शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

गुलाबी थंडीत रंगतेय बहिरमची यात्रा

By admin | Updated: December 24, 2014 22:53 IST

विदर्भातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाश पाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकानांनी यात्रा बहरली आहे.

चांदूरबाजार : विदर्भातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या बहिरमबुवांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राहुट्यांसह विविध खेळणींची दुकाने, आकाश पाळणे, भिंगरीवाले, मिठाई, कापड दुकानांनी यात्रा बहरली आहे.विदर्भात प्रसिध्द असलेली ही यात्रा ३० जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. बहिरमची यात्रा ३५० वर्षांहून अधिक काळापासून भरत आहे. काहींच्या मते हजारो वर्षांपासून भरते आहे. बहिरमबुवाचे मंदिर जवळपास १२५ फूट उंचीवर आहे. त्याचा शेजारी गणपतीची आठ ते दहा फूट उंच सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे. दोन-अडीच एकराच्या परिघात मंदिराचा परिसर असून मंदिराच्या पायथ्याशी विविध दुकाने थाटली आहेत. येथे नवस फेडण्यासाठी विदर्भ आणि मध्य प्रदेशातून लोक येतात. गूळ-फुटाणे रेवड्या हा बहिरमबुवांचा मुख्य प्रसाद आहे. नवस फेडण्यासाठी पूर्वी येथे हजारो बुकडे कापून रक्ताचा पाट वाहत असे. परंतु संत गाडगेबाबांनी ही प्रथा मोडीत काढली. येथे नेहमीच गाडगेबाबांचा कीर्तनाचा कार्यक्रम होत असत. त्यामुळे येथील पशुहत्येला कालांतराने आळा बसला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीही समाजप्रबोधनाद्वारे या भागातील नागरिकांच्या अंधश्रध्दा दूर केल्या. महिनाभरात येणाऱ्या यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी मंदिराच्या पायथ्याशी तीन मनकर्णा आहेत. यातील मोठी व त्यापेक्षा लहान मनकर्णा या पंचायत समिती कार्यालयास लागून तर एक पोलीस चौकीच्या मागे आहे. मोठ्या मनकर्णेतून आजही संपूर्ण यात्रेला पाणीपुरवठा केला जातो.काशी तलावाची आख्यायिका बहिरमच्या डाव्या बाजूला प्रसिध्द भांडी तलाव आहे. या तलावात यात्रेकरुंना पुरेशी भांडी निघायची. पण कुणीतरी ही भांडी आपल्या घरी नेल्यापासून या तलावातून भांडी निघणे कायमचे बंद झाल्याची आख्यायिका आहे. आजही हा काशी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला आहे. येथील राजाच्या महालाचे काही अवशेष काशी तलावासमोर भग्नावशेष आजही येथील गतवैभवाची साक्ष देतात. काशी गंगा येथे वर्षाला अवतरते व त्यामुळेच येथील तलावास काशी तलाव म्हणत असल्याचीही आख्यायिका आहे. भाविक या तलावाला आवर्जून भेट देतात व पुरातन वैभवाचा अनुभव घेतात.महापूजेने झाला यात्रेचा शुभारंभ२० डिसेंबर रोजी पहाटे संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र चौधरी यांनी सहपत्नीक भैरवनाथाची महापूजा करुन यात्रा शुभारंभाचे नारळ फोडले. यात्रेत व्यापारी दाखल झाले असून शनिवारी व रविवारी यात्रेत भाविकांची गर्दी जमत असून यात्रेला बहर चढला आहे. बहिरम महोत्सवाचे विशेष आकर्षण शेतकऱ्यांची यात्रा म्हणून या यात्रेला जसा नावलौकिक आहे तसाच हंडी (मटण) साठी प्रसिध्द आहे. हंडीतील मटणाचा आस्वाद घेण्यासाठी आजही लोक येथे येतात. पूर्वी येथील या सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत होते. घोडे-सैनिकांसह राहुट्या, तंबू, डेरे टाकून येथे महिनाभर मुक्काम करत असत. दोन्ही सांजेला मटणाचे जेवण आणि नवसाच्या पंगती असतात. इंग्रजी राजवटीतील ही सगळी तालेवार मंडळी आपला लवाजमा घेऊन येत. याची दखल इंग्रजी राजवटीनेही घेतली होती. त्यामुळे त्यावेळचे मामलेदार (तहसीलदार) येथे तब्बल महिनाभर राहून कोर्टही येथेच भरायचे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येकासाठी टुरिंग टॉकीज तमाशाचे फड रंगायचे. लोककलेच्या नावावर बीभत्स प्रकार यात्रेत चालत असल्याची ओरड सुरु झाली. त्यामुळे याची दखल घेत आमदार बच्चू कडू यांनी २००६ पासून या यात्रेतून तमाशा हद्दपार केला. परंतु यात्रेतील गर्दी कायम राहण्यासाठी आमदार कडू यांनी बहिरम महोत्सव, शासकीय शंकरपट, पुष्ट बालक स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, लावणी आदी कार्यक्रम राबविण्यात येतात.