शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षाची पार्श्वभूमी असलेल्या शिवणीतून पेटली आंदोलनाची ठिणगी!

By admin | Updated: September 18, 2016 00:22 IST

शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राहण्यासाठी कायदा असतानाही शासनाकडून बगल देऊन शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना ...

नागपूर-मुंबई शीघ्रसंचार महामार्ग : शेतकऱ्यांसाठी ठरतोय मृगजळ ?नांदगाव खंडेश्वर : शेतकऱ्यांचा हक्क अबाधित राहण्यासाठी कायदा असतानाही शासनाकडून बगल देऊन शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना तालुक्यातील शिवणी रसुलापूर गावातून अनेकदा शासन धोरणाविरुद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले व सद्यस्थितीतही नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र शेतकरी देशोधडीला लागू नये, यासाठी शिवणीतून पेटलेली आंदोलनाची ठिणगी वणव्यात रुपांतर होण्याची चिन्हे दिसत आहे. महाराष्ट्र समृद्धी कोरीडोर प्रकल्प शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरू नये, अशी माफक अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले शिवणी रसुलापूर गाव. याला १९७२ पासूनच संघर्षाची पार्श्वभूमी आहे. १९७२ मध्ये जंगलतोड आंदोलन, १९८०-८५ शेतकरी चळवळ, त्यानंतर शेतकरी आत्महत्या होत असताना सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘गाव गहाण आंदोलन’ अशी वेगवेगळी आंदोलन करण्यात अग्रेसर असणाऱ्या तेथील नागरिकांनी जनसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र समृद्धी कोरीडोर प्रकल्पांतर्गत जो नागपूर ते मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग होत आहे. त्यामध्ये तालुक्यातील वाघोडा, शेलू, फुबगाव, चिखली, धानोरा शिक्रा, शिवणी रसुलापूर, मंगरुळ चव्हाळा, सालोड, पिंपळगाव, लोहगाव, वाढोणा रामनाथ या गावांतील शेतजमिनीचे अधिग्रहण होणार आहे. बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात जमिनी द्यायच्या असल्यास भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना पूर्ण हक्क प्रदान करणे गरजेचे आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या भूमिसंपादन हक्काबाबत शासनाची भूमिका संदिग्ध आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला बाजार भावाच्या चारपट, जमीन अधिग्रहणाची सूचना जाहीर झाल्यापासून शेतजमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत शेतकऱ्याला मिळणाऱ्या रकमेवर १२ टक्के व्याज, तसेच बाधित शेतकऱ्याला एक वर्षापर्यंत मासिक ३ हजार रुपये निर्वाह भत्ता, बाधित कुटुंबाचे उपजिवेकरिता एका व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसायासाठी ५ लाख रुपये अशी तरतूद आहे. एकवेळ ५० हजार रुपये पुनर्वसन भत्ता, प्रकल्पांतर्गत जर इमारतीचे पुनर्वसन होत असेल तर ज्या जागेवर राहणार त्याची रक्कम व सोबतच २ लाख रुपयांचे वेगळे पॅकेज अशा स्वरुपाचे हक्क बाधित कुटुंबांना कायद्याप्रमाणे प्रदान करण्यात आले आहे. परंतु शासनाची भूमिका अस्पष्ट आहे. (शहर प्रतिनिधी)- हा तर शेतकऱ्यांना संपविण्याचा डावसततचा दुष्काळ व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आला या प्रकल्पात शेतजमिनीचे अधिग्रहण करून शासन शेतकऱ्याला देशोधडीला लावत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शेतमालाच्या किमती अर्ध्यावर आलेल्या आहेत. जर शेतकऱ्याला समृद्ध करायचे असेल तर शेतमालाचे भाव वाढविणे गरजेचे आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे न राहता शेतकऱ्यांना भूमिहीन करून शेतकरी संपविण्याचा डाव रचत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढाईत आम्ही खंबीरपणे सोबत आहोत, अशी प्रतिक्रिया आ. वीरेंद्र जगताप यांनी दिली. भांडवलदारांच्या हिताचाच हा प्रकल्प२०१३ च्या भूमी अधिग्रहण कायद्याला बगल देणारा प्रकल्प असून शेतकऱ्यांना शेतीपासून दूर करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. आर्थिक विषमता व महागाईला प्रोत्साहन देणारा प्रकल्प म्हणून शेतकऱ्याला मजदूर बनवून भांडवलदारांच्या हिताचा हा प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया किसान स्वराज्य आंदोलनाचे संचालक प्रमोद तऱ्हेकर यांनी दिली.शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरणशेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण असून महाराष्ट्र समृद्धी प्रकल्पात आम्ही शेतकरी कदापी जमिनीचे अधिग्रहण होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवणीचे सरपंच मधुकर कोठाळे यांनी दिली.