शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

सावित्रीबाई फुले कन्या योजना बारगळली

By admin | Updated: July 14, 2014 23:44 IST

सरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या दुहेरी उद्देशाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सन २००६-०७ पासून सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी

सचिन डवके - रिद्धपूरसरकारने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या दुहेरी उद्देशाने सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सन २००६-०७ पासून सुरू केली. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी संवर्ग विकास अधिकाऱ्याचेच दारिद्रय रेषेखालीलच असावा, अशी अट घातल्याने योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या नगण्य आहे. यामुळे ही योजना अयशस्वी ठरली आहे. या योजनेंतर्गत एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना २०० रुपये रोख व मुलीच्या नावे आठ हजारांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास दोन हजार रुपये रोख आणि दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी चा-चार हजारांचे बचत प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. मात्र, संबंधित जोडपे बीपीएल गटातील असावे, अशी शासनाची अट असल्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. परिणामी योजनेच्या लाभार्थींचे प्रमाण हे अत्यल्प आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २० हजारांच्या आत, बीपीएलचे रेशनकार्ड जमीन, गाडी नसलेले व्यक्ती किंवा कुटुंब बीपीएलमध्ये मोडतात. परंतु आरोग्य खाते असा कोणताही पुरावा ग्राह्य धरत नाही. केवळ ग्रामीण भागात संवर्ग विकास अधिकाऱ्यांचेच बीपीएल प्रमाणपत्र लाभर्थ्यांना मागितले जाते. त्यामुळे बीपीएल यादीत असतानाही लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. संवर्ग अधिकारी असे प्रमाणपत्र देण्यास तयार असताना आणखी पुरावे मागतात. चकरा माराव्या लागतात. विविध दाखले गोळा करावी लागतात. त्यामुळे ते काम किचकट झाल्याने या योजनेचा लाभ मिळविता येत नाही. सुरुवातीच्या दोन वर्षांत तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला मिळाला की, लाभ घेण्यास पात्र ठरत असे, परंतु आता तो दाखला बीपीएलचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही, अशी माहिती मिळाली आहे. सरकारी यंत्रणेची उदासीनता लोकप्रतिनिधींची मानसिकता या योजनेची पाठपुरावा करण्याची कुवत नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. जनजागृती झाल्याने शहरी लोक स्वत:हून कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया एक किंवा दोन मुली असतानाही करतात. परंतु ग्रामीण भागात योग्य प्रचार -प्रसार, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष त्यामुळे आजही जनजागृती झालेली नाही. तेव्हा ग्रामीण भागासाठी बीपीएलची अट या योजनेतून सरकारने रद्द करावी शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना लाभार्थीचे सक्तीचे टार्गेट द्यावे, अशी मागणी आहे. अन्यथा महापुरूषांच्या नावे सुरू केलेल्या योजना बारगळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.