शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

बेल नदीवरचा वसंत बंधारा मृतावस्थेत

By admin | Updated: May 21, 2016 00:12 IST

तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले.

सिंचन विभागाचे दुर्लक्ष : १६० हेक्टर सिंचन क्षमता वरूड : तालुक्यात जलसिंचनाकरिता अनेक प्रयोग करून संत्राबागा, बागायती शेती जगविण्याचे प्रयोग करण्यात आले. याच श्रुंखलेत सांवगी (जिचकार) येथील १६० हेक्टर सिंचनक्षमता असलेला बेलनदीवर वसंत बंधारा बांधण्यात आला होता तो देखभाल, दुरुस्तीअभावी मृतावस्थेत असल्याचे चित्र आहे.सन १९७१ मध्ये वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री असताना गुरूत्वाकर्षण शक्तीवर पाणी वळविण्याची योजना आणली होती. या योजनेला वसंत बंधारा असे नाव होते. परंतु ही योजना नद्या वाहत्या असल्या म्हणजेच यशस्वी होत होत्या. अलिकडच्या काळात नद्या कोरडया असल्याने वसंत बंधारे ओस पडले आहेत. परंतु सिंचन विभाग आणि लोकप्रतिनीधींना या गोष्टीचा विसर पडल्याने ४६ वर्षांपूर्वी २० हजार रूपयांत बांधलेला वसंत बंधारा बेवारस पडला आहे. तालुक्यात असे बंधारे सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे बांधण्यात आले आहेत.ड्रायझोनमुक्तीकरिता अनेक प्रयोग केले जातात. तालुक्यात ९ सिंचन प्रकल्प असून पाच ते सहा लघु आणि मध्यम प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु ४६ वर्षांपूर्वी सावंगी आणि चिंचरगव्हाण येथे सन १९७१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बारमाही वाहत्या नदीतून ‘पाणी वळवा’ प्रकल्पांतर्गत वसंत बंधारे आणले होते. काही दिवसांनी नदी कोरडी झाल्याने कालव्याची दुर्दशा झाली. सावंगीच्या वसंत बंधाऱ्याची त्या काळात केवळ २० हजार रुपयांत निर्मिती करण्यात आली होती. येथून गुरूत्वाकर्षणाव्दारे शेतात कालव्याच्या, पाटचऱ्यांच्या माध्यमातून पाणी नेऊन सिंचन केले जात होते. या बंधाऱ्याची क्षमता १६० हेक्टर जमिनीचे सिंचन करण्याची आहे. परंतु ४६ वर्षांपासून मृतावस्थेतील बंधाऱ्याकडे कुणी लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी लक्षच दिले नाही तर उलट नवनीवन प्रयोग करतात कधी श्रमदानातून तर कधी रोजगार हमी योजनेतील ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानावर काम केले जाते. परंतु आजही तालुक्यात शेकडो सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे धूळखात पडून आहेत. या बंधाऱ्याची संकल्पना आताच्या वर्धा डायव्हर्शनसारखीच होती. यातून कालवे आणि पाट काढून सिंचनाकरीता पाणी वापरात आणले जाणार होते. परंतु राजकारण्याचे दुर्लक्ष व अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे तेव्हाचे लाखो रुपये पाण्यात गेले. या बंधाऱ्यामुळे सावंगी, आमपेंड, मुसळखेडा, वाठोडा, एकदरा, ढगा, नायगांव, उदापूर, घोराड, खानापूर मेंढी, देवूतवाडा जवळपास एक हजार हेक्टर जमीन लाभक्षेत्रात येणार होती. यामुळे या परिसराचा कायापालट करण्याची योजना होती. परंतु बांधकामानंतर या बंधाऱ्याची दुर्दशा झाली भिंती, दरवाजे, पाईपलाईन ओस पडल्या. या बधांऱ्याची देखभाल दुरस्ती केली असती तर आज शेतकऱ्यांना पाणी टचांईला सामोरे जावे लागले नसते. पंरतू या बंधाऱ्याला राजाश्रय तर मिळाला नाही तर अधिकाऱ्यांनीसुद्धा कधीकाळी ढुंकून पाहिले नाही. एकीकडे वॉटर कपच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे श्रमदानातून केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन कालवा साफसफाई केली. परंतु यामध्ये पाणी येणार तरी कुठून, हा प्रश्न आहे. बंधाऱ्याच्या भिंतीला गेट नाही. पाणी अडविल्या जात नाही. केवळ राजकारणाला राजकारण करीत याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. बंधाऱ्याची देखभाल आणि दुरस्ती केल्यास याचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होऊन शेकडोे हेक्टर सिंचन केले जाऊ शकते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. यासाठी बंधाऱ्याचे पुनरूज्जीवन होणे महत्त्वाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)देखभाल,दुरुस्तीचा प्रस्ताव १० वर्षांपासून धूळखात !पाटबंधारे विभागाच्या शेकदरी सिंचन व्यवस्थापन शाखेच्यावतीने तालुक्यातील वसंत बंधारे, कोल्हापुरी बंधारे तसेच प्रकल्पाच्या देखभाल दुरस्तीकरिता केंद्रशासनाला दुरस्ती, संचय आणि नूतणीकरण अभियानामध्ये १० वर्षांपासून प्रस्ताव पाठविला आहे. परंतु केंद्रीय जलआयोगाने अद्यापही परवानगी दिली नसल्याने हा प्रस्ताव धूळ खात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास बंधाऱ्याचा कायापालट होऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.