शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

चिखलदऱ्यात ३.८१ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प

By admin | Updated: March 5, 2017 00:18 IST

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चिखलदरा शहाराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

'वॉटर आॅडिट' बंधनकारक : ९० टक्के शासन सहभागअमरावती : महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत चिखलदरा शहाराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ३.८१ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प साकारला जाणार आहे.राज्यातील नागरी भागात मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने या प्रकल्पास २ मार्च रोजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यात ३८.७५ लाख रुपये खर्चून 'वॉटर ट्रिटमेंट प्लान', ३६.९९ लाखांचा डब्ल्यूटीपी, कालापानी, सक्कर टँकचा यात समावेश राहील. १ कोटी ५ लाख खर्चून चिखलदरा न.प. क्षेत्रात वितरण प्रणाली कार्यान्वित करण्यात येईल. ४०.५३ लाख रुपयांची संरक्षण भिंत डब्ल्यूटीपीला उभारणी जाणार आहे, तर १४.७० लाख रुपयांची तरतूद रिपेअर वर्क आॅफ एक्झिस्टिंग हब वर्कसाठी करण्यात आली आहे. या योजनेची मंजूर किंमत ३.८१ कोटी रुपये असून ९० टक्के अर्थात ३.४२ कोटी रुपये राज्य शासन देईल, तर १५ टक्के अर्थात ३८ लाख रुपये चिखलदरा नगरपालिकेला टाकावे लागतील. सदर प्रकल्पाच्या कार्यान्वयाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर टाकण्यात आली आहे. हा प्रकल्प कार्यान्वीत होत असताना चिखलदरा नगर परिषदेने नियमितपणे वॉटर आॅडिट करून घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेतील राज्य शासनाचा हिस्सा तीन टप्प्यांत देण्यात येईल. याशिवाय या मंजूर प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर ‘थर्ड पार्टी टेक्नीकल आॅडिट’ चिखलदरा नगरपरिषदेला स्वनिधीतून करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)वैकल्पिक सुधारणा मलनिस्सारण प्रकल्प हाती घेतलेल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरी भागातील सांडपाण्याचे पुन:प्रक्रिया व पुनर्वापर करण्याबाबतच्या घटकांचा समावेश त्यांच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करावा. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालकीच्या इमारतीवर पर्जन्य जलसंचय करावे. बंधनकारक सूचनाप्रकल्प मंजुरीच्या पहिल्या वर्षात नगरपरिषदेने त्यांच्या कामकाजाचे पूर्ण संगणीकरण करणे अनिवार्य राहील. यात प्रामुख्याने ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद सुधारणा याची १०० टक्के अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान ८० टक्के वसुली करणे. नागरी क्षेत्रातील गरिबांसाठी अर्थसंकल्पात विवक्षित निधीची तरतूद करणे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने, द्विलेखा नोंद पद्धती सहा महिन्यांत पूर्ण करणे आवश्यक राहील. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने त्यांच्या क्षेत्रातील मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्यास, प्रकल्प मंजुरीपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीत ते पूर्ण करणे बंधनकारक राहील. संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने ‘घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६’ च्या तरतुदीनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन उचितरीत्या करणे बंधनकारक राहील.