शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

------------------------------ युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ...

------------------------------

युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण

अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुमारे २०० वृक्षांची लागवड केली आहे. मागील काही दिवसांपासून निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्पही युवकांनी केला.

--------------------------

लसीकरणाकडे कल

अंबाजोगाई: सुरुवातीच्या काळात कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज होते. मात्र आता हे गैरसमज दूर झाले असून नागरिकांकडून लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्यात येत आहे.

---------------------------

शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे

अंबाजोगाई : मृग नक्षात्राच्या सुरुवातीला पावसाची चांगली सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कली. परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिके सुकू लागल्याने, अंबाजोगाई व परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

--------------------------

वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पिकेसुद्धा चांगली आहेत. मात्र, या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. हरिणांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. घाटबोरी परिसरातही वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

-----------------------------

निधी वितरणात अडचणी

अंबाजोगाई : पंधराव्या वित्त आयोगातील निधी वितरणासाठी काही ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी यापूर्वीही निधी मिळालेला नाही. त्यात आता तांत्रिक-अडचणींमुळे निधी वितरणास खोड निर्माण होत आहे.

-------------------------------

बँकांसमोरील ग्राहकांची गर्दी कायम

अंबाजोगाई : बँकेसमोर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे पाहणीत दिसून आली. खात्यावर जमा झालेले अनुदान, शिष्यवृत्तीची रक्कम, नवीन खाते उघडणे अशा विविध कारणांसाठी ग्राहक बँकेमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

--------------------------------

उद्योगांची निर्मिती करावी

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघु उद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी देवळा येथील श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे यांनी केली आहे.