शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
3
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
4
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
5
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
6
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
7
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
8
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
9
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
10
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
11
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
12
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
13
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
14
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
15
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
16
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
17
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
18
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
19
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
20
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!

शौचालय उभारणीत चांदूररेल्वे जिल्ह्यात अव्वल

By admin | Updated: October 22, 2015 00:23 IST

प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या निर्मलग्राम स्वच्छता अभियान व स्वच्छ भारत ...

सुधारणा : ७७६९ कुटुंबांपैकी ४२६८ कुटुंबांकडे शौचालयेअमरावती : प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या निर्मलग्राम स्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशन अभियानाचा पुरेपूर लाभ चांदूररेल्वे तालुक्यातील नागरिकांनी घेतला आहे. येथील ७७६९ कुटंूबांपैकी ४२६८ कुटंूबांकडे शौचालय उभारणी झाली आहे. यासाठी लाखोे रुपयांच्या अनुदानाचे वाटप देखील करण्यात आले आहे. कोणताही लाभार्थी अनुग्रह अनुदानापासून वंचित राहू नये, म्हणून यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतस्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुरेपूर दक्षता घेतली आणि या मोहिमेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. निर्मलग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ४६०० रुपये प्रती व्यक्ती याप्रमाणे सानुग्रह अनुदानाचा लाभ तसेच स्वच्छ भारत मिशन अभियांतर्गत प्रत्येकी १२,००० रुपये सानुग्रह अनुदानवाटप करण्यात आले आहे. या अनुषंगाने लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून शासनाने दोन वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. तालुक्यात ७५ टक्के कुटूंबांनी शौचालयांची उभारणी केली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे अनुदान मिळविण्यासाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत आहे. ज्या कुटूंबांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यांनी शौचालय उभारणी करुन राष्ट्रीय कार्यक्रमास हातभार लावावा. अनुदानाचा लाभ घेऊन त्या रकमेचा नियोजित कामासाठी विनियोग करावा. - संजय इंगळे ,डेप्युटी सीईओ, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.