शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मंजूर पीकविमा द्यावा अन्यथा आंदोलन छेडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST

वडवणी : मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. खरीप हंगामात २०२०-२१ मध्ये ...

वडवणी : मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. खरीप हंगामात २०२०-२१ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सदर नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी व तालुका महसूल विभाग यांनी नुकसानीचे पंचनामे करून, वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून शासनास दिले. तरीदेखील गतवर्षी पीकविमा नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

मागील पीक विम्याचीच प्रतीक्षा असल्याने आता नवीन पीक विमा काढावा की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानुसार तत्कालीन हंगामातील आणेवारी ही घसरलेली होती. या सर्व बाबी पीक विमा मंजूर होण्यासाठी पुरेशा आहेत. तरीसुद्धा वडवणी तालुक्यातील वडवणी व कवडगाव महसूल मंडळात अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याकरिता चिंचोटी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी ५ जुलै रोजी तहसीलदार यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत असल्याने नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीपासून दिलासा मिळावा, याकरिता शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजना अंमलात आणली. पीकविमा योजनेने कंपन्या मालामाल होत असून, शेतकरी कंगाल होत असल्याचे चित्र आहे. तालुक्यात कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. दरवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे निसर्गकोपाच्या संकटात भरडणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्थिक कोेंडीतून सावरण्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती दिली. मागील वर्षातील पीकविमा न दिल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शेतकरी धनपाल गोंडे, महादेव गोंडे, सुमंत गोंडेसह शेतकरी यांनी दिला आहे.