शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

राज्यात महाआघाडी साथ-साथ, जिल्ह्याच्या राजकारणात समन्वयाची गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:36 IST

बीड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यात राजकीय विरोध असला तरी ‘मिल बांट के’ संस्कृती रुजल्याचे दिसत आहे. ...

बीड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जिल्ह्यात राजकीय विरोध असला तरी ‘मिल बांट के’ संस्कृती रुजल्याचे दिसत आहे. समन्वयातून सोयीची गाठ बांधली गेल्याने राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना व कॉंग्रेस कोणाचीच पाठीला पाठ नसल्याचे चित्र जिल्ह्याच्या राजकारणावर कटाक्ष टाकला असता दिसून आले. राज्यात सत्तापरिवर्तनानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले. नेत्यांची विधाने, विचारधारा, राजकीय टिपणी, टीका माध्यमांतून उमटल्यानंतर विरोधाभास एक-दोन दिवसांपुरताच दिसून आला, तर जिल्ह्यातही तिन्ही पक्षांचे नेते सामंजस्याने सोयीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव सर्वाधिक दिसत असलातरी कोणाचे काम अडले किंवा झाले नाही, अशा तक्रारी सामाजिक पटलावर उमटलेल्या नाहीत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद व नगर पंचायत असो शासकीय योजनेतील कामे किंवा स्थानिक प्रश्नांवर तिन्ही पक्षातील नेतेमंडळी क्षणिक बोलतात, मात्र त्यात तीव्रता दिसलेली नाही. विरोधी पक्ष म्हणून भाजपकडून प्रासंगिक आंदोलने होत असलीतरी विरोधाची धार बोथटच जाणवते. त्यामुळे पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला महत्त्व देत सगळे पक्ष आपल्या परीने वाटचाल करीत आहेत.

पंचायत समिती

जिल्ह्यात ११ पैकी ६ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे, तर चार ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. धारूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव असला तरी कॉंग्रेसला आपल्या कामांसाठी झगडावे लागते. इतर ठिकाणी मात्र राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी, राजकीय सोयीने कामकाज करताना दिसतात. जेथे ज्याचे संख्याबळ तेथे त्या पक्षाचा प्रभाव आहे.

जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेतही सत्तांतरासाठी राष्ट्रवादीला महाविकास आघाडीमुळे तिन्ही पक्षांनी राजकीय सोयीने पदांची वाटणी करून घेतली. मात्र कॉंग्रेसच्या तीन सदस्यांपैकी दोघांनी भाजप, तर एकाने राष्ट्रवादीशी जवळीकता ठेवल्याने कॉंग्रेस नावालाच दिसते.

बीड नगरपालिका

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या बीड नगरपालिकेत क्षीरसागरांचीच सत्ता राहिली आहे. निवडून आलेल्या पक्षाचे चिन्ह हा मुद्दा केवळ तांत्रिक आहे. राज्यातील सत्तेच्या प्रवाहात राहण्यासाठी पक्ष प्रवेश तसेच नेत्यांचे पक्षबदल झाले. पालिकेत मात्र पक्षीय प्रभाव दिसून आलेला नाही. सत्ताधाऱ्यांकडून बेरजेचे राजकारण करीत संख्याबळ वाढविण्याची खेळी आणि शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे येथे सर्वच विरोध गळून बसले आहेत. स्थानिक राजकीय तडजोडींमुळे पालिकेत पक्ष हा मुद्दा गौण ठरला आहे.

तीन पक्ष; पण धोरण महाआघाडीचे

राज्यातील महाविकास आघाडीमुळे स्थानिक पातळीवरही बीड जिल्ह्यात तीन पक्ष तीन विचारांचे असलेतरी कोणीच कोणाला अडवायचे नाही, समन्वयातून विकासकामे करायची, शासन योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते एकत्र दिसत नसले तरी महाआघाडीची जी लाइन त्याच धर्तीवर जिल्ह्यातील राजकारण असा विचारप्रवाह रुजला आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर तीन पक्षांचे तीन विचार असे अद्याप पहायला मिळालेले नाही.

प्रतिसाद, सन्मान, समन्वय

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ताधारी दुसऱ्या पक्षाचे असलेतरी वेळोवेळी कामे, मागणीबाबत कॉंग्रेसला प्रतिसाद मिळालेला आहे. सन्मान मिळतो. अडचणी येत नाहीत.

- राजकिशोर मोदी, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस

------

जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्ष आमच्या सोबत आहे. जिल्ह्यातील ज्या पंचायत समित्या आमच्या ताब्यात आहेत तेथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समन्वयाने काम करत आहेत. ज्या नगरपंचायत आमच्या ताब्यात आहेत त्या ठिकाणी आम्ही समन्वयाने काम करत आहोत.

- बजरंग सोनवणे

जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड

----------