शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

शेतकरीपुत्र ते डीआरडीओचा शास्त्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:31 IST

अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.

ठळक मुद्देमल्हारा येथील तरुणाची यशकथा : कठोर मेहनत, आयआयटीतून संधी

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथील शेतकरीपुत्र आतिष तायडे याने उंच भरारी घेतली आहे. देशभरात शास्त्रज्ञ घडविणारी संस्था म्हणून नावलौकीक असणाऱ्या रक्षा अनुसंधान व विकास संघटना ‘डीआरडीओ’ हैद्राबाद येथे शास्त्रज्ञ म्हणून त्याची निवड झाली आहे.मल्हारा येथील साहेबराव तायडे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्यामुळे ते मजुरीही करतात. त्यांचा मुलगा आतिष याने मल्हारा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतच दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीत चांगले गूण मिळाल्यानंतर त्याने गौरखेडा येथील लुल्ला विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. आतिषला वडीलांच्या आर्थिक परिस्थितीची जाण होती. त्यामुळे त्याने बारावीत चांगले गुण प्राप्त केले. त्यामुळे त्याला अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तेथून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. नोकरीस प्राधान्य न देता आणखी उच्च शिक्षण घेण्याकरिता दिल्ली गाठली. दिल्लीत त्याने भारतीय अभियांत्रिकी सेवा (आईएस) ची तयारी केली. त्यानंतर गेट (जीएटीई) च्या माध्यमातून त्याची आयआयटीसाठी दिल्लीसाठी निवड झाली. आयआयटीमध्ये त्याने शिक्षण घेतले. मात्र, यादरम्यानच त्याची डीआरडीओमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली. घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे आतिषला त्याचे काका दादाराव तायडे यांनी आर्थिक मदत केली. दहावीपर्यंत मल्हारासारख्या खेड्यातील मराठी शाळेत शिक्षण घेवून आतिष केवळ अपार मेहनत व जिद्दीच्या बळावर शास्त्रज्ञ झाला आहे. त्याच्या या यशाची पंचक्रोशीत चर्चा आहे.