शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

चांगल्या पावसामुळे जिल्ह्याची वाटचाल टँकरमुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी ...

बीड : जिल्ह्यात कमी पावसामुळे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतात. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात १ हजार टँकर पाणी पुरवठ्यासाठी यापूर्वी लागलेले आहेत. मात्र, मागील दोन वर्षांत झालेल्या चांगल्या पावसामुळे टँकरमुक्तीकडे बीड जिल्ह्याची वाटचाल सुरू झाल्याचे चित्र असून, यावर्षी देखील बोटावर मोजण्याइतके टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये १८ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, ५२९ गावांध्ये बोअर व विहीर अधिग्रहण करण्यात येणार आहे, तर १९० गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना राबवण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील बोअर व विहिरींची दुरुस्ती करण्याची मागणी सरपंचांच्या वतीने करण्यात आलेली आहे. याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. वेळोवेळी मागणी करून देखील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून हातपंप, विहीर व बोअरची दुरुस्ती होत नसल्यामुळे सरपंच संघटनेकडून संताप व्यक्त केला जात आहे, तर या आठवड्यात मागणीप्रमाणे दुरुस्ती झाली नाही तर, जिल्हाधिकारी तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रमुखांची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यातील एकूण ११५२ गावे, ६७४ वाड्या-वस्त्यांसाठी २०८४ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा एप्रिल महिन्यासाठी तयार करण्यात आला आहे. उपाययोजना म्हणून हा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. मात्र, टँकरची आवश्यकता भासण्याची शक्यता कमी असून, जरी गरज लागली तर शासकीय टँकरद्वरे पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाऊस चांगला झाल्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाई भासणार नाही, असा अंदाज देखील तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे, तर टँकरमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू असल्याचे चित्र सद्य:स्थितीमध्ये दिसत आहे.

जिल्ह्यातील एकूण गावे - १३९३

विहिरींमधील गाळ काढला जाणार -३९

बोअरवेलची दुरुस्ती २८१

विहीर व बोअर अधिग्रहण सुरू

ज्या गावांमध्ये शासकीय हातपंप किंवा विहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्या गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी खाजगी विहीर व बोअर अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावरून मागवण्यात आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकादा स्थळ पाहणी करून प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार आहे.

सुरुवातीला शासकीय टँकरद्वारे होणार पाणीपुरवठा

पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची आवश्यता भासेल असे चित्र नाही. मात्र, जरी तशी परिस्थिती भासली तर, शासकीय टँकरद्वारे सुरुवातीला पाणीपुरवठा केला जाणार आहे, तर जास्त प्रमाणात टंचाई भासल्यास खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात येईल. त्याठिकाणी देखील जीपीएसच्या माध्यमातून टँकरवर लक्ष ठेवले जाणार आहे.

जलयुक्त शिवार, पाणी फाऊंडेशनचा फायदा

दुष्काळाच्या काळात बीड जिल्ह्यात जलयुक्त शिवार व पाणी फाऊंडेशन तसेच इतर सेवाभावी संस्थांकडून मृदा व जलसंधारणाची कामे करण्यात आली होती. त्यानंतर सलग झालेल्या दोन वर्षांतील पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढली असून, पाणीटंचाई कमी होणार आहे.

पाणीटंचाई समस्या भेडसावणारी गावे ११७

पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणार २०८४