शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

------------------------------ युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी ...

------------------------------

युवकांनी माळरानावर केले वृक्षारोपण

अंबाजोगाई : तालुक्यातील डोंगरावर व मोकळ्या जागेत येथील वृक्षप्रेमी युवकांनी गावातील निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सुमारे २०० वृक्षांची लागवड केली आहे. मागील काही दिवसांपासून निसर्गाचे संतुलन बिघडले आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्पही युवकांनी केला.

--------------------------

लसीकरणाकडे कल

अंबाजोगाई: सुरुवातीच्या काळात कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांच्या मनात गैरसमज होते. मात्र आता हे गैरसमज दूर झाले असून नागरिकांकडून लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करण्यात येत आहे.

---------------------------

शेतकऱ्यांचे डोळे लागले आभाळाकडे

अंबाजोगाई : मृग नक्षात्राच्या सुरुवातीला पावसाची चांगली सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी कली. परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिके सुकू लागल्याने, अंबाजोगाई व परिसरातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

--------------------------

वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान

अंबाजोगाई : सध्या सर्वत्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पिकेसुद्धा चांगली आहेत. मात्र, या पिकांना वन्य प्राण्यांचा धोका निर्माण होत आहे. हरिणांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. घाटबोरी परिसरातही वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

-----------------------------

निधी वितरणात अडचणी

अंबाजोगाई : पंधराव्या वित्त आयोगातील निधी वितरणासाठी काही ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींना गावातील विकासकामांसाठी यापूर्वीही निधी मिळालेला नाही. त्यात आता तांत्रिक-अडचणींमुळे निधी वितरणास खोड निर्माण होत आहे.

-------------------------------

बँकांसमोरील ग्राहकांची गर्दी कायम

अंबाजोगाई : बँकेसमोर ग्राहकांची गर्दी होऊ नये, यासाठी वेगवेगळे उपाय केल्यानंतरही शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे पाहणीत दिसून आली. खात्यावर जमा झालेले अनुदान, शिष्यवृत्तीची रक्कम, नवीन खाते उघडणे अशा विविध कारणांसाठी ग्राहक बँकेमध्ये गर्दी करीत आहेत. त्यामुळे बँक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

--------------------------------

उद्योगांची निर्मिती करावी

अंबाजोगाई : दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता लॉकडाऊनमुळे बेरोजगारांमध्ये नैराश आले आहे. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे युवकांमध्ये निराशा पसरत आहे. तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत. उद्योगांचा अभाव आहे. त्यामुळे शेतीवर आधारित लघु उद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी देवळा येथील श्रमकरी ग्रुपचे रवींद्र देवरवाडे यांनी केली आहे.