शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी ...

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी पुरवठ्यासाठी यापूर्वी लागलेले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरमुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र असून, यावर्षी देखील बोटावर मोजण्याइतके टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ५२९ गावांध्ये बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तर १९० गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना राबवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील बोअर व विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हातपंप, विहीर व बोअरची दुरुस्ती होत नसल्यामुळे सरपंच संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे, तर या आठवड्यात मागणीप्रमाणे दुरुस्ती झाली नाही तर, जिल्हाधिकारी तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुखांची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकूण ११५२ गावे, ६७४ वाड्या-वस्त्यांसाठी २०८४ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा एप्रिल महिन्यासाठी तयार करण्यात आला आहे. उपाययोजना म्हणून हा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता कमी असून, जरी गरज लागली तर शासकीय टँकरद्वरे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज देखील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे, तर टँकरमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे चित्र सद्य:स्थितीमध्ये दिसत आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे - १३९३

विहिरींमधील गाळ काढला जाणार -३९

बोअरवेलची दुरुस्ती २८१

विहीर व बोअर अधिग्रहण सुरू

ज्या गावांमध्ये शासकीय हातपंप किंवा विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून मागवण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकादा स्थळ पाहणी करून प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.

सुरुवातीला शासकीय टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा

पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यता भासेल असे चित्र नाही. मात्र, जरी तशी परिस्थिती भासली तर, शासकीय टँकरद्वारे सुरुवातीला पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर जास्त प्रमाणात टंचाई भासल्यास खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात येईल. त्याठिकाणी देखील जीपीएसच्या माध्यमातून टँकरवर लक्ष ठेवले जाणार आहे.

जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशनचा फायदा

दुष्काळाच्या काळात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार व पाणी फाऊंडेशन तसेच इतर सेवाभावी संस्थांकडून मृदा व जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यानंतर सलग झालेल्या दोन वर्षांतील पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढली असून, पाणीटंचाई कमी होणार आहे.

पाणीटंचाई समस्या भेडसावणारी गावे ११७

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार २०८४