनता दलाच्यावतीने जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांच्या नेतृत्वाखाली माजलगाव धरणाच्या भिंतीवर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
माजलगाव धरणामधील देवस्थान माणिकशाह बाबाची दर्गा धरण निर्मिती वेळेस १९७९ ते १९८० मध्ये पाडण्यात आली व त्यावेळी शासनाने या पवित्र देवस्थानाचे अवशेष सर्व्हे नं. ८ मध्ये ४ एकर जमीन घोषित करून याठिकाणी ठेवण्यात आले. परंतु, चिंचगव्हाण ग्रामपंचायत व माजलगाव तहसीलच्या मेहेरबानीने या देवस्थानाच्या ४ एकर जमिनीवर अतिक्रमणे वाढत गेले. याविषयी तात्कालीन सात हजार आंदोलकांनी आंदोलन करून, अटक होऊनदेखील या देवस्थानाच्या साहित्याची निगराणी करण्यात आली नाही.
चिंचगव्हाण ग्रामपंचायत अतिक्रमणधारकांचे संरक्षण करून याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची व खोटी माहिती देतात. चिंचगव्हाण पुनर्वसनमध्ये जवळपास ४३ एकर जमीन शासनाची गायरान देण्यात आली. यामध्ये मंदिर, मशीद, स्मशानभूमी, कब्रस्तान, समाज मंदिर, ईदगाह, चावडी, दर्गा यांना पुनर्वसन करण्यात आले. परंतु, दर्गा, मशीद, कब्रस्तान, ईदगाह यांची जागा कोठे गेली? असा सवालही सलीम बापू यांनी केला. शासनाने ऐतिहासिक देवस्थान माणिकशाह बाबा यांना योग्य न्याय देऊन देवस्थानची जमीन रिकामी करून ताबा देण्यात यावा. हद्द, खुणा व निश्चित करण्यात यावे, अन्यथा लोकतांत्रिक जनता दलाच्यावतीने सोमवारी सकाळी माजलगाव धरणावर सय्यद सलीम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर हे भव्य आंदोलन केले.
यावेळी नायब तहसीलदार निळेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
050721\purusttam karva_img-20210705-wa0052_14.jpg