शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST

अमरावती : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय ...

अमरावती : रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोरोना संक्रमण काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळाबाजार कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झालेले आहेत. आरटीपीसीआर, रॅपिड ॲंटिजेन, अँटीबॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत. रुग्णालयांची वेळोवेळी तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापन करण्यात आले आहे. या काळात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजूंना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे. त्यानुसार सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गरजू रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बॉक्स

प्रत्येकाची समाजाप्रती असलेली बांधिलकी सिद्ध करण्याची वेळ

गरजू रुग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधिलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रूग्णांची लूट करत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.