शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एकमेव आधार कोरोनाने हिरावला, पालकांना मदत कोण करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक ...

बीड : कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झालेल्या मुलांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने पाऊल उचलले आहे, तर अशा मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे येत आहेत. मात्र, ज्या पालकांचा एकुलता एक मुलगा कोरोनाने हिरावून घेतला त्या पालकांचा आता आधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी शासनपातळीवर, तसेच सामाजिक पातळीवर संघटनांना काम करावे लागणार आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा तीव्रतेने जाणवली. ऑक्सिजन बेडची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यानंतर झालेली प्रशासकीय यंत्रणेची धावपळ, ऑक्सिजनची जमवाजमव ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या उपाययोजनांमुळे रुग्णांवर उपचार झाले. कोविडच्या या लाटेमध्ये शून्य ते १८ वर्षांपर्यंतच्या ज्या मुलांचे आई- वडील हिरावले त्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन आणि बालगृहाच्या माध्यमातून मदत करण्याचे पाऊल उचलले आहे. या मुलांना शासकीय योजनेनुसार आवश्यक ते लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातून अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षणातून मुलांचे पुनर्वसन व्हावे, हा उद्देश शासनाचा आहे. राज्य शासनाच्या या योजनेच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने ज्या मुलांचे आई- वडील दोघेही हिरावले आहेत. अशा मुलांसाठी पाच लाख रुपये मुदत ठेवीचा निर्णय घेतला. पालक हिरावलेल्या मुलांना या मदतीतून शासनाचा आधार मिळणार असला तरी ज्या कुटुंबास एकुलता एक मुलगा अथवा मुलगी गमावण्याची वेळ आली, त्या कुटुंबांतील पालकांच्या मदतीसाठी शासनाने अद्याप कुठलेही पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्यामुळे असे पालक दुर्लक्षित राहणार का, असा प्रश्न आहे.

कोरोनामुळे एकुलता एक मुलगा मृत्युमुखी पडला. त्यामुळे वयोवृद्ध पालक एकाकी पडल्याचे दिसत आहे. मध्यमवर्गीय तसेच गरीब घटकांतील पालक आर्थिकदृष्ट्या निराधार झाले. त्यांचा आधार कोण होणार, ही सामाजिक समस्या आता ऐरणीवर येणार आहे. पालकांना मानसिक व शारीरिक आधार देण्याची गरज आहे.

----

हतबलतेला आधार हवा

कोरोनामुळे अनेक कुटुंबांना बहिष्कृतासारखे जगावे लागले आहे. त्यात एकुलता एक आधार केल्यानंतर पालकांची मानसिक व शारीरिक अवस्था बिकट असते. आर्थिक कोंडी होते. नातेवाईक, शेजाऱ्याकडून वरपांगी मदत क्षणिक ठरते.

बहुतांश जण तर अशा पालकांशी संपर्कच ठेवत नाहीत, तसेच या पालकांना नातेवाइकांकडेही जाता येत नाही.

आर्थिक प्रश्न बिकट

ज्या पालकांचा कमावता मुलगा गेला ते पालक आर्थिकदृष्ट्या पूर्णत: निराधार झाले. वाढत्या वयामुळे हे पालक कामही करू शकत नाहीत. परिणामी, त्यांच्यापुढे आर्थिक अडचणींचा डोंगर आहे. वृद्धाश्रमात जायचे तर त्याचा खर्च कोण देणार, असाही प्रश्न आहे.

सामाजिक संस्थांनी पुढे यावे

एकुलता एक मुलगा गेल्याने असलेल्या पालकांना सामाजिक पातळीवर आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे. त्याचबरोबर कॉलनी, वसाहत, तसेच शहरातील नागरिकांकडून आवश्यक माणुसकीच्या पातळीवर सहकार्य करण्याची गरज आहे.

------------

एकाकी पडलेल्या ज्येेष्ठांना शासन यंत्रणेने आरोग्य सेवा घरपोहोच देण्याची गरज आहे. अनेक वयोवृद्ध ज्येष्ठांना बाहेर जाता येत नसल्याने घरातच राहावे लागते. त्यांना आवश्यक त्या सेवासुविधा, संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने शासनाने अशा पालकांच्या समस्या जाणून मानसिक आधार देण्याची गरज आहे. शासन सेवेतून निवृत्तीनंतरचे जीवन जगणाऱ्या ज्येष्ठांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळाले तरीही मोठा आधार होईल. एकुलता एक मुलगा गमावलेल्या ज्येष्ठांना शासनाने विविध कल्याणकारी योजनांतून लाभ मिळवून देण्याची गरज आहे.

-ॲड. पांडुरंग गोरकर, अध्यक्ष, बीड जिल्हा पेन्शनर्स अँड सिनिअर सिटीझन असोसिएशन

कोरोनाचे एकूण रुग्ण - ८८,४७३

बरे झालेले - ८३,७७२

सध्या उपचार घेत असलेले - २,६३४

एकूण मृत्यू - २,०५८

-------