शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
3
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
4
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
5
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
6
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
7
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
8
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
9
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
10
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
11
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
12
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
13
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
14
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
15
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
16
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
17
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
18
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
19
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
20
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वंकष प्रयत्न

By admin | Updated: February 22, 2015 00:07 IST

जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.

अमरावती : जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींसह सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. येथील जिल्हा परिषदेच्या डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शिक्षण समन्वयक समितीची पहिली बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.बैठकीत शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी सर्व शिक्षा अभियान, आणि शिक्षण विभागाशी संबंधित विविध उपक्राची माहीती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे सर्व शिक्षा अभियानाची माहिती बैठकीत दिली. बैठकीच्या प्रारंभीच पालकमंत्री प्रविण पोटे यांनी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, चिखलदरा, धारणी भागात शिक्षणासह आरोग्य, वीज आदि महत्वाचे प्रश्न आहेत.याशिवाय जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्याना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. उर्दु, इंग्रजी, मराठी शाळांचा विषय महत्वाचा आहे. जिथे शिक्षक नाहीत तिथे कंत्राटी शिक्षक द्यायला पाहिजे. सीबीएससी पॅटर्न च्या शाळांत कोणते शिक्षक घ्यावयाचे यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ज्या प्रमाणात या संस्था पालकांकडुन शुल्क आकारता त्या प्रमाणात पाल्यांना शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या पाहिजेत. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याची गरज आहे असे सांगुन पोटे म्हणाले मेळघाट परिसरात चांगले शिक्षण देण्यासाठी शासनांच्या नियमांचे पालन करावे. शिक्षणाचा स्तर वाढेल, डिपीडीसी निधीमधुन शाळांना डेस्क, बेंच चांगले पुरविण्याबाबत तसेच शाळांची दुरुस्तीबाबत यावेळी चर्चा झाली. येणा?्या काळाता इमारतीमुळे किंवा शिक्षकांमुळे अडचण आली, असे प्रकार यापुढे होणार नाही. ई-लर्निंग संकल्पना चांगली आहे. त्याप्रमाणात शिक्षकांनी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. प्रत्येक शाळेत खेळण्याची सोय असणे आवश्यक आहे.यावेळी आमदार अनिल बोंडे, यशोमती ठाकुर, विरेंद्र जगताप, रमेश बुंदिले, श्रीकांत देशपांडे यांनी उपायुक्त सुचना केल्या.यामध्ये आमदार अनिल बोंडे, यांनी उर्दु शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे, शिक्षकांचे रखडलेले समायोजन असे विविध मुद्दे मांडून कारवाई करण्याची सुचना केली.तिवसा मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधेसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानंतरही त्याची दखल शिक्षण विभागाने घेतली नाही.याबद्दल आमदार यशोमती ठाकुर त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ईतही प्रश्नाकडे लक्ष वेधले. आमदार विरेंद्र जगताप यांनी जिल्हयातील सि बी एस ई पॅटर्न च्या शाळाची माहिती आणि मान्यता नसलेल्या शाळावर काय कारवाई केली यासह विविध शिक्षणासंबधी माहिती लोकप्रनिधीना देण्यात यावी , समायोजनाची व रिक्त पदावर शिषकांची नियुक्ती करावी अशा सुचना केल्या तर आमदार रमेश बुंदिले यांनीही मतदार संघातील तसेच शिक्षण विभागाने शाळ) वर्ग खोल्याची दुरूस्ती , संरक्षण भिंती बांधण्याची सुचचना केली .बैठकीला आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश उईके, उपाध्यक्ष सतिश हाडोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अनिल भंडारी, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे,सि आर राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे एन आभाळे, पी जी भागवत, नगरपरिषद अध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य विभागप्रमुख, विषय समितींचे सभापती, नगराध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)