शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

बीजप्रक्रिया मोहिमेला शेतकऱ्यांचा उतम प्रतिसाद - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:33 IST

गेवराई : कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोहिमा जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाचे ...

गेवराई : कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्वतयारी करताना शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी मोहिमा जाहीर केल्या आहेत. त्याप्रमाणे कृषी विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत.

सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी करूनच पेरणी करावी. त्याची प्रात्यक्षिके प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यांकडे जाऊन करून दाखवली. तसेच चांगली उगवण क्षमता असल्यास घरच्या घरीच असलेले सोयाबीनचे बियाणे पेरणीसाठी वापरावे, असे मार्गदर्शन करत बीजप्रक्रिया व रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने मंडळ कृषी अधिकारी अश्विनी म्हस्के व तालुका कृषी अधिकारी बी.टी. सोनवणे यांनी केले आहे.

२१ मे रोजी ठाकर आडगाव आणि बेलगुडवाडी येथील शेतकऱ्यांना बांधावर खत वाटप व मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच जगदीश काळे, भागवत जाधव, ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य संदीप कोकाटे, यांच्या हस्ते शेतकऱ्यांना गटामार्फत बांधावर खत वाटप करण्यात आले.

दरम्यान बियाणाची पेरणी करण्यापूर्वी बुरशीनाशक आणि रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्‍टर पी एस बी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. जेणेकरून दहा टक्के रासायनिक खतांची बचत होईल. पावसाळ्यातील खरीप पिकांची पेरणी शक्यतो बीबीएफ यंत्राद्वारे करावी. तसेच गावोगावी लावलेले जमीन सुपीकता निर्देशांक यानुसारच रासायनिक खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी सुधाकर कोकाटे, रणजित पवार, नंदकुमार पवार, ऋषिकेश पवार, सतीश पवार, बाबासाहेब पवार, संदीप पवार, विजय पांढरे, ज्ञानेश्वर पांढरे, बाबू कोकाटे यांच्यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यात तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी जातेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप पूर्वतयारी अंतर्गत गाव पातळीवर मोहीम राबविण्यात येत आहे.

===Photopath===

240521\3447img-20210524-wa0193_14.jpg