शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
3
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
4
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
5
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
6
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
7
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
8
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
9
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
10
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
11
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
12
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
13
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
14
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
15
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
16
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
17
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
18
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
19
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
20
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न

फायर ऑडिट; सर्वच १८ आरोग्य संस्था 'नापास'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

बीड : भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्यात बीड जिल्ह्यातील ...

बीड : भंडारा येथील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या. त्यात बीड जिल्ह्यातील मोठ्या असलेल्या १८ संस्थांचे ऑडिट झाले असून एकाही संस्थेत आगीबाबत काहीच उपाययोजना नाहीत. अग्निशमन विभागाने नुकताच सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सर्वांचाच जीव धोक्यात असल्याचे दिसते.

जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह महिला, ग्रामीण, उपजिल्हा, कुटिर, वृद्धत्व अशा १८ आरोग्य संस्था आहेत. भंडारा दुर्घटनेनंतर बीडच्या अग्निशमन विभागाकडून सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करण्यात आले; परंतु, एकाही संस्थेत आगीबाबत १०० टक्के उपाययोजना दिसल्या नाहीत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास ती आटोक्यात कशी आणायची, हा प्रश्न आजही कायम आहे. अग्निशमन विभागाने नुकताच हा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला आहे. याला आठवडा उलटूनही याबाबत रुग्णालयांमध्ये उपाययोजना सुरू झाल्याचे कुठेही दिसत नाही.

काय आहेत त्रुटी?

अग्निरोगधक यंत्र आहेत परंतु, त्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे. आपत्कालीन मार्ग बंद आहेत. इलेक्ट्रीक वायरिंगचे जोड निसटलेले असून ठिणग्या पडण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी वेस्ट मटेरियार टाकलेले आहे. स्मोक डिटेक्टर नाही. या त्रुटी सर्वच आरोग्य संस्थांमध्ये असल्याचे फायर विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

लोखंडीत सुविधा आहे, पण बंद अवस्थेत

लोखंडी सावरगावच्या २० कोटींच्या इमारतीत आगीबाबत उपाययोजना केलेल्या आहेत. परंतु, त्या बंद अवस्थेत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच इमारतीच्या मागे आग लागली होती. सुदैवाने रुग्णालयापासून ती दूर अंतरावर असल्याने धोका टळला होता. असे असतानाही बीडच्या अधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही.

१२० दिवसांची मुदत

अहवाल सादर केल्यापासून १२० दिवसांत याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याबाबत अग्निशमन विभागाने महाराष्ट्र अग्निशमन व जीव संरक्षक कायदा २००६ (२००७ महा-३) नियम २००९ यातील कलम ६ व नियम ९ (१) नुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र दिले आहे.

कागदी घोडे नाचविण्यास सुरुवात

सामान्यांच्या जीविताचा प्रश्न असतानाही जिल्हा शल्यचिकित्सकांकडून बांधकाम विभागाला दुरूस्तीबाबत पत्र दिल्याचे सांगत हात झटकले आहेत. केवळ कागदी घोडे नाचविण्यात येथील अधिकारी धन्यता मानतात. त्याचा त्रास सामान्यांना होत आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्यातील दुर्दैवी घटना डोळ्यांसमाेर असतानाही बीडच्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीच गांभीर्य नसल्याचे दिसते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते म्हणाले, याबाबत बांधकाम विभागाला पत्र दिले आहे.

कोट

जिल्ह्यातील सर्वच आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट पूर्ण करून जानेवारी महिन्यातच अहवाल दिला आहे. त्यात सर्वच आरोग्य संस्थांमध्ये आगीच्या उपाययोजनांबाबत त्रुटी आढळल्या आहेत. १२० दिवसांत दुरूस्ती करावी, याबाबत पत्र दिले आहे.

बी. ए. धायतडक, प्रमुख अग्निशमन विभाग, न. प. बीड