शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होत आहे

By admin | Updated: June 5, 2015 00:34 IST

२००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला.

अमरावती : २००४ मध्ये झालेल्या त्सुनामीमुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा ३ मायक्रोसेकंद कमी झाला. दर एक लाख वर्षांनी पृथ्वी सूर्याकडे १ सेंटीमिटरने ओढली जात आहे. दर वर्षाला चंद्र पृथ्वीपासून ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल.पाच खंडसुद्धा हळूहळू सरकत आहे. न्यूयार्क शहर दरवर्षाला लंडनपासून २.५ सेंटीमिटरने दूर जात आहे. पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम ठेवणे ही काळाची गरज आहे. नाहीतर पृथ्वीचे थोड्याच दिवसांत वाळवंट होईल. आतापासूनच यासाठी उपाययोजना करणे जरूरी आहे. अशनी (उल्का) पृथ्वीला टक्कर देऊ शकते : एखादी अशनी पृथ्वीला टक्कर देऊ शकते. अशनीचा वेग हा ताशी ७२,००० ते २ लक्ष १६ हजार कि. मी. असू शकतो. अशनी जर समुद्रात पडली तर लाटा उसळतात जमिनीवर जर पडली तर विवर तयार होते. धूळ आकाशामध्ये पोहोचते सूर्यप्रकाश जमिनीवर येऊ शकत नाही. पृथ्वीचे तापमान शून्याखाली ६० ते ७० अंशापर्यंत पोहोचते. पृथ्वीवर भूकंप होऊ शकतो. ६.५ कोटी वर्षापूर्वी मेक्सीकोतील युकानात प्रदेशात अशनी धडकली यामुळे डायनासोर नष्ट झाले असावे असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. स्पेश वॉच प्रकल्प : नासाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून धुमकेतू व अशनीकडे लक्ष ठेवले जाते व उपाययोजना केल्या जातात.