शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सहा दिवसांनी येतो पॉझिटिव्ह असल्याचा कॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना टेस्टकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान ...

अमरावती : हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना टेस्टकरिता स्वॅब दिल्यानंतर त्यांना चाचणी अहवाल माहिती व्हायला किंवा आरोग्य यंत्रणेचा फोन जायला किमान सहा ते सात दिवस लागत आहे. तोवर या पॉझिटिव्हचा सर्वत्र मुक्त संचार झालेला असतो. यात यंत्रणेची दिरंगाई असल्याने कसा रोखणार कोरोना, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काही रुग्ण अँटिजेन चाचणीच्या आधारे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेत व उपचारानंतर सहा दिवसांनी त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला. त्यानंतर तुम्ही आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे फोनद्वारे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींनी जर ॲन्टिजेन चाचणी केली नसती तर त्याला पॉझिटिव्ह आहे हे माहिती व्हायला सहा ते सात दिवस लागले असते व त्याचे संसर्गातून कित्येक जण बाधित झाले असते. किंबहुना संक्रमित होतही आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा समर्ग वाढताच आहे. १ फेब्रुवारीपासून ७ मार्चपर्यंत १७,५४५ रुग्णांची नोंद झालेली आहे. या रुग्णांचे हायरिस्कमधील व्यक्तींनी कोरोना चाचणी केल्यानंतर प्रत्येक जण क्वारंटाईन राहत नाही. त्यामुळे चाचणी अहवाल लवकर मिळणे अपेक्षित असताना अलीकडे सहा दिवसांवर कालावधी लागत आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजार, तर महापालिका क्षेत्रात २५ हजारांच्या घरात आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता अमरावती शहरच आता कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले. मात्र, शासनाचे गाईडलाईननुसार कंटेनमेंट झोनमधील तरतुदी पुरेशा लागू केलेल्या नाहीत. शहरात साईनगर, राजापेठ, दस्तूरनगर, अर्जुननगर आदी भाग कोरोनाचे हॉट स्पॅाट बनले आहेत. याशिवाय ग्रामीणमध्ये अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरूड, मोर्शी तालुक्यात दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतीच आहे. या भागात कॉन्टक्ट ट्रेसिंग वाढवायला पाहिजे. मात्र, अलीकडे या प्रकाराचा विसर आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

बॉक्स

मोबाईलवर मिळणार पॉझिटिव्ह- निगेटिव्हचा मेसेज, जिल्हाधिकारी

विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ या आठवड्यात झालेली आहे. त्यामुळे रोज १,६०० वर नमुन्यांची तपासणी होते. आता तर चार शिफ्टमध्ये काम होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची होईल. सधारणपणे तिसरे दिवशी अहवालाविषयी माहिती व्हायला पाहिजे. आता स्वॅब देणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर पॅाझिटिव्ह, निगेटिव्ह याची दोन दिवसांत माहिती देणारा मेसेज मिळणार आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून असे मेसेज जातील, याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. एका संस्थेच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ‘लोकमत’ला दिली.

बॉक्स

अशी आहे स्वॅब दिल्यानंतरची प्रक्रिया

संशयित रुग्णाने स्वॅब दिल्यानंतर त्याला साधारणपणे उणे पंचवीस या तापमानात ठेवण्यात येते व त्यानंतर सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. या ठिकाणी मशीनमध्ये एका वेळी किमान २०० नमुन्यांची तपासणी होते व या प्रक्रियेला चार तास लागतात. येथून रिपोर्ट सीएस कार्यालयास व तेथून डीएचओ व एमओएच यांच्याकडे जातात व नंतर संबंधित व्यक्तीला फोन करून पॉझिटिव्ह अहवाल असल्याचे सांगितले जाते.

बॉक्स

येथे होते दिरंगाई

स्वॅब सेंटरमधील नमुने पुरेसे ‘फ्रोजन आईस पॅक’ झाले नसतील तर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवूण दुसरे दिवशी लॅबला पाठविण्यात येतात. लॅबमध्येही अगोदरचे प्रलंबित नमुने मशीनवर लावले गेले असतील तर थोडा उशीर होतो. लॅबद्वारा अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास आरोग्य यंत्रणेद्वाराही फोन करण्यास पुढचा दिवस निघतो. रुग्णसंख्या जास्त असल्यास प्रत्येक प्रक्रियेमध्ये विलंब होतो.

पाईंटर

दिनांक नमुने तपासणी पॉझिटिव्ह

१ मार्च २,१९६ ६९९

२ मार्च २,२७६ ६३६

३ मार्च २,४९६ ६७१

४ मार्च २,६९४ ६७३

५ मार्च २,५६६ ६५१

६ मार्च २,८२३ ६३१

७ मार्च २,२३२ ४४६

८ मार्च ०००० ०००