शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीच्या साडे तीन लाख विद्यार्थ्यांची ढकलगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:11 IST

अमरावती : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा न देता पहिली ते आठवीच्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलगाडी मिळणार आहे. राज्यात ...

अमरावती : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा न देता पहिली ते आठवीच्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलगाडी मिळणार आहे. राज्यात कोरोना संसर्गाचे पडसाद बघता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘ना परीक्षा, ना अभ्यास’ पुढील वर्गात प्रवेश दिले जाणार आहे. या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ्जांनी स्वागत केले. वर्ष वाचले, पण अभ्यास बुडाला अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

शिक्षण हक्क कायदा २००९ अन्वये सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘प्रमोट’ केले जाणार आहे. गतवर्षी मार्च २०२० मध्ये ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यात कोरोनाचे आगमन झाले. सरकारने संक्रमण टाळण्यासाठी तब्बल तीन महिने लॉकडाऊन केले. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. परीक्षा रद्द करण्ळाचा प्रसंग ओढवला. शासनाने गतवर्षीही ना परीक्षा, ना अभ्यास अशीच पुढच्या वर्गात ढकलगाडी केली. सन २०२०-२०२१ या सत्रात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे प्रवेशद्धारही पाहिले नाही. वर्गच

भरले नाही. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. मात्र, शिक्षक काय म्हणाले, हे विद्यार्थ्यांना कळलेच नाही. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉपवर मुले ऑनलाईन शिक्षणाच्या नावे खेळखंडोबा करीत असल्याचा अनेक पालकांना अनुभव आला. पहिली ते चौथीचे वर्ग उघडलेच नाही. काही शाळांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास पूर्ण केला. परंतु, ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचे वास्तव आहे. कोरोना संसर्गामुळे शिक्षण क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. उद्‌भवलेली परिस्थिती बघता पहिली ते आठवीच्या मुलांना पुढील वर्गात प्रवेश मिळणार आहे.

--------------

दृष्टिक्षेपात

जिल्ह्यात पहिली ते आठवीच्या शाळा : २८९४

पहिली ते आठवीचे विद्यार्थी : ३,५१,००९

--------------------

कोट

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. महामारीच्या गंभीर प्रसंगी विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळणे याेग्य नाही. त्यामुळे पहिली ते आठवीच्या मुलांची परीक्षा न घेण्याचा निर्णय बरोबर आहे.

- प्रिया देशमुख, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

---------

कोट

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांशिवाय आरटीई कायद्यानुसार पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय योग्य आहे. तशी शिक्षक, पालक संघटनांची मागणी होती. शालेय शिक्षण मंत्रच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण, पुढील शैक्षणिक सत्रात प्रत्यक्ष अध्यापनासाठी शाळा सुरू व्हाव्यात.

- योगेश पखाले, शिक्षक. वडाळी

------------

कोट

काळ वाईट आहे. कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे, दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त घातक आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय स्वागतयोग्यच आहे. परीक्षा नव्हे विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे. परिस्थिती लक्षात घेता सकारात्मक निर्णय आहे.

- शरद तिरमारे, मुख्याध्यापक, दाभा

----------------

पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या

अचलपूर: ३५१५८

अमरावती : १९५४२

अंजनगाव सुर्जी: २००७३

भातकुली: १०४०५

चांदूर बाजार: २२९१३

चांदूर रेल्वे: १०२१९

चिखलदरा: १५३७२

दर्यापूर: १९१६७

धामणगाव रेल्वे : १४६१०

धारणी: २८९२२

मोर्शी: १९६८४

नांदगाव खंडेश्वर : ११३५९

तिवसा: १२८९५

वरुड :२५३६५

महापालिका क्षेत्र: ८५३२५