शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जळालेल्या ‘त्या’ कागदपत्रांचे आजही चटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

अविनाश मुडेगावकर लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशीच अवस्था अंबाजोगाई तालुक्यातील ...

अविनाश मुडेगावकर

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ अशीच अवस्था अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांची झाली आहे. दहा वर्षांपूर्वी अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला आग लागल्याने सर्वच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. जुने पुरावे उपलब्ध होत नसल्याने कुठलीही नवीन कागदपत्रे मिळत नाहीत. परिणामी त्या आगीचे चटके आजही निमूटपणे अनेकांना सहन करावे लागत आहेत.

दहा वर्षांपूर्वी एप्रिल २०११ मध्ये अंबाजोगाई तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला अचानक आग लागली. या आगीत तहसील कार्यालयातील ८० वर्षांपूर्वीचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले. यात प्रामुख्याने शेत जमिनीची कागदपत्रे, राष्ट्रीयत्वाचे उतारे, जात पडताळणी कागदपत्रे, दावे-प्रतिदावे, निझामकालीन कागदपत्रे, संग्रहित दस्तावेज अशी सर्व महत्त्वपूर्ण कागदपत्रे आगीत भस्मसात झाली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांना बसला आहे. तहसील कार्यालयात कोणतीही कागदपत्रे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याला जुने पुरावे सादर करावे लागतात. हे जुने पुरावेच उपलब्ध होत नसल्याने नवीन प्रमाणपत्र काढणे जिकिरीचे काम ठरते. शालेय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र काढणे महत्त्वपूर्ण ठरते. यासाठी जुन्या कागदपत्रांचा आधार घ्यायचा कसा, हा मोठा संभ्रम निर्माण होतो, तर शेतजमिनीची नावे नोंदविणे, फेरफार घेणे यासाठीही मोठ्या अडचणी येतात. न्यायालयीन कामकाजासाठी दाव्या-प्रतिदाव्यांना अनेक महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने अनेक दावे-प्रतिदावे रखडलेल्या स्थितीत आहेत.

सध्या शालेय विद्यार्थ्यांची विविध प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरू आहे. ही प्रमाणपत्रे काढण्यासाठी जुने दस्तावेज उपलब्ध होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. इतकेच नाही तर लाभधारकांना मिळालेल्या सिलिंगच्या जमिनी, इनामी जमिनी, कुळाच्या जमिनी, त्यावरील नावे अशी सगळी कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने अनेकांना स्वत:ची जमीन असूनही ती नावावर नसल्याने अधांतरी राहण्याची वेळ आली आहे. तहसील कार्यालयातूनही अशा कागदपत्रांची मागणी केल्यास तो दस्तावेज जळीत आहे, असे प्रमाणपत्र दिले जात असल्याने आता करायचे काय, असा मोठा पेच नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

....

कागदपत्रे उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू

अभिलेख कक्षात आग लागल्याने अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळाली आहेत. त्या कागदपत्रांची उपलब्धता करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जुने दावे-प्रतिदावे, न्यायालयीन प्रक्रियेत सादर केलेली अनेक कागदपत्रे उपलब्ध होऊ शकतात. या माध्यमातून जुन्या दस्तावेजांचे एकत्रीकरण सुरू असल्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-----------