शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बीड जिल्ह्यातला लॉकडाऊन रद्द करा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका ...

बीड : गेल्या वर्षभरापासून शासन-प्रशासनाकडून लावण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य गोरगरीब जनता पार मेटाकुटीस आली असून सर्वांची यातून सुटका व्हावी. आर्थिक विवंचनेतून सर्वांनी बाहेर पडावे. याकरिता आता लॉकडाऊन रद्द करा अन्यथा जनहितास्तव एआयएमआयएम पक्ष मोर्चा काढेल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांनी दिला आहे.

लॉकडाऊन रद्द करण्यासोबतच वीज बिल माफ करण्यात यावे, वीज कनेक्शन न कापता सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, लॉकडाऊनमुळे मार्च २० पासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेला आर्थिक मदत देण्यात यावी, अशा अन्य मागण्याही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. २६ मार्च २१ पासून प्रशासनाकडून लॉकडाऊन लावण्यात येत आहे. याचा छोटे-छोटे व्यापारी, मोलमजुरी करणारे कामगार-श्रमिक, रिक्षाचालक, हातगाडी चालक, फळ-भाजी विक्रेते या सर्वांच्या अर्थार्जनावर विपरित परिणाम पडला आहे. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून लावण्यात येणाऱ्या वारंवारच्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण आर्थिकदृष्ट्या पार डबघाईस आले आहे. अशा अवस्थेमध्ये जिल्हा प्रशासनाने पुन्हा जिल्ह्यात लॉकडाऊन लावल्याने यात अजून जास्त भर पडली आहे. म्हणून जनतेची होत असलेली आर्थिक कुचंबणा दूर करण्यासाठी लावण्यात आलेले लॉकडाऊन रद्द करण्यात यावे किंवा सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत उद्योग व व्यापार सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका एआयएमआयएम पक्षाची सुरुवातीपासून आहे.

प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज़ जलील, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.अब्दुल गफार कादरी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष फिरोज़ खान लाला यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पक्ष, सर्व संघटना, व्यापारी संघटना, सर्वसामान्य जनतेसोबत चर्चा करून मोर्चाची भूमिका स्पष्ट केली जाईल. सर्वांना सोबत घेत लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.शेख शफिक यांच्यासह अब्दुस सलाम, हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी, शेख मतीन, मोमिन अजहर, शेख एजाज खन्ना, अकबर कच्छी, सय्यद इलयास आदींची नावे व सह्या आहेत.

ग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावी - अधीक्षक अभियंता

महावितरण कंपनीला वीज बिलासंदर्भात एआयएमआयएम पक्षाने तिसऱ्यांदा निवेदन देऊन मोर्चाचा इशारा दिला आहे. महावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनीवरही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.