शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

ई-निविदा प्रक्रिया बदलविण्याचा अट्टाहास का?

By admin | Updated: May 21, 2016 00:10 IST

शासनाच्या सर्व विभागातील बांधकामे व इतर कामांचे अंदाजपत्रक तीन लाखांच्यावर असेल तर शासन नियमांप्रमाणे ‘ई-टेंडर’ प्रणाली राबविली जाते.

स्थानिक विकास निधी : मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देण्यासाठी दबावतंत्रगजानन मोहोड अमरावतीशासनाच्या सर्व विभागातील बांधकामे व इतर कामांचे अंदाजपत्रक तीन लाखांच्यावर असेल तर शासन नियमांप्रमाणे ‘ई-टेंडर’ प्रणाली राबविली जाते. मात्र, स्थानिक विकासनिधीची कामे असतील तर ‘ई-निविदा नको’ असा अट्टाहास लोकप्रतिनिधींद्वारा केल्या जात आहे. त्यामुळे मर्जीतील कंत्राटदारांना कामे देण्याचा मार्ग सुकर होत असला तरी कामाचा दर्जा मात्र सुमार राहण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक विकासनिधीसह शासनाच्या सर्व विभागातील बांधकामांचे अंदाजपत्रक तीन लाखांपेक्षा अधिक असल्यास ही कामे ई-टेंडर पद्धतीने होतात. मागील तीन वर्षापासून या निर्णयाद्वारे राज्यात कामे होत आ६ेत. तीन लाखांपर्यंतची कामे सुशिक्षित बेरोजगार अभियंते किंवा सहकारी मजूर सोसायटींना दिल्या जात आहेत. मात्र आता १० लाखांपर्यंतच्या कामांना ई-टेंडर नको, असा अट्टाहास राज्यातील काहींनी धरला आहे व शासनाद्वारेदेखील त्यांच्या बाजूने कौल दिला जात आहे. शासनाच्या या निर्णयामुळे निविदा प्रक्रियेतील स्पर्धा नाहीशी होऊन आमदारांच्या मर्जीतल्या ठरावीक ठेकेदारांना तसेच ज्यांना तांत्रिक ज्ञान नाही, बांधकामाचा अनुभव नाही, अशांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना कामे दिली जाण्याची शक्यता आहे. हा नियमित कंत्राटदारांवर एक प्रकारचा अन्याय आहे. अशा कंत्राटदाराकडून कामे करून घेणे अधिकाऱ्यांनाही जड जाणार आहे व यामुळे कामाचा दर्जा सुमार राहण्याची भीती निर्माण झाली आहे. बांधकाम विभागासह रस्ते, नाल्या, विहिरी, जलसंपदाची कामे, पाणीपुरवठा यांसह जी विविध कामे विविध विभागांद्वारा केली जातात. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर संबंधित आमदारांचा नेहमी दबाव असतो. आपण सांगू त्यालाच कामे द्या, असा अट्टाहास करीत आमदारांकडून अधिकाऱ्यांवर नेहमीच दबाव टाकण्यात येतो. परिणामी त्या अधिकाऱ्यांना त्यांचे अधिकार वापरता येत नाहीत. त्यामुळे कामाचा दर्जा निकृष्ट राहून तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संबंधित कंत्राटदारांना अधिकाऱ्यांनी समज दिली तर उलटपक्षी अधिकाऱ्यांवरच राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न होतो आणि त्या कामांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहात नाही. तीन लाखांवरील कामांचे ई-टेंडरिंग होत असले तरीही त्यात हस्तक्षेप करून मर्जीबाहेरच्या कंत्राटदाराला कामे मिळाली असतील तर टेंडर रद्द करण्यासाठी दबावतंत्राचा वापर अधिकाऱ्यांवर होतो. या प्रकाराचा सर्वाधिक त्रास सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना होत आहे. यामध्ये कंत्राटदारांच्या संघटनेने पुढाकार घेत या प्रकाराला विरोध करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळाल्यामुळे कामात भ्रष्टाचार होऊन कामे सुमार दर्जाची होण्याची भीती निर्माण झाली आहे.