शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
3
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
4
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
5
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
6
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
7
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
8
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
9
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
10
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
11
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
12
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
13
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
14
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
15
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
16
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
17
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
18
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
19
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
20
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!

ग्रामीण भागातील महिला परतल्या चुलीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:21 IST

चुलीवरच्या स्वयंपाकाने महिलांचे डोळे चुरचुरतात. छातीत धूर दाटतो. सरपणासाठी जंगलतोड होते. अशा अनेक कारणांमुळे गॅस सिलिंडरला पसंती मिळाली. तथापि, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने गावंखेड्यांतील मजूर महिला स्वयंपाकासाठी परत चुलीकडे वळल्या आहेत.

ठळक मुद्देगॅस महागला : सरपणासाठी करावी लागतेय वणवण, ५० टक्के घरी मातीच्या चुली

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : चुलीवरच्या स्वयंपाकाने महिलांचे डोळे चुरचुरतात. छातीत धूर दाटतो. सरपणासाठी जंगलतोड होते. अशा अनेक कारणांमुळे गॅस सिलिंडरला पसंती मिळाली. तथापि, दिवसेंदिवस गॅस सिलिंडरच्या किमती वाढत असल्याने गावंखेड्यांतील मजूर महिला स्वयंपाकासाठी परत चुलीकडे वळल्या आहेत.इंधन म्हणून वापरला जाणारा एलपीजी गॅस केवळ सुखी लोकांच्या घरातच प्रवेश करू शकला. शहरी भागात याची व्याप्ती ९५ टक्क््यांपर्यंत पोहोचली आहे. मात्र, ग्रामीण भागातील ५० टक्के कुटुंबांना शेगडीची बटन कशी फिरवायची, याची उत्सुकता आहे. ५० टक्के घरी मातीच्या चुलीच स्वयंपाकघराचे अधिष्ठान बनले आहे. त्यामध्ये सरपण म्हणून लाकडे, शेणाच्या गोवऱ्या व काही भागात कोळशाचा वापर केला जातो. सरपण चुलीत जळताना मोठ्या प्रमाणात धुराचे लोट ओकले जातात. निर्धूर चुलीची संकल्पनाही बहुतांश ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचलेली नाही. धुराच्या लोटात चूल फुंकताना महिलांच्या डोळ्यांतून सतत अश्रू बाहेर पडतात. त्यांना डोळ्यांचे आजार, फुफ्फुसाचे विकार, त्वचारोगांना बळी पडावे लागते. सरपणासाठी रानावनात जीव धोक्यात घालून भटकावे लागते. सुरुवातीला ज्यांनी उज्ज्वला योजनेंतर्गत स्वयंपाकाचा गॅस घेतला, त्यापैकी बहुतांश ग्रामीण कुटुंबांमध्ये तो शोभेची वस्तू म्हणून उभा आहे. एक तर जवळपास एजन्सी नाही. त्यातच अनुदान जमा होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे रोजमजुरी पाडून कोणी हा महागमोलाचा उपद्व्याप करायचा, अशी भावना महिलांमध्ये व्यक्त होऊ लागली आहे.पूर्वी गॅस सिलिंडरचे दर कमी होते. आता दिवसेंदिवस भाव वाढत आहेत. मजुरी करणाºयांनी गॅस भरून कसा आणायचा? त्यामुळे स्वयंपाकासाठी चुलीकडे वळली आहे.- शालूबाई गांवडे,तिवसामहागाईसोबत गॅसचे भाव वाढले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आमच्यापर्यंत आली नाही. चुलीसाठी इंधन आणावे लागते. अडचणी खूप आहेत. पण पर्याय नाही.- संगीता लांडगे,तिवसाशाळा चूलमुक्त कराबहुसंख्य शाळांमध्येही सरपणाचा वापर करूनच मध्यान्ह भोजन तयार केले जाते. तेथेही महिला स्वयंपाकी चुल फुंकूनच अन्न शिजवितात. शालेय परिसरात धूर पसरल्याने याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. शासनाने शाळांना अनुदानीत सिलींडरचा पुरवठा करून शाळा धुरमुक्त करण्याची मागणी होत आहे.