शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

पाणीसाठा चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:47 IST

‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

ठळक मुद्देवरूड तालुका : प्रकल्पसाठा निम्म्यावर पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून नावारूपास आलेल्या वरूड तालुक्यात जुलै महिन्यापासून नदी-नाले कोरडेच असल्याने आणि सिंचन प्रकल्पात आवश्यक जलसाठा संचयित झाला नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सिंचन विभाग सांगत आहे. वरूड तालुक्यातील प्रकल्प आचके देत असून, तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.तालुक्यात नऊ प्रकल्प असून, यावर्षी पावसाळ्यात सरासरी ४० टक्केच जलसाठा संचयित झाला. एकेकाळी जानेवारीपर्यंत वाहत्या राहणाऱ्या नदीला एकही पूर गेला नाही. आॅक्टोबर महिन्यात नऊ सिंचन प्रकल्पांपैकी जामगाव प्रकल्पात ७८.८४ व वाईमध्ये ६८.२५ टक्के जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये ५० टक्क््यांपेक्षा कमी जलसाठा असल्याने शेतकºयांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, त्याचा मागमूसही नसल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.शेकदरी प्रकल्पात १० आॅक्टोबरपर्यंत १९.८९ टक्के, पुसली प्रकल्पामध्ये १७.२४ टक्के, सातनूर प्रकल्पामध्ये ३०.४१ टक्के, पंढरी प्रकल्पामध्ये ५७.४४ टक्के, नागठाणा प्रकल्पामध्ये ४५.३१ टक्के जलसाठा आहे, तर जमालपूर व बेलसावंगी प्रकल्प कोरडे पडले आहेत. तालुक्यात २३ हजार ५०० हेक्टर शेतजमीन संत्रा लागवडीखाली असून, यापैकी २१ हजार हेक्टर जमिनीवर फळधारणा करणारी संत्राझाडे आहे. रब्बी हंगामातील गहू, चणा तसेच संत्रा आणि कपाशी, मिरची आदी बागायती पिके घेण्यात येतात. परंतु, पाणीपुरवठ्यामध्ये तुटवडा निर्माण झाला असून, विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. ओलितामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. भूगर्भातील जिरणाºया पाण्यापेक्षा उपसा अधिक प्रमाणात होत असल्याने समतोल होत नाही. पर्यायाने अतिशोषित म्हणून हा भाग वगळण्यात भूजल सर्वेक्षण विभागाला अडचण येत असल्याने जलव्यवस्थापन ही काळाची गरज झाली आहे. जलव्यवस्थापन झाले ेनाही, तर येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये १०० टक्के जलसंचय झाला होता.पाऊस २२७.९० मिमी कमीतालुक्यात १० आॅक्टोबरपर्यंत केवळ ५४० मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी हीच नोंद ७६७.९० मिमी होती. यामुळे यावर्षी २२७.९० मिमी पाऊस कमी झाला. यामुळे तालुक्यावर जलसंकटाचे ढग तयार झाले आहेत. सातत्याने अस्मानी संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पुन्हा कर्जबाजारी होण्याकडे वाटचाल असल्याचे सुतोवाच आहे.वरूड तालुका ड्रायझोनमुक्त कराअतिशोषित भूभाग घोषित झाल्याने तालुक्यात नवीन विहिरी आणि बोअर करण्यावर बंदी आहे. यामुळे शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. यावर्षीसुद्धा प्रकल्प जलसंचयित झाले नाही, तर विहिरींची पातळीसुद्धा वाढलेली नाही. संत्र्यासह सिंचनाकरिता पाणी मिळविण्याकरिता यावर्षी तरी बोअर करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.अतिविकसित क्षेत्र असल्याने उपसा मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचे पडणारे, भूगर्भात जिरणारे आणि उपसा होणारे पाणी यात समतोलाकरिता रेनवाटर हार्वेस्टिंग, विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच पाणी अडवा पाणी जिरवा अभियान राबविणे गरजेचे आहे.- डी.एम. सोनारेशाखा अभियंता