शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

उपासमारीची वेळ : ३० वर्षांपासूनचे मजूर आदेशाविना कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 00:12 IST

सामाजिक वनीकरण विभागांतर्गत ३० वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या म. ग्रा. रो. ह. योच्या मजुरांना कुठलेही लेखी आदेश न देता...

मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरसामाजिक वनीकरण विभागांतर्गत ३० वर्षापासून रोजंदारीवर काम करणाऱ्या म. ग्रा. रो. ह. योच्या मजुरांना कुठलेही लेखी आदेश न देता कामावरून कमी केल्याने या मजुरांचे भवितव्य अधांतरी आले आहे. नांदगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाल्याने या मजुरांना काम देण्यासाठी कामाचा कृती आराखडा तयार करण्याची जबाबदारी नगरपंचायतची असताना सुद्धा अद्यापपर्यंत नगरपंचायतने कामाचा कृती आराखडा तयार न केल्याने दोन महिन्यांपासून या मजुरांच्या हाताला काम नसल्याने या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक रहिवासी अरूण परसनकर, राजू धांडे, रामकृष्ण शिंगारे, मंगला शिंगारे हे कामगार सन- १९८५ पासून सामाजिक वनीकरण विभागाच्या माहुली चोर येथील रोपवाटीकेवर बारमाही रोजंदारीवर काम करीत होते. परंतु ३० वर्षापासून सतत रोजंदारीवर काम करत असताना १एप्रिल २०१६ रोजी कुठलेही लेखी आदेश न देता या मजुरांना सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकाऱ्यांनी कामावर येण्यास मज्जाव केल्याने दोन महिन्यांपासून या मजुरांच्या कुटुंबियांची उदरनिर्वाहासाठी वाताहात होत आहे. याबाबत माहिती जाणून घेतली असता म.ग्रा. रो. ह. योच्या कामावर नांदगावातील जे मजूर काम करीत होते त्या मजुरांना नांदगाव नगरपंचायत झाल्याने म. ग्रा. रो. ह. यो. चे कामे देणे शक्य नसल्याची बाब समोर आली आहे. शासन निर्णयानुसार म. ग्रा. रो. ह. योची कामे ग्रामपंचायत अंतर्गत येत असून ज्या ठिकाणी नगरपंचायत आहे तेथील मजुरांना राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत काम उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाची आहे. तहसीलदार बी. व्ही. वाहूरवाघ यांनी त्यासंबंधीचे पत्र नगरपंचायतला दिलेले आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने मात्र अद्यापपर्यंत याबाबत कामाचा कृती आराखडा तयार न केल्याने या मजुरांचा रोजंदारीचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजूर कामाच्या मागणीसाठी नगरपंचायतमध्ये गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहे. या मजुरांच्या कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे भवितव्य लालफितशाहीत अडकले आहे. शासन निर्णय काय सांगतोयशासन निर्णय ३ मार्च २०१४ नुसार ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर नगरपंचायत क्षेत्रातील म. ग्रा. रो. ह. योची कामे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील मजूर या कामावर असेल त्या मजुरांना पंचायत शासन निर्णय क्र. १ नुसार राज्य रोजगार हमी योजनेमधून कामे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसील कार्यालयाला तसे पत्र सुद्धा प्राप्त झाले आहे. परंतु आता नगरपंचायतने मजुरांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून तात्काळ कामाचा कृती आराखडा तयार करणे गरजेचे आहे. अन्यथा या रोजंदारी मजुरांना सुल्तानी संकटाची उपासमारी भोगावी लागेल एवढे मात्र निश्चित.दोन महिन्यांपासून हाताला काम नाही, जगावे तरी कसे सा. बां. विभागाने कामावरुन कमी केल्यापासून दोन महिने लोटूनही काम न मिळाल्याने कुटुंबियांची उपजिविका कशी भागवावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता उपासमारीशिवाय कुठलाच मार्ग नसल्याची खंत रोजंदारी कामावरील मजूर अरुण परसनकर, राजू धांडे, रामकृष्ण शिनगारे, मंगला शिनगारे या कामगारांनी व्यक्त केले.