शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण मान्यतेअभावी रखडला वासनी प्रकल्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 22:03 IST

वासनी प्रकल्प पुर्ण झाल्यास ६६९१ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. पण, या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मान्यतेचा खोडा निर्माण झाला असून, डिसेंबर २०१६ पासून सदर प्रकल्पाचे काम हे बंद आहे. पर्यावरणाच्या मान्यतेचा प्रश्न हा शासनस्तरावर प्रलंबित असून, मान्यता मिळाल्यास २४ महिन्यांत धरणाची कामे (घळभरणी) होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्दे४० टक्के धरणाची कामे प्रलंबित : ६० कोटींच्या निधीची मागणी

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वासनी प्रकल्प पुर्ण झाल्यास ६६९१ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. पण, या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मान्यतेचा खोडा निर्माण झाला असून, डिसेंबर २०१६ पासून सदर प्रकल्पाचे काम हे बंद आहे. पर्यावरणाच्या मान्यतेचा प्रश्न हा शासनस्तरावर प्रलंबित असून, मान्यता मिळाल्यास २४ महिन्यांत धरणाची कामे (घळभरणी) होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ६० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आलेली आहे.धरणाची कामे ६० टक्के पूर्ण झाली असून, जलोत्सारणीची कामेही ८० टक्के झाली आहेत. या प्रकल्पाची अद्यावत किंमत ही ७५१.६७ कोटी झाली आहे. २००८ मध्ये जेव्हा सदर प्रकल्पाच कामे सुरू करण्यात आले तेव्हा या प्रकल्पाची मूळ किंमत ही १०२.८१ कोटी होती. या प्रकल्पावर मार्च २०१८ पर्यंतच्या अहवालानुसार ५०२.७३ कोटी रुपये खर्च झाला आहे. परंतु, या प्रकल्पाच्या कामे सुरू झाल्यानंतर पर्यावरण विभागाकडून मान्यता घेणे अनिवार्य होते; तसे झाले नाही. या अनुषंगाने यासंदर्भात एक याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. त्याकारणाने सदर कामे ही थांबवावी लागली आहे.वासनी प्रकल्प हा अचलपूर तालुक्यातील वासनी बु. गावाजवळ सपन नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माती धरणाची लांबी ही २१०० मीटर व दगडी धरणाची (जलोत्सारणी) लांबी १४२ मीटर असून, महत्तम उंची १३ मीटर आहे. या प्रकल्पाच्या उजव्या बाजूकडून १३.२८ किमी लांबीचा कालवा उद्गमित होत आहे.प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील २३ गावांतील ४३१७ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पीय जलसंचय हा २२.५९ दलघमी राहणार आहे.भूसंपादनासाठी ६० कोटींची गरजप्रकल्पासाठी ७२१.१६ हेक्टर जमीन आवश्यक आहे. त्यापैकी थेट खरेदीने १४०.८५ हेक्टर संपादित करून करण्यात आली, तर भूसंपादन कायद्याने १४२.७२ हेक्टर संपादित करण्यात आली आहे. २७० हेक्टरची तीन प्रकरणे निवाडा स्तरावर असून, यासाठी ६०.१४ कोटी देणे बाकी आहे. त्यासाठी विभागाने महामंडळास मागणी केली आहे. यामध्ये २४.३६ हेक्टर वनजमीनसुद्धा संपादित करण्यात आली आहे. विभागाने पर्यावरण मान्यतेची कार्यवाही करण्यात आली असून, ही मान्यता अद्याप अप्राप्त असल्याने कामे रखडली आहेत.या कामांसाठी निधीची मागणीसन २०१८-१९ करिता ६० कोटींची अतिरिक्त पूरक मागणी करण्यात आली असून, यामध्ये धरणाच्या मुख्य कामाकरिता ७.०० कोटी, पुनर्वसन कामाकरिता ८.०० कोटी, भूसंपादनाकरिता ४०.०० कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ५.०० कोटी, अशी मागणी करण्यात आली असून, पुनर्वसन व भूसंपादनाची कामे लवकर पूर्ण झाल्यास प्रकल्पाची घळभरणी नियोजित वर्षात पूर्ण करण्यात येईल व जलसंचय होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.राज्य शासनाकडून एक ते दीड महिन्यात पर्यावरण मान्यतेचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. यानंतर प्रकल्पांची कामे पुन्हा सुरू होतील.- रमेश ढवळे,अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग