शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
5
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
6
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
7
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
8
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
9
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
10
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
11
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
12
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
13
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
14
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
15
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
16
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
18
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
19
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
20
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

पेरणीचा पॅटर्न बदलला

By admin | Updated: July 16, 2014 23:50 IST

यंदा पावसाने दडी मारली. नक्षत्रामागून नक्षत्र कोरडेच गेले. जून उलटला. जुलैैचा पहिला पंधरवाडा उलटला तरी पावसाचा मागमूसही नव्हता. परिणामी पेरण्या लांबल्या. ज्यांनी पावसावर भरवसा ठेवून पेरण्या

अमरावती : यंदा पावसाने दडी मारली. नक्षत्रामागून नक्षत्र कोरडेच गेले. जून उलटला. जुलैैचा पहिला पंधरवाडा उलटला तरी पावसाचा मागमूसही नव्हता. परिणामी पेरण्या लांबल्या. ज्यांनी पावसावर भरवसा ठेवून पेरण्या आधीच उरकल्या त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. अनेक शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन खरेदी केलेली महागडी बियाणी घरातच पडून होती. एकंदरीत जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट भासत होते. परंतु दोन दिवासांपूर्वी वरूणराजा मेहेरबान झाला अन् समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. रखडलेल्या पेरण्यांना दोन दिवसांच्या पावसामुळे वेग आला आहे. परंतु पेरण्यांना तब्बल दीड महिना विलंब झाल्याने यंदा अनेक पिके बाद झाली आहेत. मूग, उडदाचा कालावधी केव्हाच उलटून गेलाय. पारंपरिक पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला कालावधी उशिरा आलेल्या पावसामुळे आता मिळणार नसल्याने अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना पीक बदल आवश्यक झाला आहे. हा बदल स्वीकारून जिल्ह्यातील शेतकरी नव्या ‘पॅटर्न’नुसार पेरण्यांची तयारी करीत आहेत. म्हणजेच पीक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे चित्र आहे. पावसाअभावी यंदा मूग, उडीद, सोयाबीनचा पेरा काही तालुक्यांमध्ये घटणार आहे. कपाशीच्या पेऱ्यात वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहे. तुरीचा पेरा वाढण्याचे संकेत आहे. वरूडमध्ये २७ हजार हेक्टरमध्ये कपाशीवरूड तालुक्यात ८० टक्के पेरणी आटोपली आहे. तालुक्यातील एकूण पेरणीक्षेत्र ५६ हजार हेक्टर असून यंदाच्या हंगामातील पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक बदल केल्याचे दिसते. तालुक्यात तब्बल १५ हजार हेक्टरमध्ये शेतकरी मिरचीचे पीक घेत आहेत. तर २७ हजार हेक्टरमध्ये यंदा कपाशीचा पेरा झाला आहे. रोखीचे पीक समजले जाणाऱ्या सोयाबीनचे पेरणीक्षेत्र यंदा घटले असून अवघ्या ६ हजार हेक्टरमध्येच सोयाबीनची पेरणी झाली आहे. ९ हजार हेक्टरमध्ये तूर तर २२०० हेक्टरमध्ये ज्वारीची पेरणी झाली आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे उर्वरित २० टक्के पेरण्यांनाही वेग आला आहे. नांदगावात ५८ हजार हेक्टरमधील पेरणी शिल्लकनांदगाव खंडेश्वर तालुुक्यात केवळ १२.८४ हेक्टरमधील पेरण्या आटोेपल्या आहेत. तालुक्यातील एकूण ७८ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रांपैकी ६६ हजार ९८१ हेक्टर इतके पेरणीयोग्य क्षेत्र आहेत. सद्यस्थितीत ८ हजार ६०६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. तालुक्यातील सोयाबीनचे पेरणीक्षेत्र ५ हजार ८१५ हेक्टर असून १ हजार ५४८ हेक्टरमध्ये कपाशी, १ हजार १५९ हेक्टरमध्ये तूर, ७२ हेक्टरमध्ये मूग, १२ हेक्टरमध्ये उडदाची पेरणी झाली आहे. तालुक्यात आजच्या तारखेमध्ये गतवर्षी ११२.५ मि.मी.पावसाची नोंद झाली होती. तर यंदा आजच्या तारखेमध्ये केवळ १२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.