शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पाणीबाणी, ३७४ गावे तहानली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:27 IST

गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत भूजलाचा वारेमाप उपसा यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडत आहेत.

ठळक मुद्दे१२७ विहिरींचे अधिग्रहण : १३९ नवीन विंधन विहिरी, १८२ नळ योजनांची विशेष दुरूस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी सरासरीपेक्षा कमी पावसामुळे जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. त्यातुलनेत भूजलाचा वारेमाप उपसा यामुळे गावागावांतील जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, सध्या ३७४ गावांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे १२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले, १३९ विंधन विहिरी व कूपनलिकांची कामे सुरू आहेत, तर पाणीपुरवठ्याच्या १८२ नळयोजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखड्यात १,४२८ गावांसाठी १,७४५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. यासाठी १८ कोटींची आवश्यकता आहे. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ३७४ गावांतील उपाययोजनांना मंजुरी दिलेली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ ७८ नवीन विंधन विहिरी, ६१ कुपनलिका, असे एकूण १३९ नवीन विधंन विहिरी, कुपनलिकांना प्रसासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. यापैकी ११५ कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत.पाणीटंचाई अंतर्गत जिल्हा परिषदेकडील १०५ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीच्या कामांना व मजीप्राकडील ७७ असे एकूण १८२ नळयोजनांच्या विशेष दुरूस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेंतर्गत ७० नळयोजनांची विशेष दुरूस्तीची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. त्यापैकी ५ कामे पूर्ण झालेली आहेत. उर्वरित कामे प्रगतीत आहे. तात्पुरत्या पूरक नळयोजनांच्या ५० कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झालेली आहे. यापैकी ३६ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. अन्य कामे निविदा प्रक्रियेत आहेत. यापैकी ७ कामे पूर्ण झालेली आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ १०० गावांमध्ये १२७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. पाणीटंचाईची दाहकता वाढल्याने सद्यस्थितीत नऊ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.३८ लघु प्रकल्पांत फक्त डेडवॉटरभूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यातही दिवसा प्रचंड उष्णतामान असल्याने बाष्पीभवणाचा वेग वाढला आहे. परिणामी जिल्ह्यातील ३८ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामध्ये पिंपळगाव, सूर्यगंगा, दहिगाव धानोरा, खतिजापूर, गोंडवाघोली, सावरपाणी, टोंगलफोडी, मालखेड बासलापूर, सरस्वती, टाकळी, भिवापूर, जळका, अमदोरी, दाभेरी, बेलसावंगी, जमालपूर, रभांग, बोबटो, लवादा, सासई, बेरदा, जुटपानी, मोगर्दा आदींचा समावेश आहे.नऊ टँकरने पाणीपुरवठा : जिल्ह्यात सद्यस्थितीत ११ गावांमध्ये ९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चिखलदरा तालुक्यात पस्तलाई, भांद्री, कोयलारी, पाचडोंगरी, मनभंग, सोनापूर, सोमवारखेडा, गौरखेडा, तारूबांधा, मोर्शी तालुक्यात सावरखेड व तिवसा तालुक्यात शेंदोळा बुजरूक या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.पाण्यासाठी जागते रहो...मजीप्राचे नियोजन कोलमडलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नेमके काय सुरू आहे, हे सामान्यांना कळणे कठीण झाले आहे. सिंभोरा धरणात भरपूर जलसाठा असल्याचा दावा वारंवार केला जात आहे. असे असताना आया, बहिणींना पाण्यासाठी रात्र जागून का काढावी लागते? याचे चिंतन आता लोकप्रतिनिधींना करावे लागेल, अशी परिस्थिती शहरात उद्भवली आहे.अमरावती, बडनेरा या महानगराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा ही मजीप्राच आहे. मोर्शी नजीकच्या सिंभोरा धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी येत असून, स्थानिक तपोवन परिसरातील जलशुद्धिकरण केंद्रातून नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जातो. हल्ली शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. यात जलकुंभाचे निर्माण कार्य, नवीन जलवाहिनी टाकणे, नवीन पंप स्टेशन तयार करणे आदी कामांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे यापूर्वी मजीप्रा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठ्याने त्रस्त असलेल्या आया, बहिणींना आता पाण्यासाठी रात्र जागावी लागत आहे. नियोजित वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांच्या मुखी नळ कधी येणार? हीच चर्चा असते.रात्री ८ चा पाणी पुरवठा पहाटे ३ वाजताबडनेरा नवीवस्तीच्या आदिवासीनगर, सिंधीकॅम्प, इंदिरानगर, पंचशिलनगर आदी परिसरात रात्री ८ वाजता नियोजित वेळेनुसार पाणी पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, मंगळवारी १५ मे रोजी पहाटे ३ वाजता पाणी पुरवठा करण्याचा प्रताप मजीप्राने केला आहे. नळाला पाणी आता येईल, नंतर येईल असे म्हणत आया, बहिणींना चक्क रात्रभर जागावे लागत आहे.उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. सिंभोरा येथील वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे काही दिवस नागरिकांना त्रास सहन करावा लागेल.- किशोर रघुवंशीउपअभियंता, मजीप्रा