शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतीपिकांवर संक्रांत

By admin | Updated: January 6, 2015 22:52 IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे.

शेतकरी चिंतेत : ढगाळ वातावरण, थंडी, धुके पिकाच्या मुळावरअमरावती : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकुल हवामानाचा परिणाम शेतीपीके, फळपीके व भाजीपाल्यावर होत आहे. यामुळे अळ्यांसह बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता बळावली आहे. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके व गारपीट यामुळे रोगट वातावरण पसरले आहे. कांदा पीक वाढीच्या स्थितीत असतानाच वातावरण बदलाचा परिणाम होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४१ हजार ३६० हेक्टर क्षेत्रात गहू, ९० हजार ११२ हेक्टर क्षेत्रात हरभरा, ६ हजार हेक्टर क्षेत्रात कांदा, १ लाख ९४ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रात कपाशी व ५० हजार हेक्टर क्षेत्रात फळपिके, १० हजार हेक्टर क्षेत्रात भाजीपाला, अशी स्थिती आहे. सध्याच्या प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक परिणाम संत्रापिकावर होत आहे. मृग बहराचा एक चतुर्थांश संत्रा अद्याप झाडावर आहे. कमी भावामुळे कित्येक बागा विकल्या गेल्या नाहीत. या फळांची गळ होण्याची शक्यता आहे. आंबिया बहर कितपत फुटणार याची शंका आहे. गहू पिकावर करपा, अती थंडीमुळे तांबेरा होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याला पाऊस पोषक असला तरी धुक्यामुळे अळी व फुलगळ होण्याची शक्यता आहे. कापूस ओला होत आहे तर उशिरा बहरलेल्या तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सतत नापिकीच्या सत्रामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.