शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

एकमेव आधार कोरोनाने हिरावला, पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक ...

बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. मात्र, ज्या पालकांचा एकुलता एक मुलगा कोरोनाने हिरावून घेतला त्या पालकांचा आता आधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी शासनपातळीवर, तसेच सामाजिक पातळीवर संघटनांना काम करावे लागणार आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा तीव्रतेने जाणवली. ऑक्सिजन बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यानंतर झालेली प्रशासकीय यंत्रणेची धावपळ, ऑक्सिजनची जमवाजमव ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या उपाययोजनांमुळे रुग्णांवर उपचार झाले. कोविडच्या या लाटेमध्ये शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या ज्या मुलांचे आई- वडील हिरावले त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन आणि बालगृहाच्या माध्यमातून मदत करण्याचे पाऊल उचलले आहे. या मुलांना शासकीय योजनेनुसार आवश्यक ते लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षणातून मुलांचे पुनर्वसन व्हावे, हा उद्देश शासनाचा आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने ज्या मुलांचे आई- वडील दोघेही हिरावले आहेत. अशा मुलांसाठी पाच लाख रुपये मुदत ठेवीचा निर्णय घेतला. पालक हिरावलेल्या मुलांना या मदतीतून शासनाचा आधार मिळणार असला तरी ज्या कुटुंबास एकुलता एक मुलगा अथवा मुलगी गमावण्याची वेळ आली, त्या कुटुंबांतील पालकांच्या मदतीसाठी शासनाने अद्याप कुठलेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे असे पालक दुर्लक्षित राहणार का, असा प्रश्न आहे.

कोरोनामुळे एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला. त्यामुळे वयोवृद्ध पालक एकाकी पडल्याचे दिसत आहे. मध्यमवर्गीय तसेच गरीब घटकांतील पालक आर्थिकदृष्ट्या निराधार झाले. त्यांचा आधार कोण होणार, ही सामाजिक समस्या आता ऐरणीवर येणार आहे. पालकांना मानसिक व शारीरिक आधार देण्याची गरज आहे.

----

हतबलतेला आधार हवा

कोरोनामुळे अनेक कुटुंबांना बहिष्कृतासारखे जगावे लागले आहे. त्यात एकुलता एक आधार केल्यानंतर पालकांची मानसिक व शारीरिक अवस्था बिकट असते. आर्थिक कोंडी होते. नातेवाईक, शेजाऱ्याकडून वरपांगी मदत क्षणिक ठरते.

बहुतांश जण तर अशा पालकांशी संपर्कच ठेवत नाहीत, तसेच या पालकांना नातेवाइकांकडेही जाता येत नाही.

आर्थिक प्रश्न बिकट

ज्या पालकांचा कमावता मुलगा गेला ते पालक आर्थिकदृष्ट्या पूर्णत: निराधार झाले. वाढत्या वयामुळे हे पालक कामही करू शकत नाहीत. परिणामी, त्यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर आहे. वृद्धाश्रमात जायचे तर त्याचा खर्च कोण देणार, असाही प्रश्न आहे.

सामाजिक संस्थांनी पुढे यावे

एकुलता एक मुलगा गेल्याने असलेल्या पालकांना सामाजिक पातळीवर आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर कॉलनी, वसाहत, तसेच शहरातील नागरिकांकडून आवश्यक माणुसकीच्या पातळीवर सहकार्य करण्याची गरज आहे.

------------

एकाकी पडलेल्या ज्येेष्ठांना शासन यंत्रणेने आरोग्य सेवा घरपोहोच देण्याची गरज आहे. अनेक वयोवृद्ध ज्येष्ठांना बाहेर जाता येत नसल्याने घरातच राहावे लागते. त्यांना आवश्यक त्या सेवासुविधा, संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने शासनाने अशा पालकांच्या समस्या जाणून मानसिक आधार देण्याची गरज आहे. शासन सेवेतून निवृत्तीनंतरचे जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळाले तरीही मोठा आधार होईल. एकुलता एक मुलगा गमावलेल्या ज्येष्ठांना शासनाने विविध कल्याणकारी योजनांतून लाभ मिळवून देण्याची गरज आहे.

-ॲड. पांडुरंग गोरकर, अध्यक्ष, बीड जिल्हा पेन्शनर्स अँड सिनिअर सिटीझन असोसिएशन

कोरोनाचे एकूण रुग्ण - ८८,४७३

बरे झालेले - ८३,७७२

सध्या उपचार घेत असलेले - २,६३४

एकूण मृत्यू - २,०५८

-------